शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

सलग दुसऱ्या दिवशी अपघात : अंबड चौफुली ठरतेय जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:40 IST

या चौफुलीच्या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आल्याने रस्ते गुळगुळीत झाले आहेत. त्यामुळे तेथे प्रत्येकजणच वेगात वाहने चालवत असतो, त्याचा परिणाम ...

या चौफुलीच्या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आल्याने रस्ते गुळगुळीत झाले आहेत. त्यामुळे तेथे प्रत्येकजणच वेगात वाहने चालवत असतो, त्याचा परिणाम हा अपघात होण्यास कारणीभूत ठरत असल्याचे वाहतूक शाखेचे म्हणणे आहे. नवीन रस्त्यांमुळे कोण कुठून येत आहे याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आधी येथे भगवती पुरोहित संघाने पुढाकार घेऊन गतिरोधक बसविले होते. त्यानंतर अपघात कमी झाले हाेते याची आठवण पुरोहित संघाचे अध्यक्ष विनायक महाराज फुलंब्रीकर यांनी करून दिली. हे गतिरोधक पुन्हा बसविल्यास त्याचा चांगला परिणाम होऊ शकेल.

सिग्नल व्यवस्था गरजेची

जालन्यातील या अंबड चौफुलीवर स्वयंचलित सिग्नल व्यवस्था बसविण्याची गरज असून, त्यामुळे ही यंत्रणा २४ तास सुरू राहिल्यास मोठा परिणाम होऊन अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होऊ शकते. हा राज्यमार्ग असल्याने येथे सिग्नल अथवा स्पीडब्रेकर बसविता येत नाहीत. परंतु काही ठिकाणी नियमांना अपवाद करून तेथे चारही बाजूंनी गतिरोधक न बसविल्यास अनेक अपघात होऊन अनेकांचे हकनाक बळी जातील असे सांगण्यात आले.

चौकट

जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष घालावे

अंबड चौफुलीवर गेल्या दोन वर्षांत जवळपास ३५ पेक्षा अधिक अपघात झाले आहेत. यात दोन वर्षांत २८ जणांचे बळी या चौफुलीवरील अपघाताने घेतले आहेत. त्यामुळे येथे सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगून येथे तातडीने गतिरोधक बसविल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास निश्चित मदत होणार आहे.

------------------------------------------------------