शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यात कसूर केल्यास कारवाई- केंद्रेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:36 IST

सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी शासनाच्या विविध योजना सूक्ष्म नियोजन करुन कल्पकतेने राबविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे. निवडणुकीच्या कामात हयगय अथवा दिरंगाई करणा-या अधिकारी, कर्मचा-यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने मजुरांच्या हाताला काम, पिण्याला पाणी व जनावरांना चारा उपलब्धतेबरोबरच दुष्काळी परिस्थिती ही संधी समजून सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी शासनाच्या विविध योजना सूक्ष्म नियोजन करुन कल्पकतेने राबविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आगामी लोकसभा निवडणूक, दुष्काळी परिस्थिती, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, एमआरईजीएस यासह विविध योजनांचा आढावा विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी आयोजित बैठकीत उपस्थित अधिका-यांकडून घेतला.यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संगीता सानप, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) कमलाकर फड, जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर, उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.निवडणूक विषयक आढावा घेताना विभागीय आयुक्त केंद्रेकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी यंत्रणेने सज्ज रहावे. निवडणुकीसाठी स्थापन करण्यात येणा-या बुथच्या ठिकाणी पाणी, वीज, रँप यासारख्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. येत्या एक आठवड्यात जिल्ह्यातील सर्व बुथ तयार असतील या दृष्टिकोनातून अधिकाºयांनी काम करावे. निवडणुकांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणुका शांततेत व सुरळीतपणे होण्यासाठी निवडणुकांमध्ये बाधा ठरणाºया गुन्हेगारांवर पोलीस विभागाने आवश्यक ती कारवाई करावी. निवडणुकांमध्ये अधिकाºयांना देण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पडेल याबाबत दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लागू केली असून, पात्र शेतकरी कुटूंबाच्या याद्या संकलित करुन पाठविण्याचे शासनाने निर्देश दिलेले आहेत. या कामात जिल्ह्यातील अधिका-यांनी वैयक्तिक लक्ष घालून आवश्यक ती माहिती संकलित करण्यात यावी. हे काम वेगाने होईल यादृष्टीने अधिका-यांनी प्रयत्न करण्याच्या सूचना करत दुष्काळी अनुदानापोटी शेतक-यांना द्यावयाच्या अनुदानाच्या कामाचाही वेग वाढविण्यात यावा व कमी वेळात अधिकाधिक शेतक-यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. यावेळी खपले यांची केंद्रेकर यांनी चांगलीच कानउघाडणी केली.सूचना : रस्त्याची कामे रोहयोमार्फत कराटंचाईच्या अनुषंगाने जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मागेल त्याला काम उपलब्ध करुन देण्याबरोबरच ग्रामीण भागात रस्त्यांची कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन करण्याला प्राधान्य देण्यात यावे. मागणीनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा. टँकरद्वारे पाणी पुरवठा करताना प्रत्येक टँकरवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. टँकरद्वारे करण्यात येणा-या पाणीपुरवठ्यासाठी पाण्याचा उदभव जवळच असेल याची खातरजमा करुन घेण्यात यावी. तसेच सामूहिक विहिरींना मंजुरी देऊन ही कामे त्वरेने करण्यात यावीत. टँकरद्वारे करण्यात येणारा पाणी पुरवठा पारदर्शीपणे होतो आहे किंवा नाही, याची अधिकाºयांनी प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचनाही यावेळी केंद्रेकर यांनी दिल्या.

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाgovernment schemeसरकारी योजना