शहरं
Join us  
Trending Stories
1
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
2
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
3
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
4
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
5
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
6
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
7
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
8
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
9
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
10
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
11
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
12
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
13
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
14
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
15
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
16
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
17
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ
18
प्रेमासाठी मोलकरीण बनली चोर, ज्या घरात करायची धुणीभांडी तिथेच मारला डल्ला, त्यानंतर...  
19
गौहर खाननं लग्नासाठी धर्मांतराची अट घातली, अभिनेत्यानं संपवलं नात; कुशाल टंडनचा खुलासा

तीन महिन्यांत ३६ टक्के पाण्याचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:06 IST

जालना : गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ९९ टक्क्यांहून अधिक पाण्याचा साठा झाला होता, परंतु गत तीन महिन्यांत ...

जालना : गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ९९ टक्क्यांहून अधिक पाण्याचा साठा झाला होता, परंतु गत तीन महिन्यांत जिल्ह्यातील प्रकल्पांमधून सरासरी ३६ टक्के पाण्याचा उपसा झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ६३.६७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

गतवर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि सरासरी दीडशे टक्क्यांहून अधिक पाऊस जिल्ह्याच्या विविध भागात झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांचा खरिप हंगाम पूर्णत: वाया गेला. नव्हे, नदीकाठच्या शेतजमिनीही वाहून गेल्या आहेत. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ७ मध्यम व ५७ लघू प्रकल्प अशा एकूण ६४ प्रकल्पांमध्ये ९९ टक्क्यांहून अधिक उपयुक्त पाणीसाठा झाला होता. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प भरल्याने भविष्यातील पाण्याच्या टंचाईचा प्रश्नही मार्गी लागला आहे, परंतु गत तीनच महिन्यांत या प्रकल्पांमधून तब्बल ३६ टक्के पाण्याचा उपसा करण्यात आला आहे. सद्यस्थितीत मध्यम प्रकल्पांमध्ये ७८.७३ टक्के तर लघू प्रकल्पांमध्ये ५६.८२ टक्के असा जिल्ह्यात एकूण ६३.६७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. प्रकल्पनिहाय स्थिती पाहता, जिल्ह्यातील ६४ पैकी सहा प्रकल्पांमध्ये मृत पाणीसाठा आहे. दोन प्रकल्पांमध्येही ० ते २५ टक्क्यांच्या मध्ये पाणीसाठा असून, हे प्रकल्पही मृतावस्थेत जाण्याच्या मार्गावर आहेत. ९ प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांच्या मध्ये पाणीसाठा आहे. ३१ प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये तर १६ प्रकल्पांमध्ये ७५ ते १०० टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणीसाठा आहे. दरम्यान, गत तीन महिन्यांतच ३६ टक्के पाण्याचा उपसा झाला असून, जानेवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात ६३.६७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. आगामी उन्हाळ्याचा कालावधी पाहता, जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणी उपशाचे नियोजन करणे गरजेचे आहे.

मध्यम प्रकल्पांची स्थिती

जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांमध्ये ७८.७३ टक्के पाणीसाठा आहे. यात जालना तालुक्यातील कल्याण गिरीजा प्रकल्पात ७९.६३ टक्के, कल्याण मध्यम प्रकल्पात ८७.८९ टक्के, बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पात ८२.१५ टक्के, भोकरदन तालुक्यातील जुई प्रकल्पात ६४.८४ टक्के, धामना प्रकल्पात ६९.५७ टक्के, जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा प्रकल्पात ६८.१९ टक्के, अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पात ८१.९४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.