शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

‘१३ तारखेच्या आत मागण्या मान्य करा’; ३ आमदारांच्या शिष्टमंडळाची जरांगे यांच्याशी तासभर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 06:31 IST

जरांगे यांचा ७ ऑगस्टपासून दौरा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी बार्शीचे राजेंद्र राऊत, बदनापूरचे नारायण कुचे, तुळजापूरचे राणाजगजितसिंह पाटील या तीन आमदारांच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन एक तास चर्चा केली.

वडीगोद्री (जि. जालना) : १३ ऑगस्टपर्यंत शासनाने मागण्या मान्य कराव्यात. आम्ही राजकारणात जाणार नाहीत; परंतु मागण्यांवर योग्य विचार न झाल्यास समाजाच्या म्हणण्यानुसार आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.

जरांगे यांचा ७ ऑगस्टपासून दौरा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी बार्शीचे राजेंद्र राऊत, बदनापूरचे नारायण कुचे, तुळजापूरचे राणाजगजितसिंह पाटील या तीन आमदारांच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन एक तास चर्चा केली. या चर्चेनंतर जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. विधानसभा काय असते हे निवडणुकीत कळेल. १३ ऑगस्टपर्यंत वेळ दिला आहे. त्यामुळे त्यांनी वेळेत मागण्या मान्य कराव्यात. त्यातही आमची बैठक २९ ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे २९ तारखेपर्यंत सरकारवर विश्वास ठेवणे आमचे काम आहे. त्यानंतर मात्र समाज सांगेल तो निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण