शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी झाली तर ४२ गावांना धोका ; पावसांत या ठिकाणी न गेलेलेच बरे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:31 IST

गोदावरी आणि पूर्णा नदी काठावरील गावांना पुराचा अधिक धोका लोकमत न्यूज नेटवर्क जालना : गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही पावसाने जिल्ह्यात ...

गोदावरी आणि पूर्णा नदी काठावरील गावांना पुराचा अधिक धोका

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या आठवड्यात सलग चार ते पाच दिवस सूर्यदर्शन झाले नव्हते. यंदा गोदावरीऐवजी पूर्णा , दुधना नद्यांना पूर आले होते. यामध्ये जीवितहानी जास्त झाली नाही. केवळ एक महिला पाण्यात वाहून गेली होती. तर दुसरीकडे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ७० टक्के पाऊस झाल्याची नोंद हवामान विभागाने घेतली आहे.

पाणी साचण्याची कारणे

मोठ्या नाल्यांवरील झालेली अतिक्रमणे हे रस्त्यावर पाणी साचण्याचे मुख्य कारण आहे.

दुसरीकडे पालिकेकडून वेळोवेळी नाल्यांची सफाई होत नसल्याने देखील अडचणी निर्माण झाल्या आहेत.

पाणी साचल्यानंतर नाल्यांमधील कचरा साफ होत नसल्याने आरोग्य धोक्यात येत आहे.

पाऊस नको नकोसा !

जालन्यात गेल्या आठवड्यात सलग चार दिवस पावसाने हजेरी लावली होती. यामुळे खरीप हंगामातील काही ठिकाणी पिकांना दिलासा मिळाला तर काही भागांमध्ये जास्तीच्या पावसामुळे पिके पिवळी पडू लागली आहेत. याचा परिणाम पिकाच्या वाढीवर झाल्याचे दिसून येत आहे.

- मधुकर बनगे, शेतकरी

शहरातील वर नमूद भागांमध्ये पाणी साचते. या भागात असलेल्या सांडपाण्याच्या नाल्या आणि त्यावर झालेले अतिक्रमण यामुळेही रस्त्यांना तळ्याचे रूप येते. पालिकेने यात आणखी लक्ष घालून नाल्यांवरील अतिक्रमणे हटवून मोठे नाले अतिक्रमणमुक्त केले पाहिजेत, अशी मागणी आहे.

- बंडू पैठण, जालना

शहरातील पाणी साचणारी ठिकाणे

जालना शहरातील शनिमंदिर, टाऊन हॉल, गांधी चमन, पाणी वेस, देहेडकरवाडी, लक्कडकोट पूल यासह नूतन वसाहत, भाग्यनगर शंकरनगर, निळकंठनगर, गांधीनगर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. यामुळे वाहतुकीला अडथळा येऊन अनेकांच्या घरात पाणी घुसते

पालिकेचे तेच ते रडगाणे

पावसाळा सुरू झाल्यावर पाणी तुंबणे हे जालनेकरांसाठी नवीन नाही. अनेक नाल्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे न काढल्याने थोडा जरी पाऊस झाला तरी रस्त्यावर पाणी साचते. यातून मार्ग काढतांना वाहनचालकांची कसरत होते.