शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

शेतकरी कर्जमुक्तीचेच ध्येय- आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:44 IST

शेतकरी हा गुन्हेगार नसून तो अन्नदाता असल्याचे प्रतिपादन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्याला जोपर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती आम्ही देत नाही, तोपर्यंत तो समाधानी होणार नाही. त्यामुळे आमचे आगामी ध्येय हे कर्जमाफी नसून सरसकट कर्जमुक्ती हे आहे. माफी तर गुन्हेगाराला केली जाते. शेतकरी हा गुन्हेगार नसून तो अन्नदाता असल्याचे प्रतिपादन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा शनिवारी जालन्यात आली होती. यावेळी त्यांनी जुन्या मोंढ्यात आयोजित शेतकऱ्यांशी संवाद साधला. प्रारंभी रेशीम विभागाच्या वतीने आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन केले. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांपासून आपण संपूर्ण महाराष्ट्रात जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने फिरून शेतकरी, नागरिकांचे प्रश्न जाणून घेत आहोत. तसेच लोकसभेमध्ये त्यांनी युतीला जी भरभरून साथ दिली त्याबद्दल आभार मानत आहोत. दौ-याच्या निमित्ताने जनतेच्या कोणत्या अडीअडचणी आहेत, हे समजून येत आहे. आमच्यावर जनतेचा विश्वास आणि प्रेम असल्याने आमची जबाबदारी वाढली आहे. शिवसेनेकडे येणा-याला निश्चित दिलासा मिळतो, असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही यात्रा नसून निवडणुकीमध्ये तुम्ही युतीला साथ देणारच यात शंका नाही. निवडणुका येतात आणि जातात त्यात हार आणि जीत हेही ठरलेले असते. आम्ही जिंकलो तरी तरी तुमच्या सोबत राहू आणि हरलो तरी तुमच्या सोबत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. सरकारमध्ये असो किंवा नसो; कर्जमुक्ती हे आमचे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. जनता जनार्दन हाच आमचा देव असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. जनआशीर्वाद यात्रा म्हणजेच खºया अर्थाने लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठीची ही तीर्थयात्रा असल्याचा उल्लेखही ठाकरे यांनी केला.कार्यक्रमास माजी खा. चंद्रकांत खैरे, आ. अंबादास दानवे, शिवसेना नेते विनोद घोसाळकर, लक्ष्मण वडले, भास्कर अंबेकर, शिवाजी चोथे, संतोष सांबरे, ए.जे. बोराडे, अनिरूद्ध खोतकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांचीही उपस्थिती होती.वीज बिलाच्या मुद्यावर लक्ष घालूजालना : विदर्भातील उद्योजकांना जी विजेच्या बिलात सबसिडी देण्यात त्याच धर्तीवर मराठवाड्यातील उद्योजकांनाही ती द्यावी अशी मागणी येथील उद्योजकांनी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. ठाकरे यांनी सभा संपल्यावर येथील उद्योजकांशी चर्चा केली. यावेळी आज उशीर झाला आहे, त्यामुळे मी भाषण करणार नाही, परंतु त्यांनी  उद्योजकांची भेट घेऊन दहा ते पंधरा मिनिटे चर्चा केली. त्यावेळी या महत्वाच्या प्रश्नावर आपण मुंबईत उर्जामंत्र्यांसोबत बैठक बोलावून हा प्रश्न निश्चित मार्गी लावू, असे आश्वासन दिले.रेशीम कापड निर्मितीचा उद्योग उभारणार- खोतकरचीनमधून भारतामध्ये आलेले रेशीम पीक आता संपूर्ण भारतभर झपाट्याने विकसित झाले आहे. अत्यल्प पाण्यामध्ये खात्रीपूर्ण उत्पादन देणारे पीक म्हणून याकडे पाहिले जात आहे. महाराष्ट्रात जालना जिल्हा रेशीम उत्पादनात आघाडीवर आहे. त्यामुळे येथे पहिली रेशीम कोष खरेदी आपण सुरू केली. आता यासाठी इमारत बांधणार असून, भविष्यात जालन्यात रेशीम कापड निर्मितीचा उद्योग उभारणीचा मानस असून, त्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांजवळ शब्द टाकावा, अशी अपेक्षा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMarketबाजारbusinessव्यवसायAditya Thackreyआदित्य ठाकरे