शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

क्वारंटाईन नागरिकांच्या मतदानासाठी प्रशासनाने राखीव ठेवला अर्ध्या तासाचा वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:25 IST

जालना जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. कोरोनाच्या ...

जालना जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच होम क्वारंटाईन असलेल्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रशासनाने राखीव अर्ध्या तासाचा वेळ ठेवला आहे. ५ वाजेनंतर सर्व होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींना मतदान करता येणार आहे. त्यांना तोंडाला मास्क बांधणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच सॅनिटायझरची व्यवस्थादेखील करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ४३४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

क्वारंटाईनसाठी मतदानाची वेळ राखीव

पाच वाजेपर्यंत नागरिक मतदान करतील. त्यानंतर गर्दी कमी झाल्यावर क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींना ५ ते ५.३० या वेळेत मतदान करता येणार आहे. मतदान करताना त्यांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. सुरक्षित अंतर ठेवण्याचेही सांगण्यात आले आहे. क्वारंटाईन व्यक्तीची जबाबदारी ही केंद्राध्यक्षांकडे देण्यात आली आहे. इतरांनीही सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

क्वारंटाईसाठी सॅनिटायझरची केली व्यवस्था

क्वारंटाईन व्यक्तीला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रत्येक केंद्रावर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या व्यक्तीने मतदान केल्यानंतर मशीन सॅनिटायझरने साफ केली जाईल. केंद्राध्यक्षांसह इतर कर्मचाऱ्यांना वारंवार सॅनिटायझरने हात धुण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदानासाठी सुरक्षित अंतर पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मास्क असताना ओळख पटणार?

क्वारंटाईन व्यक्तीला मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी गावातील ग्रामसेवकास विचारले जाणार आहे. त्यानंतरच संबंधित क्वारंटाईन व्यक्तीला मतदान करता येणार आहे.

शुक्रवारी ४४६ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. यासाठी प्रशासन सज्ज आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करूनच निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल. जिल्ह्यात होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींसाठी अर्ध्या तासाचा वेळ राखीव ठेवण्यात आला

आहे.

-निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा, कोट