शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

क्वारंटाईन नागरिकांच्या मतदानासाठी प्रशासनाने राखीव ठेवला अर्ध्या तासाचा वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:25 IST

जालना जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. कोरोनाच्या ...

जालना जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच होम क्वारंटाईन असलेल्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रशासनाने राखीव अर्ध्या तासाचा वेळ ठेवला आहे. ५ वाजेनंतर सर्व होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींना मतदान करता येणार आहे. त्यांना तोंडाला मास्क बांधणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच सॅनिटायझरची व्यवस्थादेखील करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ४३४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

क्वारंटाईनसाठी मतदानाची वेळ राखीव

पाच वाजेपर्यंत नागरिक मतदान करतील. त्यानंतर गर्दी कमी झाल्यावर क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींना ५ ते ५.३० या वेळेत मतदान करता येणार आहे. मतदान करताना त्यांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. सुरक्षित अंतर ठेवण्याचेही सांगण्यात आले आहे. क्वारंटाईन व्यक्तीची जबाबदारी ही केंद्राध्यक्षांकडे देण्यात आली आहे. इतरांनीही सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

क्वारंटाईसाठी सॅनिटायझरची केली व्यवस्था

क्वारंटाईन व्यक्तीला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रत्येक केंद्रावर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या व्यक्तीने मतदान केल्यानंतर मशीन सॅनिटायझरने साफ केली जाईल. केंद्राध्यक्षांसह इतर कर्मचाऱ्यांना वारंवार सॅनिटायझरने हात धुण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदानासाठी सुरक्षित अंतर पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मास्क असताना ओळख पटणार?

क्वारंटाईन व्यक्तीला मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी गावातील ग्रामसेवकास विचारले जाणार आहे. त्यानंतरच संबंधित क्वारंटाईन व्यक्तीला मतदान करता येणार आहे.

शुक्रवारी ४४६ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. यासाठी प्रशासन सज्ज आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करूनच निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल. जिल्ह्यात होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींसाठी अर्ध्या तासाचा वेळ राखीव ठेवण्यात आला

आहे.

-निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा, कोट