शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

चौफेर अभ्यासानंतरच नाणार प्रकल्प मराठवाड्यात आणावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 01:25 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरी प्रकल्प हा गुजरातला नेण्याऐवजी तो मराठवाड्यात आणावा अशी भूमिका घेऊन एक मे रोजी मराठवाडा अनुशेष निर्मूलन व विकास मंचाच्यावतीने या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरी प्रकल्प हा गुजरातला नेण्याऐवजी तो मराठवाड्यात आणावा अशी भूमिका घेऊन एक मे रोजी मराठवाडा अनुशेष निर्मूलन व विकास मंचाच्यावतीने या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. हा प्रकल्प मराठवाड्यात आणताना त्याचा चौफेर अभ्यास करूनच तो आणण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी राजकीय मतभेद दूर ठेवून सर्वांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे मान्यवरांनी आपल्या विचारातून सांगितले.येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभाृहात नाणार प्रकल्पा बाबत मराठवाडा अनुशेष निर्मूलन व विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील यांनी केले होते. याचे उद्घाटन मराठवाडा जनता परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल या होत्या. यावेळी कामगार नेते उध्ध्दव भवलकर, माजी मंत्री डॉ. शंकरराव राख, माजी आ. कल्याण काळे, माजी आ. कैलास गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, विमल आगलावे, गणेशलाल चौधरी, अ‍ॅड. विनायक चिटणीस, साईनाथ चिन्नादोरे, अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण, अंकुशराव देशमुख आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी उध्दव भवलकर यांनी सांगितले की, मराठवाड्यावर कायम अन्याय झाला आहे. मात्र त्यासाठी आपल्यामध्ये देखील एकी हवी, कुठल्याही मुद्यावर एकत्रित येऊन प्रथम त्याचा सर्व बाजूंनी अभ्यास करून एक अजेंडा ठरवून त्याचा पाठपुरावा करण्यााची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी हा प्रकल्प गुजरातला नेण्याच्या हालचाली म्हणजे महाराष्ट्रावर अन्यायच आहे. तसेच होऊ नये यासाठी संघर्ष करावा लागेल. तसेच हा प्रकल्प मराठवाड्यात आणताना त्याचा वैज्ञानिक तसेच पर्यावरणीय संदर्भाने अभ्यास करूनच निर्णय होणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.विनित साहनी, साईनाथ चिन्नादोरे, प्रा. बाबा उगले, माजी आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आदींनी विचार मांडले. प्रास्ताविक संयोजक संजय लाखे पाटील यांनी केले.त्यांनी यावेळी नााणर प्रकल्प हा मराठवाड्यासाठी कशी संजीवनी ठरू शकते याची अनेक उदाहरणे देऊन केले. हा प्रकल्प मराठवाड्यात आल्यास त्यातून तीन लाख कोटी रूपयांची गुंतवणूक होऊ शकते असेही लाखे पाटील यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र राख, राजेंद्र गोरे, संजीव देशमुख, माऊली कदम, अ‍ॅड. शैलेश देशमुख यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पnagaradhyakshaनगराध्यक्ष