शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
4
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
5
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
6
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
7
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
8
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
9
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
10
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
11
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
12
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
13
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
14
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
15
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
16
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
17
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
18
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
19
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
20
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...

६०० हेक्टर जमीन ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:40 IST

शेतकऱ्यांमधून समाधान : जुई धरणातील कालव्याद्वारे पाणी दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणातील डाव्या व उजव्या कालव्याद्वारे ...

शेतकऱ्यांमधून समाधान : जुई धरणातील कालव्याद्वारे पाणी

दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणातील डाव्या व उजव्या कालव्याद्वारे रबी पिकांसाठी मंगळवारी पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा ६०० हेक्टरवरील रबी पिकांना फायदा होणार आहे.

डाव्या कालव्याद्वारे एक ते चार नंबर आउट लाइट तर उजव्या कालव्याद्वारे नऊ नंबर आउट लाइटपर्यंत हे पाणी सोडण्यात आले आहे. यापुढे दहा ते बारा दिवस हे पाणी सुरू राहणार आहे. यानंतर २० ते २५ दिवसांच्या कालावधीनंतर पुन्हा दुसरे पाणी सोडण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या पाण्याचा अपव्यय न करता पाण्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन जुई धरण प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. या पाण्यामुळे शेतकऱ्यांना रबी पिकांसह उन्हाळी पिकाचे नियोजन करता येणार असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. सद्यस्थितीत या धरणात भोकरदन शहर, दानापूर, सुरंगळी, करजगाव, कल्याणी, वाकडी, कुकडी, आव्हाना, कठोरा बाजार, मूर्तड, वरुड, पिंपळगाव (रे.), देहेड, भायडी, तळणी, दगडवाडी, विरेगाव, बाभूळगाव, सिपोरा बाजार या गावांसाठी राखीव पाणीसाठा ठेवण्यात आला आहे, अशी माहिती स्थापत्तीय अभियंता आर. एन. दरबस्तरवार यांनी दिली. कालव्याला पाणी सोडताना के. वाय. गायकवाड, पी. डी. गायकवाड, पंचायत समितीचे सदस्य सुदाम देठे, सोनुने, गायकवाड आदींची उपस्थिती होती.