शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

आचार्य भानुकवी साहित्य संमेलन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:32 IST

अभिजात मराठी भाषा परिषद, आचार्य भानुकवीश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेद्वारे आयोजित पहिले राज्यस्तरीय आचार्य भानुकवी मराठी साहित्य अंबडमधील पंडित जळगावकर नाट्यगृहात रविवारी उत्साहात पार पडले.

अंबड : अभिजात मराठी भाषा परिषद, आचार्य भानुकवीश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेद्वारे आयोजित पहिले राज्यस्तरीय आचार्य भानुकवी मराठी साहित्य अंबडमधील पंडित जळगावकर नाट्यगृहात रविवारी उत्साहात पार पडले.साहित्य संमेलनाचे उदघाटन आ. नारायण कुचे यांच्या हस्ते झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी प्रा.शिवाजी हुसे होते. या वेळी डॉ. अशोक देशमाने, डॉ. सुशीला सोलापुरे, डॉ. संजीवनी तडेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.सकाळी श्रीपंचकृष्ण ज्ञानाश्रम ठाकूरनगर अंबड येथून ग्रंथदिंडीचा प्रारंभ झाला. प्राचार्य डॉ. भागवतराव कटारे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उदघाटन झाले. यावेळी राज्यस्तरीय आचार्य भानुकवी वाङ्मय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी डॉ. अशोक देशमाने म्हणाले, की मराठीचा मूळ पाया महानुभाव आहे. मराठी विद्यापीठ चक्रधर स्वामींच्या नावे झाल्यास ती गौरवाची बाब ठरेल. आचार्य शेवलीकर बाबा यांनी मराठीच्या संदर्भात काम करताना महानुभावांचे आद्यत्व का स्वीकारत नाही, असा साहित्यिकांना आणि शासनाला खडा सवाल केला. साहित्य आणि साहित्य संमेलन हे कुणाही एकाची मक्तेदारी नसून साहित्य हे समाजाला दिशा देण्याचे काम करत असल्याचे ते म्हणाले.परिसंवादात 'महानुभाव साहित्यिकांचे मराठी साहित्याला योगदान या विषयावर बोलताना अध्यक्ष डॉ. बळवंत भोयर यांनी मराठी भाषेचे जनक चक्रधर स्वामीच आहेत असे मत मांडले. सहभागामध्ये डॉ. राम रौनेकर यांनी साहित्य हे एककेंद्री नसून सर्व घटकांचा समावेश त्यात असावा, असे मत व्यक्त केले. डॉ. सर्जेराव जिगे यांनी महाराष्ट्रातील बोली भाषेला मराठी बनवण्याचे काम महानुभाव संप्रदायाने केले, असे मत व्यक्त केले. डॉ मारोती घुगे यांनी भास्करभट्ट बोरीकरपासून ते भानुकवी यांच्या पर्यंतचे साहित्यिक हा मायबोलीचा अभिमान असल्याची भूमिका मांडली. तर प्रा. राजकुमार शेंडे यांनी साडेसहा हजार ग्रंथसंपदा महानुभाव संप्रदायाने मराठीला दिल्याचे सांगितले.संमेलनासाठी महंत दिवाकर बाबा जामोदेकर, लीलाबाई जामोदेकर, महिमा जामोदेकर, अंकुश चव्हाण, गिरीधर राजपूत, प्रा.दीपक राखूनडे, प्रा.मारोती घुगे, अशोक डोरले, प्रा.उबाळ, प्रा.सुलभा मुरलीधर, प्रा.विद्या दिवटे, प्रा.भारत भूषणशास्त्री, लक्ष्मण गोडसे, राहुल कासोदे, ज्ञानेश्वरी लाड, प्रीती होंडे, मनीषा होंडे, सपना पाटेकर, श्रुती लहाने, अनिशा होंडे, प्रियांका चिंतामणी, प्रतीक्षा मुंजाळ, मनीषा सानप, नंदिनी काळवणे, शिवराज गायकवाड, दिग्विजय उबाळे, अनिरुद्ध मिसाळ, विलास मोरे आदींनी परिश्रम घेतले.--------------एकपात्री प्रयोगही रंगलादुपारी दोन ते दीड या कालावधीत 'मी महदंबा बोलतेय हा एकपात्री प्रयोग वनिताताई गायकवाड यांनी सादर केला. चक्रधर स्वामींनी त्या काळात स्त्रियांना दिलेल्या अधिकारामुळेच आज आम्ही कणखर महदंबा बनल्या असल्याचे सांगितले. जागर जाणिवांचा हा समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम डॉ. विनोद जाधव आणि संचाने सादर करीत संमेलनाला बहारदार रंगत आणली. ज्ञानेश्वरी लाड यांनी लावणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.