शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

साडेचौदाशे कोटींचा कृषी पतपुरवठा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:54 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आगामी खरीप व रबी हंगामासाठी १४६८ कोटी रुपयांचे कृषी कर्जवाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये ५५ कोटी ४४ लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आगामी खरीप व रबी हंगामासाठी १४६८ कोटी रुपयांचे कृषी कर्जवाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये ५५ कोटी ४४ लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतक-यांनाही नव्याने कर्ज वितरित केले जाणार आहे.जिल्ह्यात पाच लाख ३५ हजार शेतकरी संख्या आहे. यामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांची संख्या चार लाख सात हजार असून सर्वसाधारण जमीन धारणा एक हेक्टर २६ आर इतकी आहे. मागील आर्थिक वर्षात (वर्ष-२०१७-१८) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी व ग्रामीण बँकांना मिळवून जिल्ह्यासाठी १४११ कोटी ६६ लाख रुपये कृषी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केले होते. मात्र, खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे नवीन कर्ज मिळविण्याऐवजी कर्जमाफीचे आॅनलाइन फार्म भरण्यासाठी शेतकºयांची मोठी धावपळ उडाली. शिवाय कर्जदार बँकांनाही शेतक-यांची विविध प्रकारची माहिती आपले सरकार या आॅनलाइन पोर्टलवर सातत्याने अद्ययावत करावी लागली. कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळायला वर्षभराचा कालावधी लागल्यामुळे बँकांना कृषी पतपुरठ्याचे निर्धारित उद्दिष्ट गाठता आले नाही. कर्जमाफी प्रक्रियेच्या गोंधळात नियमित कर्जफेड करणाºया बहुतांश शेतक-यांना नव्याने कृषी कर्ज मिळू शकले नाही. परिणामी गत आर्थिक वर्षात १४११.६६ कोटींपैकी केवळ २७७.१८ कोटींचे कृषी कर्जवाटप झाले. मात्र, या आर्थिक वर्षात बहुतांश थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळाल्यामुळे नव्याने कर्ज घेण्यास पात्र ठरणार आहेत. त्यामुळे यंदा कृषी पत पुरवठ्याचे उद्दिष्ट ५५ कोटी ४४ लाख रुपयांनी वाढविण्यात आले आहे.चालू आर्थिक वर्षात कृषी पतपुरवठ्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँक अधिका-यांची बैठक घेण्यात येणार आहे. अधिकाधिक शेतक-यांना कृषीकर्ज वाटप करण्याच्या सूचना सर्व बँकांना देण्यात येणार आहे.- निशांत ईलमकर,व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रAgriculture Sectorशेती क्षेत्र