शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

पाणीपुरवठ्यासाठी २१० विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 01:11 IST

वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. परिणामी अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून ५९ गावांसह आठ वाड्यांमध्ये ६८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, २१० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. परिणामी अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून ५९ गावांसह आठ वाड्यांमध्ये ६८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, २१० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.जिल्ह्यात उन्हाचा पारा ४१ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे जलस्त्रोतांमधील पाणी आटत आहे. याचा परिणाम ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावही झाला आहे.अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी महिलांना दूरच्या विहिरीवरून शेंदून पाणी आणावे लागत आहे. पाणीटंचाई जाणवत असलेल्या ५९ गावांसह आठ वाड्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. भोकरदन व जाफराबाद तालुक्यात सर्वाधिक टंचाईग्रस्त गावे आहेत. तुलनेत जालना, बदनापूर, घनसावंगी तालुक्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी आहे. अंबड आणि मंठा तालुक्यातील एकाही गावात सध्या तरी टंचाईसदृश्य परिस्थिती नसल्याने एकही टँकर सुरू करण्यात आलेले नाही. सध्या जिल्ह्यात ५९ गावे व आठ वाड्यांसाठी १९ शासकीय तसेच ४९ खाजगी, अशा एकून ६८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर भरण्यसाठी ६५ व टँकरव्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी १४५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे येत्या काही दिवसात टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत भर पडण्याची शक्यता आहे.२४ तासांत टँकरद्वारे पाणीपुरवठ्याच्या सूचनापिण्याच्या पाण्याचे कोणतेही स्त्रोत नसलेल्या टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी सरपंचांनी प्रस्ताव सादर केल्यापासून २४ तासात टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. कामात हयगय केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBabanrao Looneykarबबनराव लोणीकर