शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

४ हजार शालेय विद्यार्थ्यांचा बसने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:30 IST

विकास व्होरकटे जालना : विद्यार्थ्यांमधून होणारी मागणी पाहता जिल्ह्यामधील विविध प्रमुख मार्गांवर ५५ राज्य परिवहन महामंडळाच्या बस सुरू करण्यात ...

विकास व्होरकटे

जालना : विद्यार्थ्यांमधून होणारी मागणी पाहता जिल्ह्यामधील विविध प्रमुख मार्गांवर ५५ राज्य परिवहन महामंडळाच्या बस सुरू करण्यात आल्या आहेत. या बसला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सद्य:स्थितीत ४ हजार विद्यार्थ्यांनी एसटी महामंडळाच्या बसचा पास काढून घेतला आहे.

ग्रामीण भागामध्ये आजही प्रवासाच्या भौतिक सुविधा नाहीत. त्यामुळे शाळकरी मुले खेडेगावातून शहरात शिक्षणासाठी ये- जा करण्यासाठी बसचाच उपयोग करतात. कोरोनामुळे मागील काही महिन्यांपासून बंद असलेल्या वर्गांपैकी दहावी ते बारावीदरम्यानचे वर्ग सध्या सुरू झालेले आहेत; परंतु अनेक विद्यार्थ्यांकडे शहरात शिक्षणासाठी जाण्यासाठी स्वत:चे वाहन नसल्याने विद्यार्थ्यांनी एसटी महामंडळाकडे बस सुरू करण्याची मागणी मध्यंतरी केली होती. विद्यार्थ्यांची मागणी व संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाच्या वतीने मानव विकासच्या बसह इतर काही अशा एकूण ५५ बस पाथ्रुड, सायगाव, डोंगरगाव, ओजमपुरी, सेवली आदी गावांच्या प्रमुख मार्गावर २ नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या आहेत. या बस दिवसाकाठी जवळपास २५० फेऱ्या पूर्ण करीत आहेत. आजवर अहिल्याबाई होळकर, मानव विकास आणि विद्यार्थी पास अशा एकूण चार हजार पासेसची विक्री बसस्थानकांमधून झाली आहे. यात आठवी ते बारावीदरम्यानच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी अंबड आगारातून १६ बस सोडण्यात आल्या आहेत. यापाठोपाठ जालना आगार- १४, जाफराबाद- १३, तर परतूर आगारातून १२ बस सोडण्यात आल्या आहेत. यापुढेही विद्यार्थ्यांची मागणी पाहून शालेय बस वाढवण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

चौकट

जे विद्यार्थी दररोज आपल्या गावातून इतर गावात शिक्षणासाठी अप- डाऊन करतात. अशा विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाच्या वतीने सवलतीच्या दरात पास दिल्या जात आहेत. त्यामुळे शिक्षणासाठी इतर गावात ये- जा करीत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या सोयीनुसार बसचा पास काढून शासनाच्या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयातून करण्यात आले आहे.

आगारनिहाय बस

अंबड - १६

जालना - १४

जाफराबाद - १३

परतूर - १२