शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

‘समृद्धी’साठी ४ खरेदीखत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:22 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग जालना जिल्ह्यातून जात असून, यासाठी २५ गावांतील जमीन संपादित करण्यात येत आहे. पैकी पाच गावांतील खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर २४ गावांतील प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. दरम्यान, बदनापूर तालुक्यातील गेवराई आणि अकोला निकळक येथील सहा शेतकºयांनी बुधवारी खरेदीखत लिहून दिले आहे. या सहा शेतकºयांना मावेजापोटी ३ कोटी ४१ लाख ८१ हजार १०४ रुपये देण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग जालना जिल्ह्यातून जात असून, यासाठी २५ गावांतील जमीन संपादित करण्यात येत आहे. पैकी पाच गावांतील खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर २४ गावांतील प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. दरम्यान, बदनापूर तालुक्यातील गेवराई आणि अकोला निकळक येथील सहा शेतकºयांनी बुधवारी खरेदीखत लिहून दिले आहे. या सहा शेतक-यांना मावेजापोटी ३ कोटी ४१ लाख ८१ हजार १०४ रुपये देण्यात आले आहेत.जालना तालुक्यातील १५ आणि बदनापूर तालुक्यातील १० गावांतून मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्ग जात आहे. यापैकी पाच गावांतील भूसंपादन प्रक्रिया व खरेदी खत पूर्ण झालेले आहे. दोन्ही तालुक्यांतून मिळून ४४० हेक्टर २० आर जमीन संपादित करण्यात येणार असून, ११५४ लाभार्थींची संख्या आहे. पैकी २०२ शेतकºयांनी खरेदीखत करुन दिले आहे. यापोटी १०३.४५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. तर उर्वरित ३३६. ७५ हेक्टर जमिनीचे संपादन बाकी असून, ९५२ शेतकºयांचे खरेदीखत होणार आहे. ही प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या सहा शेतकºयांचे रितसर खरेदीखत करुन त्यांना मावेजा देण्यात आल्याचे अधिकाºयांनी सांगितले.सहाही शेतकºयांना मावेजाचे वाटपच्सदाशिव भगवंतराव गाढे यांच्या एक हेक्टर जमिनीचे खरेदीखत करण्यात आले. मावेजापोटी त्यांना एक कोटी ३२ लाख ३३ हजार १५८ रुपयांचा देण्यात आले आहे.च्तेजराव नाथजी गिते याना ०.३७ हेक्टरचा मावेजा ४२ लाख ७९ हजार ६१४ रुपये, उद्धव जगन्नाथ गिते यांना ०.३७ हेक्टर जमिनीसाठी ४३ लाख १४ हजार ५१७ रुपये, जगन्नाथ तात्याबा गिते यांना ०.३५ हेक्टर जमिनीसाठी ३८ लाख ५६ हजार ९८४ रुपये, विष्णू रामभाऊ गिते (सर्व रा. अकोला) यांना ०.४७ हेक्टर जमिनीसाठी ४२ लाख ३० हजार ५३० रुपये आणि गेवराई येथील सरस्वती ढकणाजी पवार यांना ०.६४ हेक्टर जमिनीसाठी ४२ लाख ६६ हजार ३०१ रुपयांचा मावेजा बुधवारी देण्यात आला.