शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

संकटे आली पण हार नाही मानली; मिरची, कारले, टोमॅटो अन् दोडक्यांनी शेतकऱ्यास केलं लखपती!

By विजय मुंडे  | Updated: March 20, 2024 18:41 IST

दोन एकर शेतात मिरची, कारले, टोमॅटो आणि दोडक्यांचे उत्पादन घेऊन सहा लाखांचा नफा मिळविला आहे.

- योगेश मोरेसेलगाव : शेती कसताना अनेक संकटे येतात. परंतु, यावरही मात करीत नियोजनबद्ध शेती केली तर लाखोंचे उत्पन्न मिळविता येते याची प्रचिती चितोडा (ता. बदनापूर) येथील युवा शेतकरी राहुल दिघे यांच्याकडे पाहिल्यानंतर येते. दिघे यांनी चालू वर्षात दोन एकर शेतात मिरची, कारले, टोमॅटो आणि दोडक्यांचे उत्पादन घेऊन सहा लाखांचा नफा मिळविला आहे.

चितोडा येथील शेतकरी राहुल अशोकराव दिघे हे गत सहा वर्षांपासून भाजीपाला पिकवत आहेत. २० एकर शेतीपैकी २ एकर क्षेत्रामध्ये बाराही भाजीपाला पिकविला जातो. प्रामुख्याने मेथी, कोथिंबीर, टोमॅटो, कारले, शिमला मिरची, काकडी, दोडके या भाजीपाला पिकांचे ते उत्पन्न घेतात. भाजीपाला पिकवताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ते करीत आहेत. यावर्षी त्यांना मिरची, कारले, टोमॅटो व दोडके या पिकांचा सरासरी उत्पन्नातून ६ लाखांचा निव्वळ नफा झाला आहे. त्यासाठी जवळपास खर्च हा १० लाख रुपये झाला आहे. उत्पन्न चांगले असले तरीही बदलत्या हवामानामुळे भाजीपाला पिकावर परिणाम होतो. तापमान वाढीमुळे भाजीपाला पिवळा पडतो तर अचानक ढगाळ वातावरण झाल्यामुळे रोगराई वाढते.

दोघे बंधू कृषी पदवीधारकराहुल दिघे आणि त्यांचा मोठा भाऊ अरुण दिघे हे दोघेही कृषी पदविकाधारक आहेत. त्यामुळे शेतीतील नवनवीन प्रयोग करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. यामध्ये त्यांना त्यांचे वडील अशोकराव दिघे यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते.

म्हणून पाणी कमी लागते, गवतही कमी येतेभाजीपाल्यासाठी ते मल्चिंग, बेड पद्धतीचा ते प्रामुख्याने वापर करतात. मल्चिंगमुळे पाणी कमी लागते, रोगप्रतिकारक क्षमता वाढते, गवत कमी प्रमाणात होते तसेच जास्त काळ ओलावा टिकून राहतो. शेडनेटचा देखील ते वापर करतात. योग्य ती खताची मात्रा देतात तसेच योग्य ती फवारणी देखील करतात. यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन हाती पडते.

पन्नास टक्के नफामागील सहा वर्षांपासून आम्ही भाजीपाला पीक घेत आहोत. भाजीपाला उत्पादनासाठी विशेष नियोजन करावे लागते. कोणतीही एकच भाजी न पिकवता सोबत तीन ते चार पिके घेतली जातात. त्यामुळे एखाद्या भाजीपाल्याचा बाजारभाव कमी झाला तरी बाकी भाजीपाला पिकातून आम्हाला उत्पन्न मिळते. योग्य बाजारभाव मिळाल्यास कोणत्याही भाजीपाला पिकाला खर्च वजा करता पन्नास टक्के नफा हा आहेच.- राहुल दिघे, शेतकरी

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरी