शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

क्वारंटाईन नागरिकांच्या मतदानासाठी प्रशासनाने राखीव ठेवला अर्ध्या तासाचा वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:25 IST

जालना जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. कोरोनाच्या ...

जालना जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच होम क्वारंटाईन असलेल्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रशासनाने राखीव अर्ध्या तासाचा वेळ ठेवला आहे. ५ वाजेनंतर सर्व होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींना मतदान करता येणार आहे. त्यांना तोंडाला मास्क बांधणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच सॅनिटायझरची व्यवस्थादेखील करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ४३४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

क्वारंटाईनसाठी मतदानाची वेळ राखीव

पाच वाजेपर्यंत नागरिक मतदान करतील. त्यानंतर गर्दी कमी झाल्यावर क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींना ५ ते ५.३० या वेळेत मतदान करता येणार आहे. मतदान करताना त्यांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. सुरक्षित अंतर ठेवण्याचेही सांगण्यात आले आहे. क्वारंटाईन व्यक्तीची जबाबदारी ही केंद्राध्यक्षांकडे देण्यात आली आहे. इतरांनीही सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

क्वारंटाईसाठी सॅनिटायझरची केली व्यवस्था

क्वारंटाईन व्यक्तीला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रत्येक केंद्रावर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या व्यक्तीने मतदान केल्यानंतर मशीन सॅनिटायझरने साफ केली जाईल. केंद्राध्यक्षांसह इतर कर्मचाऱ्यांना वारंवार सॅनिटायझरने हात धुण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदानासाठी सुरक्षित अंतर पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मास्क असताना ओळख पटणार?

क्वारंटाईन व्यक्तीला मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी गावातील ग्रामसेवकास विचारले जाणार आहे. त्यानंतरच संबंधित क्वारंटाईन व्यक्तीला मतदान करता येणार आहे.

शुक्रवारी ४४६ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. यासाठी प्रशासन सज्ज आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करूनच निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल. जिल्ह्यात होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींसाठी अर्ध्या तासाचा वेळ राखीव ठेवण्यात आला

आहे.

-निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा, कोट