शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

जालना जिल्हाभरात तीन वर्षात साडेचार हजार घरकुलांचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 00:21 IST

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात सन २०१६-१७ ते २०१८-१९ या दरम्यानच्या तीन वर्षात एकूण ५ हजार ८६१ घरकुलांच्या कामांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी आजवर ४ हजार ९४२ घरकुलांची कामे पूर्ण झाली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात सन २०१६-१७ ते २०१८-१९ या दरम्यानच्या तीन वर्षात एकूण ५ हजार ८६१ घरकुलांच्या कामांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी आजवर ४ हजार ९४२ घरकुलांची कामे पूर्ण झाली असून, अद्यापही ९१९ घरकुलांचे काम अपूर्ण आहेत.सर्वसामान्य गरीब कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना अंमलात आणली. त्यानुसार प्रत्येक लाभार्थ्याला १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. हे अनुदान शासनाकडून चार टप्प्यात दिले जाते. या योजनेंतर्गत जालना जिल्ह्यात दरवर्षी घरकूल बांधकामांना मंजुरी प्रदान करण्यात येते. शिवाय शासनाकडूनच जिल्ह्याला घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट दरवर्षी मिळत असते.२०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षाच्या कालावधीत जिल्ह्याला एकूण ५ हजार ९५८ घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रशासनातर्फे ५ हजार ८६१ घरकूल बांधकामांना मंजुरी प्रदान करण्यात आली.त्यापैकी ४ हजार ९४२ घरकुलांची कामे पूर्ण झाली असून, ९९१ घरकूलांचे काम अद्यापही अपूर्णच असल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी सूर पसरला आहे.२०११ साली करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात १२ हजार ३४६ कुटूंब या योजनेसाठी पात्र होते. मात्र, ५ हजार ८४८ कुटुंबांनाच मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना पात्र असूनही घरकूल मिळाले नाही. त्यांना २०१९-२० या वर्षी घरकूल देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Homeघरgovernment schemeसरकारी योजनाPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना