शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

आचार्य भानुकवी साहित्य संमेलन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:32 IST

अभिजात मराठी भाषा परिषद, आचार्य भानुकवीश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेद्वारे आयोजित पहिले राज्यस्तरीय आचार्य भानुकवी मराठी साहित्य अंबडमधील पंडित जळगावकर नाट्यगृहात रविवारी उत्साहात पार पडले.

अंबड : अभिजात मराठी भाषा परिषद, आचार्य भानुकवीश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेद्वारे आयोजित पहिले राज्यस्तरीय आचार्य भानुकवी मराठी साहित्य अंबडमधील पंडित जळगावकर नाट्यगृहात रविवारी उत्साहात पार पडले.साहित्य संमेलनाचे उदघाटन आ. नारायण कुचे यांच्या हस्ते झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी प्रा.शिवाजी हुसे होते. या वेळी डॉ. अशोक देशमाने, डॉ. सुशीला सोलापुरे, डॉ. संजीवनी तडेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.सकाळी श्रीपंचकृष्ण ज्ञानाश्रम ठाकूरनगर अंबड येथून ग्रंथदिंडीचा प्रारंभ झाला. प्राचार्य डॉ. भागवतराव कटारे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उदघाटन झाले. यावेळी राज्यस्तरीय आचार्य भानुकवी वाङ्मय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी डॉ. अशोक देशमाने म्हणाले, की मराठीचा मूळ पाया महानुभाव आहे. मराठी विद्यापीठ चक्रधर स्वामींच्या नावे झाल्यास ती गौरवाची बाब ठरेल. आचार्य शेवलीकर बाबा यांनी मराठीच्या संदर्भात काम करताना महानुभावांचे आद्यत्व का स्वीकारत नाही, असा साहित्यिकांना आणि शासनाला खडा सवाल केला. साहित्य आणि साहित्य संमेलन हे कुणाही एकाची मक्तेदारी नसून साहित्य हे समाजाला दिशा देण्याचे काम करत असल्याचे ते म्हणाले.परिसंवादात 'महानुभाव साहित्यिकांचे मराठी साहित्याला योगदान या विषयावर बोलताना अध्यक्ष डॉ. बळवंत भोयर यांनी मराठी भाषेचे जनक चक्रधर स्वामीच आहेत असे मत मांडले. सहभागामध्ये डॉ. राम रौनेकर यांनी साहित्य हे एककेंद्री नसून सर्व घटकांचा समावेश त्यात असावा, असे मत व्यक्त केले. डॉ. सर्जेराव जिगे यांनी महाराष्ट्रातील बोली भाषेला मराठी बनवण्याचे काम महानुभाव संप्रदायाने केले, असे मत व्यक्त केले. डॉ मारोती घुगे यांनी भास्करभट्ट बोरीकरपासून ते भानुकवी यांच्या पर्यंतचे साहित्यिक हा मायबोलीचा अभिमान असल्याची भूमिका मांडली. तर प्रा. राजकुमार शेंडे यांनी साडेसहा हजार ग्रंथसंपदा महानुभाव संप्रदायाने मराठीला दिल्याचे सांगितले.संमेलनासाठी महंत दिवाकर बाबा जामोदेकर, लीलाबाई जामोदेकर, महिमा जामोदेकर, अंकुश चव्हाण, गिरीधर राजपूत, प्रा.दीपक राखूनडे, प्रा.मारोती घुगे, अशोक डोरले, प्रा.उबाळ, प्रा.सुलभा मुरलीधर, प्रा.विद्या दिवटे, प्रा.भारत भूषणशास्त्री, लक्ष्मण गोडसे, राहुल कासोदे, ज्ञानेश्वरी लाड, प्रीती होंडे, मनीषा होंडे, सपना पाटेकर, श्रुती लहाने, अनिशा होंडे, प्रियांका चिंतामणी, प्रतीक्षा मुंजाळ, मनीषा सानप, नंदिनी काळवणे, शिवराज गायकवाड, दिग्विजय उबाळे, अनिरुद्ध मिसाळ, विलास मोरे आदींनी परिश्रम घेतले.--------------एकपात्री प्रयोगही रंगलादुपारी दोन ते दीड या कालावधीत 'मी महदंबा बोलतेय हा एकपात्री प्रयोग वनिताताई गायकवाड यांनी सादर केला. चक्रधर स्वामींनी त्या काळात स्त्रियांना दिलेल्या अधिकारामुळेच आज आम्ही कणखर महदंबा बनल्या असल्याचे सांगितले. जागर जाणिवांचा हा समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम डॉ. विनोद जाधव आणि संचाने सादर करीत संमेलनाला बहारदार रंगत आणली. ज्ञानेश्वरी लाड यांनी लावणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.