शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

साडेचौदाशे कोटींचा कृषी पतपुरवठा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:54 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आगामी खरीप व रबी हंगामासाठी १४६८ कोटी रुपयांचे कृषी कर्जवाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये ५५ कोटी ४४ लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आगामी खरीप व रबी हंगामासाठी १४६८ कोटी रुपयांचे कृषी कर्जवाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये ५५ कोटी ४४ लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतक-यांनाही नव्याने कर्ज वितरित केले जाणार आहे.जिल्ह्यात पाच लाख ३५ हजार शेतकरी संख्या आहे. यामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांची संख्या चार लाख सात हजार असून सर्वसाधारण जमीन धारणा एक हेक्टर २६ आर इतकी आहे. मागील आर्थिक वर्षात (वर्ष-२०१७-१८) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी व ग्रामीण बँकांना मिळवून जिल्ह्यासाठी १४११ कोटी ६६ लाख रुपये कृषी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केले होते. मात्र, खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे नवीन कर्ज मिळविण्याऐवजी कर्जमाफीचे आॅनलाइन फार्म भरण्यासाठी शेतकºयांची मोठी धावपळ उडाली. शिवाय कर्जदार बँकांनाही शेतक-यांची विविध प्रकारची माहिती आपले सरकार या आॅनलाइन पोर्टलवर सातत्याने अद्ययावत करावी लागली. कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळायला वर्षभराचा कालावधी लागल्यामुळे बँकांना कृषी पतपुरठ्याचे निर्धारित उद्दिष्ट गाठता आले नाही. कर्जमाफी प्रक्रियेच्या गोंधळात नियमित कर्जफेड करणाºया बहुतांश शेतक-यांना नव्याने कृषी कर्ज मिळू शकले नाही. परिणामी गत आर्थिक वर्षात १४११.६६ कोटींपैकी केवळ २७७.१८ कोटींचे कृषी कर्जवाटप झाले. मात्र, या आर्थिक वर्षात बहुतांश थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळाल्यामुळे नव्याने कर्ज घेण्यास पात्र ठरणार आहेत. त्यामुळे यंदा कृषी पत पुरवठ्याचे उद्दिष्ट ५५ कोटी ४४ लाख रुपयांनी वाढविण्यात आले आहे.चालू आर्थिक वर्षात कृषी पतपुरवठ्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँक अधिका-यांची बैठक घेण्यात येणार आहे. अधिकाधिक शेतक-यांना कृषीकर्ज वाटप करण्याच्या सूचना सर्व बँकांना देण्यात येणार आहे.- निशांत ईलमकर,व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रAgriculture Sectorशेती क्षेत्र