शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अग्निशमनच्या जवानांवरच आपत्ती; निजामकालीन कार्यालयाचे छत कोसळल्याने कर्मचारी जखमी

By विजय मुंडे  | Updated: July 23, 2024 18:28 IST

जालना महापालिकेअंतर्गत असलेल्या अग्निशमन विभागाचे कामकाज गत अनेक वर्षांपासून निजामकालीन इमारतीत सुरू आहे.

जालना : आपत्ती व्यवस्थापनामध्ये मदतकार्यास धावून जाणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांवरच मंगळवारी २३ जुलै रोजी सकाळी जीवघेणी आपत्ती ओढवली ! निजामकालीन धोकादायक इमारतीचे छत कोसळल्याने आतमध्ये काम करणारा एक कर्मचारी जखमी झाला. तर सुदैवाने इमारतीबाहेर असलेले सहा ते सात कर्मचारी बचावले. दैनंदिन काम करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना पर्यायी व्यवस्था नाही. त्यात नवीन इमारतीतील अनेक कामे रखडल्याने कार्यालय स्थलांतरित झालेले नाही. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जीवाशी होणाऱ्या खेळास जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

जालना महापालिकेअंतर्गत असलेल्या अग्निशमन विभागाचे कामकाज गत अनेक वर्षांपासून निजामकालीन इमारतीत सुरू आहे. विशेषत: मागील चार-पाच वर्षांपासून या इमारतीची अवस्था खूपच बिकट झाली आहे. इथं धड बसण्यासाठी जागा व्यवस्थित नाही. पिण्याचे पाणी घरून आणावे लागते आणि शौचालयाचा तर पत्ताच नाही. अशा स्थितीतही या विभागात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामकाज करावे लागत होते.

अग्निशमन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले होते. सततच्या पाठपुराव्यानंतर २०२२-२३ मध्ये इमारतीसाठी एक कोटी ८० लाखांचा निधी मंजूर झाला; परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात मार्च-२०२४ मध्ये झाली; परंतु हे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. अशातच मंगळवारी सकाळी अचानक अग्निशमनचे कर्मचारी काम करीत असलेल्या निजामकालीन इमारतीचे छत कोसळले आणि त्यात चालक रवी देवानंद तायडे हे जखमी झाले. तर पंजाबराव देशमुख, विनायक चव्हाण, सादेक अली, नागेश घुगे, नितेश ढाकणे, अशोक गाडे, संदीप दराडे हे इमारतीबाहेर असल्याने बचावले. त्यांनी तातडीने तायडे यांना खासगी रुग्णालयात नेऊन उपचार केले. या घटनेमुळे शहरात मात्र एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :JalanaजालनाFire Brigadeअग्निशमन दलAccidentअपघात