शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

धूलिवंदनादिनीच ऊसतोड कामगार कुटुंबावर दु:खाचा डोंगर; दोन मुलींचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

By विजय मुंडे  | Updated: March 26, 2024 19:16 IST

ही घटना एका महिलेने पाहिली. त्या महिलेने आरडाओरड करताच, आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली

गोंदी (जि.जालना) : कपडे धुण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलींचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी ऐन धूलिवंदनदिनी गोंदी गावच्या वैतागवाडी (ता.अंबड) शिवारात घडली.

अरसिंन हुसेन शेख (वय १४ रा.गोंदी), कमल सुभाष भालेराव (वय १४ रा.हलदोला ता.बदनापूर ह.मु.गोंदी शिवार) अशी मयत मुलींची नावे आहेत. अंबड तालुक्यातील गोंदी शिवारातील शेतात शेख, भालेराव हे ऊसतोड कुटुंबीय राहतात. धूलिवंदनाचा सण संपल्यानंतर सोमवारी दुपारी अरसिंन शेख व कमल भालेराव या दोन १४ वर्षीय मुली कपडे धुण्यासाठी वैतागवाडी शिवारातील बंधाऱ्यावर गेल्या होत्या. कपडे धूत असताना, अचानक पाय घसरून आतमध्ये पडल्याने त्या बुडू लागल्या.

ही घटना एका महिलेने पाहिली. त्या महिलेने आरडाओरड करताच, आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली, परंतु त्या दोघीही तोपर्यंत आतमध्ये बुडाल्या होत्या. तेथे आलेल्या नागरिकांनी बंधाऱ्यात उड्या घेऊन त्या दोघींचा शोध घेतला. त्यांना दवाखान्यात नेले असता, डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले. मयत मुलींच्या पार्थिवाचे गोंदी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. मयत कमल सुभाष भालेराव हिच्या पार्थिवाला हलदोला येथे, तर मयत अरसिंन हुसेन शेख हिच्या पार्थिवाला गोंदी येथील स्मशानभूमीत दफन करण्यात आले. याबाबत गोंदी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Jalanaजालना