शहरं
Join us  
Trending Stories
1
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
2
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
3
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
4
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
5
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
6
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
7
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
8
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
9
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
10
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
11
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
12
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
13
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
14
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
15
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
16
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
17
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
18
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
19
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
20
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा

सलग दुसऱ्या दिवशी अपघात : अंबड चौफुली ठरतेय जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:40 IST

या चौफुलीच्या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आल्याने रस्ते गुळगुळीत झाले आहेत. त्यामुळे तेथे प्रत्येकजणच वेगात वाहने चालवत असतो, त्याचा परिणाम ...

या चौफुलीच्या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आल्याने रस्ते गुळगुळीत झाले आहेत. त्यामुळे तेथे प्रत्येकजणच वेगात वाहने चालवत असतो, त्याचा परिणाम हा अपघात होण्यास कारणीभूत ठरत असल्याचे वाहतूक शाखेचे म्हणणे आहे. नवीन रस्त्यांमुळे कोण कुठून येत आहे याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आधी येथे भगवती पुरोहित संघाने पुढाकार घेऊन गतिरोधक बसविले होते. त्यानंतर अपघात कमी झाले हाेते याची आठवण पुरोहित संघाचे अध्यक्ष विनायक महाराज फुलंब्रीकर यांनी करून दिली. हे गतिरोधक पुन्हा बसविल्यास त्याचा चांगला परिणाम होऊ शकेल.

सिग्नल व्यवस्था गरजेची

जालन्यातील या अंबड चौफुलीवर स्वयंचलित सिग्नल व्यवस्था बसविण्याची गरज असून, त्यामुळे ही यंत्रणा २४ तास सुरू राहिल्यास मोठा परिणाम होऊन अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होऊ शकते. हा राज्यमार्ग असल्याने येथे सिग्नल अथवा स्पीडब्रेकर बसविता येत नाहीत. परंतु काही ठिकाणी नियमांना अपवाद करून तेथे चारही बाजूंनी गतिरोधक न बसविल्यास अनेक अपघात होऊन अनेकांचे हकनाक बळी जातील असे सांगण्यात आले.

चौकट

जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष घालावे

अंबड चौफुलीवर गेल्या दोन वर्षांत जवळपास ३५ पेक्षा अधिक अपघात झाले आहेत. यात दोन वर्षांत २८ जणांचे बळी या चौफुलीवरील अपघाताने घेतले आहेत. त्यामुळे येथे सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगून येथे तातडीने गतिरोधक बसविल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास निश्चित मदत होणार आहे.

------------------------------------------------------