शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

पाणीपुरवठ्यासाठी २१० विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 01:11 IST

वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. परिणामी अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून ५९ गावांसह आठ वाड्यांमध्ये ६८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, २१० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. परिणामी अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून ५९ गावांसह आठ वाड्यांमध्ये ६८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, २१० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.जिल्ह्यात उन्हाचा पारा ४१ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे जलस्त्रोतांमधील पाणी आटत आहे. याचा परिणाम ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावही झाला आहे.अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी महिलांना दूरच्या विहिरीवरून शेंदून पाणी आणावे लागत आहे. पाणीटंचाई जाणवत असलेल्या ५९ गावांसह आठ वाड्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. भोकरदन व जाफराबाद तालुक्यात सर्वाधिक टंचाईग्रस्त गावे आहेत. तुलनेत जालना, बदनापूर, घनसावंगी तालुक्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी आहे. अंबड आणि मंठा तालुक्यातील एकाही गावात सध्या तरी टंचाईसदृश्य परिस्थिती नसल्याने एकही टँकर सुरू करण्यात आलेले नाही. सध्या जिल्ह्यात ५९ गावे व आठ वाड्यांसाठी १९ शासकीय तसेच ४९ खाजगी, अशा एकून ६८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर भरण्यसाठी ६५ व टँकरव्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी १४५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे येत्या काही दिवसात टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत भर पडण्याची शक्यता आहे.२४ तासांत टँकरद्वारे पाणीपुरवठ्याच्या सूचनापिण्याच्या पाण्याचे कोणतेही स्त्रोत नसलेल्या टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी सरपंचांनी प्रस्ताव सादर केल्यापासून २४ तासात टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. कामात हयगय केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBabanrao Looneykarबबनराव लोणीकर