शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

१ हजारांपैकी ९५४ तक्रारींचे निराकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:07 IST

जिल्हा परिषदेच्या विविध भागातील कामकाजाबाबत जिल्हाभरातून १०१३ तक्रारी धडकल्या होत्या. जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेत आजवर ९५४ तक्रारींचे निराकारण केले

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेच्या विविध भागातील कामकाजाबाबत जिल्हाभरातून १०१३ तक्रारी धडकल्या होत्या. जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेत आजवर ९५४ तक्रारींचे निराकारण केले. तर ५९ तक्रारी चौकशीवर असून, त्याही लवकरच निकाली लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.जिल्हा परिषद कार्यालयात १० विभाग आहे. यात पंचायत विभाग, शिक्षण प्राथमिक, शिक्षण माध्यमिक, महिला व बालकल्याण, डीआरडीए, ग्रामीण पाणी पुरवठा, बांधकाम, सिंचन, समाज कल्याण, वित्त विभाग, सामान्य प्रशासन व कृषी विभाग या विभागांचा समावेश आहे.या सर्व विभागांमध्ये ग्रामीण भागातील नागरिक दररोज आपली कामे घेऊन येतात. परंतु, अधिकारी व कर्मचारी त्यांची कामे करत नसल्याचा आरोप सतत होतो. काम होत नसल्याने अनेक नागरिक याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करतात. मागील वर्षभरात जिल्हा परिषदेकडे सर्व विभागांच्या १ हजार १३ तक्रारी प्राप्त झाल्या. यातील काही तक्रारी या आॅनलाईन पध्दतीने आल्या आहे. तर काही तक्रारी निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहे. या तक्रारींची जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेऊन त्यातील ९५४ तक्रारींचे निवारण केले आहे.तर ५९ तक्रारी अद्यापही प्रलंबीत आहे. काही तक्रारींची चौकशी करण्यात सुरु असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.सिंचन, शिक्षण विभागावर सर्वात जास्त रोष१ हजार तक्रारीपैकी जवळपास १५० ते २०० तक्रारी या शिक्षण विभागाच्या आल्या आहे. तर त्यापाठोपाठ सिंचन विभागाच्याही तक्रारी आहे. त्यामुळे या दोन विभागांवर नागरिकांचा सर्वाधिक रोष असल्याचे चित्र आहे.तक्रारींचे स्वरुपनमूना नंबर ८ न देणे, सेवा वेतन न देणे, दलित वस्तीच्या कामात भष्ट्राचार करणे, टँकर सुरु न करणे, शौचालयाच्या कामासाठी निधी न देणे इत्यादी प्रकारच्या तक्रारी झेडपीकडे प्राप्त झाल्या आहेत.प्रलंबित तक्रारीपंचायत विभाग ७, शिक्षण विभाग (प्राथ) ४, शिक्षण विभाग (माध्य) ३, महिला व बाल कल्याण १, डीआरडीए १, ग्रामीण पाणी पुरवठा १, बांधकाम विभाग २, समाजकल्याण विभाग २ तर बीडीओ जालना ७, बीडीओ भोकरदन ६, बीडीओ घनसावंगी ७, बीडीओ मंठा ९, बिडीओ जाफराबाद ८, बीडीओ अंबडच्या १० तक्रारी प्रलंबित आहेत.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदcivic issueनागरी समस्या