शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
2
आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण
3
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
4
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
5
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
6
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
7
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
8
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
9
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
10
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
11
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
12
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
13
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
14
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
15
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
16
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
17
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
18
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
19
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
20
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'

लोकसभा निवडणूक निकलानंतर जि.प.मध्ये सत्तांतराची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 1:10 AM

राज्याच्या सत्तेत गळ्यात गळे घालून फिरत असतानाच शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर जालन्यातही त्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसून आले.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्याच्या सत्तेत गळ्यात गळे घालून फिरत असतानाच शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर जालन्यातही त्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसून आले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना हे स्वतंत्र लढले. मात्र नंतर त्यांचे संख्या बळ हे बहुमताच्या जवळ होते. मात्र, शिवसेनेने भाजपच्या नेतृत्वाला धडा शिकविण्यासाठी शिवसेनेने हातावर घड्याळ बांधले. त्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे शिवसेनेचे अनिरूध्द खोतकर तर उपाध्यक्ष सतीश टोपे यांच्याकडे चालून आले. भाजपचे संख्या बळ हे शिवसेनेच्या तुलनेत जास्त असल्याने भाजपने अध्यक्षपदावर दावा केला होता.जालना जिल्हा परिषदेत काही मोजका काळ वगळता शिवेना-भाजपचे वर्चस्व राहिले आहे. त्यातही अनिरूध्द खोतकर आणि जिल्हा परिषद हे समीकरणच बनले आहे. कुठलीही जोड-तोड केली तरी अनिरूध्द खोतकर हे एक तर अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष राहिले आहेत. दरम्यान, शिवसेना - भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी युती झाली होती. त्यामुळे तेव्हाच शिवसेना राष्ट्रवादीचे घड्याळ हातातून काढेल असे वाटले होते. परंतु तसे झाले नाही. मध्यंतरी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. परंतु यात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मध्यस्थी केल्याने खोतकर यांनी माघार घेत, दानवेंचा प्रचार केला.आता लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. दानवे हे पुन्हा विजयी होतील, या आशेवर शिवसेना आणि भाजपने जिल्हा परिषदेसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. काही चमत्कार होऊन येथे कॉग्रेसला संधी मिळाल्यास महत्वाची स्थानिक स्वराज्य संस्था तरी आपल्या ताब्यात राहावी म्हणून भाजप आणि श्विसेना नेतृत्वाकडून चाचपणी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी भोकरदन येथील दानवेंच्या निवासस्थानी भेट देऊन व्यूहरचना आखल्याचे बोलले जात आहे. यावेळी भाजपला अध्यक्षाची संधी देऊन अनिरूध्द खोतकर हे उपाध्यक्ष पदावर समाधान मानतील, असे समीकरणही ठरल्याची जोरदार चर्चा आहे.निकालाकडे लागले जालनेकरांचे लक्ष, तर्क-वितर्कांना उधाणजस-जशी २३ मे जवळ येत आहे, तशी निकालाविषयी जोरदार चर्चा रंगत आहेत. कोणाला कुठून प्लस आणि कोणाला आघाडी मिळाली या बद्दल जो तो आपल्या परीने तर्क-वितर्क लावताना दिसून येत आहेत. पैठण, फुलंब्री बदनापूर येथे काँग्रेसला चांगले मतदान झाल्याचे बोलले जात आहे. तर जालना शहरासह विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरल्याने उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. आता मतमोजणीला केवळ पाच दिवस शिल्लक असताना जिल्हा परिषदेतील या सत्तांतराच्या चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे.दरम्यान गेल्या पाच वर्षाचा कालावधी लक्षात घेतल्यास राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाने भाजपवर प्रखर टीकेचे बाण सोडल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे आ. राजेश टोपे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची मध्यवर्ती बँकेतील युतीही सर्वश्रुत आहे. आज शिवसेनेने जिल्हा परिषदेत काँग्रेसचीही अप्रत्यक्षपणे साथ घेतलेली आहे.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदPoliticsराजकारण