शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

चौफेर अभ्यासानंतरच नाणार प्रकल्प मराठवाड्यात आणावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 01:25 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरी प्रकल्प हा गुजरातला नेण्याऐवजी तो मराठवाड्यात आणावा अशी भूमिका घेऊन एक मे रोजी मराठवाडा अनुशेष निर्मूलन व विकास मंचाच्यावतीने या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरी प्रकल्प हा गुजरातला नेण्याऐवजी तो मराठवाड्यात आणावा अशी भूमिका घेऊन एक मे रोजी मराठवाडा अनुशेष निर्मूलन व विकास मंचाच्यावतीने या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. हा प्रकल्प मराठवाड्यात आणताना त्याचा चौफेर अभ्यास करूनच तो आणण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी राजकीय मतभेद दूर ठेवून सर्वांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे मान्यवरांनी आपल्या विचारातून सांगितले.येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभाृहात नाणार प्रकल्पा बाबत मराठवाडा अनुशेष निर्मूलन व विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील यांनी केले होते. याचे उद्घाटन मराठवाडा जनता परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल या होत्या. यावेळी कामगार नेते उध्ध्दव भवलकर, माजी मंत्री डॉ. शंकरराव राख, माजी आ. कल्याण काळे, माजी आ. कैलास गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, विमल आगलावे, गणेशलाल चौधरी, अ‍ॅड. विनायक चिटणीस, साईनाथ चिन्नादोरे, अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण, अंकुशराव देशमुख आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी उध्दव भवलकर यांनी सांगितले की, मराठवाड्यावर कायम अन्याय झाला आहे. मात्र त्यासाठी आपल्यामध्ये देखील एकी हवी, कुठल्याही मुद्यावर एकत्रित येऊन प्रथम त्याचा सर्व बाजूंनी अभ्यास करून एक अजेंडा ठरवून त्याचा पाठपुरावा करण्यााची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी हा प्रकल्प गुजरातला नेण्याच्या हालचाली म्हणजे महाराष्ट्रावर अन्यायच आहे. तसेच होऊ नये यासाठी संघर्ष करावा लागेल. तसेच हा प्रकल्प मराठवाड्यात आणताना त्याचा वैज्ञानिक तसेच पर्यावरणीय संदर्भाने अभ्यास करूनच निर्णय होणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.विनित साहनी, साईनाथ चिन्नादोरे, प्रा. बाबा उगले, माजी आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आदींनी विचार मांडले. प्रास्ताविक संयोजक संजय लाखे पाटील यांनी केले.त्यांनी यावेळी नााणर प्रकल्प हा मराठवाड्यासाठी कशी संजीवनी ठरू शकते याची अनेक उदाहरणे देऊन केले. हा प्रकल्प मराठवाड्यात आल्यास त्यातून तीन लाख कोटी रूपयांची गुंतवणूक होऊ शकते असेही लाखे पाटील यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र राख, राजेंद्र गोरे, संजीव देशमुख, माऊली कदम, अ‍ॅड. शैलेश देशमुख यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पnagaradhyakshaनगराध्यक्ष