शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

६०० हेक्टर जमीन ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:40 IST

शेतकऱ्यांमधून समाधान : जुई धरणातील कालव्याद्वारे पाणी दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणातील डाव्या व उजव्या कालव्याद्वारे ...

शेतकऱ्यांमधून समाधान : जुई धरणातील कालव्याद्वारे पाणी

दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणातील डाव्या व उजव्या कालव्याद्वारे रबी पिकांसाठी मंगळवारी पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा ६०० हेक्टरवरील रबी पिकांना फायदा होणार आहे.

डाव्या कालव्याद्वारे एक ते चार नंबर आउट लाइट तर उजव्या कालव्याद्वारे नऊ नंबर आउट लाइटपर्यंत हे पाणी सोडण्यात आले आहे. यापुढे दहा ते बारा दिवस हे पाणी सुरू राहणार आहे. यानंतर २० ते २५ दिवसांच्या कालावधीनंतर पुन्हा दुसरे पाणी सोडण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या पाण्याचा अपव्यय न करता पाण्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन जुई धरण प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. या पाण्यामुळे शेतकऱ्यांना रबी पिकांसह उन्हाळी पिकाचे नियोजन करता येणार असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. सद्यस्थितीत या धरणात भोकरदन शहर, दानापूर, सुरंगळी, करजगाव, कल्याणी, वाकडी, कुकडी, आव्हाना, कठोरा बाजार, मूर्तड, वरुड, पिंपळगाव (रे.), देहेड, भायडी, तळणी, दगडवाडी, विरेगाव, बाभूळगाव, सिपोरा बाजार या गावांसाठी राखीव पाणीसाठा ठेवण्यात आला आहे, अशी माहिती स्थापत्तीय अभियंता आर. एन. दरबस्तरवार यांनी दिली. कालव्याला पाणी सोडताना के. वाय. गायकवाड, पी. डी. गायकवाड, पंचायत समितीचे सदस्य सुदाम देठे, सोनुने, गायकवाड आदींची उपस्थिती होती.