शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

६० उमेदवार निवडणूक रिंगणातून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:25 IST

अंबड : येथील तहसील कार्यालयामध्ये तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींच्या गुरुवारी झालेल्या छाननी प्रक्रियेमध्ये ६० उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. यात ...

अंबड : येथील तहसील कार्यालयामध्ये तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींच्या गुरुवारी झालेल्या छाननी प्रक्रियेमध्ये ६० उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. यात ४५ उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर न केल्याने अर्ज अवैध ठरवले असल्याचे सांगण्यात आले. तर आपल्याला अशा प्रकारची नोटीस मिळाली नसल्याचे काही उमेदवारांनी सांगितले.

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी कोणीही अर्ज दाखल केले नव्हते, तर २ हजार १५ उमेदवारांनी अर्जाचे शुल्क भरले होते. त्यापैकी १ हजार ९५३ अर्ज वैध ठरविण्यात आलेले असून, ६० अर्ज अवैध ठरविण्यात आलेले आहेत. यात निवडणूक आयोगाकडे मागील पंचवार्षिक खर्च सादर न करणे, वयाची पात्रता पूर्ण न करणे आदींसह विविध अटी शर्तींचे उल्लंघन झाल्यामुळे अर्ज बाद झाले असल्याचे सांगण्यात आले. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची तयारी महसूल प्रशासनाच्या वतीने झाली असून, नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची गुरुवारी शेवटच्या दिवशी २ हजार १३ पैकी ६० नामनिर्देशनपत्र अवैध ठरले. तर वैध उमेदवार १ हजार ९५३ राहिले. गुरुवारी नामनिर्देशनपत्रांची छाननी एकूण तीन फेऱ्यांमध्ये झाली. पहिल्या फेरीत २४ गावे, दुसऱ्या फेरीत २४ व तिसऱ्या फेरीत २३ गावे होती. दरम्यान २ हजार १३ उमेदवारी अर्जांपैकी १ हजार ९५३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत, तर ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार आहेत. याकामी २४ निवडणूक निर्णय अधिकारी व २४ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत.

छाननीअंती शहापूर येथील सात जणांचे अर्ज अवैध ठरले, तर वाळकेश्वर पाच, गोरी गांधारी, राहुवाडी, पांगरी, भालगाव प्रत्येकी तीन, पाथरवाला, कुरण, कोठाळा, कर्जत, सुखापुरी, दहेगाव, आलमगाव येथील प्रत्येकी दोन, चुर्मापुरी, डावरगाव, शहागड, वलखेडा, दहिपुरी, रामनगर, कवडगाव, बनटाकळी, डावरगाव, वलखेडा, ताड हादगाव, गोविंदपूर, रोहिलागड, पारनेर आणि गोंदी येथील प्रत्येकी एक उमेदवाराचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. एकूण तीन फेऱ्यांमध्ये झालेल्या या छाननी प्रक्रियेत वाद- विवाद झाल्यामुळे बऱ्याच वेळा खोळंबा झाला होता.

तहसील कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक नामनिर्देशनपत्र छाननी प्रक्रियेत अनेक उमेदवारांनी आक्षेप नोंदवून हरकत घेतल्या. या प्रक्रियेत तहसीलदार विद्याचरण कडवकर, नायब तहसीलदार बाबूराव चंडोल, अंजली कुलकर्णी, अनिता मोरे, भागवत देशमुख यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी, कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी झाले होते.

तालुक्यातील ७१ ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमांतर्गत ६२७ सदस्य निवडण्यासाठी अनुसूचित जाती ७७, अनुसूचित जमाती ०७, इतर मागास प्रवर्ग १६३, सर्वसाधारण ३८० अशा प्रकारे विविध संवर्गांतून एकूण ६२७ उमेदवार २३४ प्रभागांतून निवडले जाणार आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानासाठी एकूण १ लाख १५ हजार ९२७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ६० हजार २४२ पुरुष असून, ५५ हजार ६८५ स्त्रिया मतदारांचा समावेश आहे. शिवाय २५८ मतदान अधिकाऱ्यांच्या टीम तयार करण्यात आल्या आहेत. त्यांना ३ जानेवारीपासून तीन टप्प्यांत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.