शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

जालन्यात तीन दिवसांत ७.९ मिलिमीटर पाऊस; वीज पडून २३ जनावरांसह १३८ कोंबड्यांचा मृत्यू

By दिपक ढोले  | Updated: April 28, 2023 18:16 IST

पावसाबरोबरच विजांचा कडकडाटही होत आहे. वीज पडून मनुष्यहानी झाली नसली तरीही जनावरांचा मृत्यू झाला आहे.

जालना : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. त्यातच २५ ते २७ एप्रिलदरम्यान पावसाचा जोर वाढला असून, जवळपास ७.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसाचा फटका १०१ गावांना बसला असून, २ हजार १६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. वीज पडून २३ जनावरांसह १३८ कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.

सध्या उन्हाळा सुरू आहे. असे असतानाही अवकाळी पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. काही ठिकाणी तर गारपीट झाली आहे. पावसाबरोबरच विजांचा कडकडाटही होत आहे. वीज पडून मनुष्यहानी झाली नसली तरीही जनावरांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होत आहे. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात ७.९ मिलीमीटर पाऊस झाला. यात सर्वाधिक पाऊस हा जालना तालुक्यात झाला आहे. जालना तालुक्यात १४.३० मिलीमीटर, घनसावंगीत ९.१० तर अंबड तालुक्यात ७.४० मिलीमीटर पाऊस झाला आहे. या पावसाचा फटका १०१ गावांना बसला असून, ३ हजार ३३२ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यात ४५ हेक्टरवरील जिरायती पिकांचे, १ हजार ६९३ हेक्टरवरील बागायती पिकांचे तर २७७ हेक्टवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.

टॅग्स :JalanaजालनाRainपाऊसagricultureशेती