शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

पाणी पुनर्वापरासाठी ६७ कोटींचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:25 IST

हा प्रकल्प उभारल्यास यातून जालन्यातून वाहून जाणाऱ्या पाण्यापैकी जवळपास २० एमएलडी. पाणी शुध्द करता येणार आहे. त्याचा वापर हा ...

हा प्रकल्प उभारल्यास यातून जालन्यातून वाहून जाणाऱ्या पाण्यापैकी जवळपास २० एमएलडी. पाणी शुध्द करता येणार आहे. त्याचा वापर हा येथील उद्योगांसाठी तसेच शेतीसाठी वापरता येणार आहे. यातून पाणी टंचाईवरही मोठी मात होणार आहे. जालन्यातील स्टील उद्योगाला मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज पडते. आजही हा उद्योग येथील वेगवेगळ्या विहिरींमधून टँकरव्दारे पाणी आणून चालू आहे. त्यामुळे पालिकेने जर लवकरात लवकर हा प्रकल्प प्रत्यक्षात आणल्यास याचा मोठा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले.

जालना पालिकेने या प्रकल्पा प्रमाणेच घनकचरा प्रकल्पा बाबतही आता हालचाली तीव्र केल्या आहेत. सामनगाव येथील घनकचरा प्रकल्प मंजूर असून, तो देखील अनेक कारणांमुळे लांबणीवर पडला आहे. या प्रकल्पातून कचऱ्यापासून जैविक खताची निर्मिती केली जाणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि जालना पालिका तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून साधारणपणे ११ वर्षापासून सुरू आहे. पुणे येथील एका कंपनीला हे काम दिले होते. परंतु नंतर हे काम त्यांच्याकडून काढून घेत दुसऱ्या कंपनीला दिले असल्याचे सांगण्यात आले.

घंटागाड्यांची डोकेदुखी

जालना शहरातील विविध प्रभागातून घंटागाड्यातून कचरा संकलन केले जाते. परंतु जवळपास १५ पेक्षा अधिक घंटागाड्या नादुरूस्त असून, त्याच्या दुरूस्तीसाठी आम्ही प्रयत्न करत असल्याची माहिती मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी दिली.