शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्यासाठी २१० विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 01:11 IST

वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. परिणामी अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून ५९ गावांसह आठ वाड्यांमध्ये ६८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, २१० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. परिणामी अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून ५९ गावांसह आठ वाड्यांमध्ये ६८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, २१० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.जिल्ह्यात उन्हाचा पारा ४१ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे जलस्त्रोतांमधील पाणी आटत आहे. याचा परिणाम ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावही झाला आहे.अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी महिलांना दूरच्या विहिरीवरून शेंदून पाणी आणावे लागत आहे. पाणीटंचाई जाणवत असलेल्या ५९ गावांसह आठ वाड्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. भोकरदन व जाफराबाद तालुक्यात सर्वाधिक टंचाईग्रस्त गावे आहेत. तुलनेत जालना, बदनापूर, घनसावंगी तालुक्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी आहे. अंबड आणि मंठा तालुक्यातील एकाही गावात सध्या तरी टंचाईसदृश्य परिस्थिती नसल्याने एकही टँकर सुरू करण्यात आलेले नाही. सध्या जिल्ह्यात ५९ गावे व आठ वाड्यांसाठी १९ शासकीय तसेच ४९ खाजगी, अशा एकून ६८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर भरण्यसाठी ६५ व टँकरव्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी १४५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे येत्या काही दिवसात टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत भर पडण्याची शक्यता आहे.२४ तासांत टँकरद्वारे पाणीपुरवठ्याच्या सूचनापिण्याच्या पाण्याचे कोणतेही स्त्रोत नसलेल्या टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी सरपंचांनी प्रस्ताव सादर केल्यापासून २४ तासात टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. कामात हयगय केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBabanrao Looneykarबबनराव लोणीकर