शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

जालना शहरात आजपासून ३५ वे अस्मितादर्श साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:29 IST

जालना शहरात आयोजित ३५ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे उदघाटन शनिवारी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा प्रख्यात विचारवंत डॉ. सुखदेव थोरात यांच्या हस्ते होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनादरम्यान परिसंवाद, लेखक, वाचक व संवाद, कविसंमेलन, कथाकथन आदीं कार्यक्रम-उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ.संजय लाखे पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देसंजय लाखे पाटील : साहित्यप्रेमी जनतेसह नागरिकांनी उपस्थित रहावे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरात आयोजित ३५ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे उदघाटन शनिवारी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा प्रख्यात विचारवंत डॉ. सुखदेव थोरात यांच्या हस्ते होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनादरम्यान परिसंवाद, लेखक, वाचक व संवाद, कविसंमेलन, कथाकथन आदीं कार्यक्रम-उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ.संजय लाखे पाटील यांनी दिली.याबाबात अधिक माहिती देतांना डॉ.लाखे पाटील पुढे म्हणाले की, जालना शहरातील मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात हे अस्मितादर्श साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. या साहित्य संमेलनस्थळाला पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे सभागृह असे नाव देण्यात आले आहे.शनिवार, या साहित्य संमेलनास संविधान रॅलीने सुरुवात होणार आहे. ही संविधान रॅलीस सकाळी ८ वाजता मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून प्रारंभ होणार असून, संमेलनस्थळी तिचा समारोप होणार आहे.सकाळी ९ वाजता डॉ.सुखदेव थोरात यांच्या हस्ते अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे उदघाटन होणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मागासवर्गीय विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, प्रसिध्द कवी प्रा. फ. मु. शिंदे, जालना शहराच्या नगराध्यक्षा संगीताताई गोरंट्याल, जालना नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या उदघाटन सोहळ्यात स्मरणिका व ग्रंथ प्रकाशनासह पुरस्काराचे वितरणही मान्यवर अतिथींच्या हस्ते होणार आहे.दुपारी १ ते ३.३० दरम्यान पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे बहुआयामी सांस्कृतिक व्यक्तिमत्व या विषयावर डॉ. चिंतामण कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात डॉ. मिलिंद बागुल, सुरेश साबळे, डॉ. वासुदेव मुलाटे, शत्रुघ्न जाधव, डॉ. इसादास भडके, डॉ. सुशिला मुल-जाधव, प्रेमानंद गज्वी, डॉ. केशव देशमुख, डॉ. संपतराव गायकवाड, निलकांत चव्हाण, विश्वास वसेकर, वसंत शेंडे आदी मान्यवर वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत.यावेळी अ‍ॅड. बी. एम. साळवे, सुभाष देविदान व डॉ. संजय राख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.दुपारी ३.३. 0ते सायं. ५.३० दरम्यान भारतीय संविधान आणि वर्तमान संदर्भ या विषयावर प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात डॉ. रा. का. क्षीरसागर, डॉ. निलकंठ शेरे, डॉ. अनंत राऊत, डॉ. श्रीराम निकम, प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, डॉ. वसंत डोंगरे, महेंद्र ताजणे, डॉ. प्रविण मोरे, डॉ. मा. प. थोरात, दीपकराज कापडे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. यावेळी अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण, डॉ. नारायण मुंढे, जयेश बाविसी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे लाखे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाAsmitadarsh Sahitya Sammelanअस्मितादर्श साहित्य संमेलन