शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

संकटे आली पण हार नाही मानली; मिरची, कारले, टोमॅटो अन् दोडक्यांनी शेतकऱ्यास केलं लखपती!

By विजय मुंडे  | Updated: March 20, 2024 18:41 IST

दोन एकर शेतात मिरची, कारले, टोमॅटो आणि दोडक्यांचे उत्पादन घेऊन सहा लाखांचा नफा मिळविला आहे.

- योगेश मोरेसेलगाव : शेती कसताना अनेक संकटे येतात. परंतु, यावरही मात करीत नियोजनबद्ध शेती केली तर लाखोंचे उत्पन्न मिळविता येते याची प्रचिती चितोडा (ता. बदनापूर) येथील युवा शेतकरी राहुल दिघे यांच्याकडे पाहिल्यानंतर येते. दिघे यांनी चालू वर्षात दोन एकर शेतात मिरची, कारले, टोमॅटो आणि दोडक्यांचे उत्पादन घेऊन सहा लाखांचा नफा मिळविला आहे.

चितोडा येथील शेतकरी राहुल अशोकराव दिघे हे गत सहा वर्षांपासून भाजीपाला पिकवत आहेत. २० एकर शेतीपैकी २ एकर क्षेत्रामध्ये बाराही भाजीपाला पिकविला जातो. प्रामुख्याने मेथी, कोथिंबीर, टोमॅटो, कारले, शिमला मिरची, काकडी, दोडके या भाजीपाला पिकांचे ते उत्पन्न घेतात. भाजीपाला पिकवताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ते करीत आहेत. यावर्षी त्यांना मिरची, कारले, टोमॅटो व दोडके या पिकांचा सरासरी उत्पन्नातून ६ लाखांचा निव्वळ नफा झाला आहे. त्यासाठी जवळपास खर्च हा १० लाख रुपये झाला आहे. उत्पन्न चांगले असले तरीही बदलत्या हवामानामुळे भाजीपाला पिकावर परिणाम होतो. तापमान वाढीमुळे भाजीपाला पिवळा पडतो तर अचानक ढगाळ वातावरण झाल्यामुळे रोगराई वाढते.

दोघे बंधू कृषी पदवीधारकराहुल दिघे आणि त्यांचा मोठा भाऊ अरुण दिघे हे दोघेही कृषी पदविकाधारक आहेत. त्यामुळे शेतीतील नवनवीन प्रयोग करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. यामध्ये त्यांना त्यांचे वडील अशोकराव दिघे यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते.

म्हणून पाणी कमी लागते, गवतही कमी येतेभाजीपाल्यासाठी ते मल्चिंग, बेड पद्धतीचा ते प्रामुख्याने वापर करतात. मल्चिंगमुळे पाणी कमी लागते, रोगप्रतिकारक क्षमता वाढते, गवत कमी प्रमाणात होते तसेच जास्त काळ ओलावा टिकून राहतो. शेडनेटचा देखील ते वापर करतात. योग्य ती खताची मात्रा देतात तसेच योग्य ती फवारणी देखील करतात. यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन हाती पडते.

पन्नास टक्के नफामागील सहा वर्षांपासून आम्ही भाजीपाला पीक घेत आहोत. भाजीपाला उत्पादनासाठी विशेष नियोजन करावे लागते. कोणतीही एकच भाजी न पिकवता सोबत तीन ते चार पिके घेतली जातात. त्यामुळे एखाद्या भाजीपाल्याचा बाजारभाव कमी झाला तरी बाकी भाजीपाला पिकातून आम्हाला उत्पन्न मिळते. योग्य बाजारभाव मिळाल्यास कोणत्याही भाजीपाला पिकाला खर्च वजा करता पन्नास टक्के नफा हा आहेच.- राहुल दिघे, शेतकरी

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरी