शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

ग्रामपंचायतींंमध्ये ३० टक्के तरुण कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:28 IST

जालना : जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला आहे. ग्रामपंचायतीच्या ४,१६४ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत तरुणांनी मोठा सहभाग घेतल्याचे ...

जालना : जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला आहे. ग्रामपंचायतीच्या ४,१६४ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत तरुणांनी मोठा सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्यात तब्बल ३० टक्के तरुण गावचे कारभारी झाले आहेत.

जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये संपली होती. ४७५पैकी २६ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली, तर ४७८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. ४४६ ग्रामपंचायतींच्या ३,६९८ जागांसाठी मतदान झाले. जिल्ह्यात ८२.३२ टक्के मतदान झाले होते. सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, १२,३३२ पैकी ४,१४४ उमेदवारांनी विजय मिळवला. यात तरुण उमेदवारांचा मोेठ्या प्रमाणात समावेश आहे.

भोकरदन तालुक्यात सर्वाधिक तरुण उमेदवार

जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात सर्वाधिक तरुण उमेदवार निवडून आले आहेत. गावाचा विकास खुंटल्याने यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात तरूणांनी सहभाग घेतल्याचे चित्र आहे. भोकरदन तालुक्यात जवळपास १६ टक्के तरुण उमेदवार निवडून आले आहेत.

मागील अनेक वर्षांपासून गावाचा विकास खुंटला आहे. ज्येष्ठ मंडळींना डिजिटल युगाचे ज्ञान नाही. त्यामुळे आमच्या गावातील बहुतांश तरूण निवडणुकीत उभे राहिले होते. मतदारांनीही त्यांच्या बाजूने कौल दिला आहे.

शंतनू काकडे, जयपूर, मंठा

माझ्या गावाची राज्यात आदर्श गाव म्हणून ओळख व्हावी, यासाठी मी यंदाची निवडणूक लढवली आणि विजयीही झालो आहे. आता फक्त गावाचा विकास करायचा आहे.

पंकज सोळुंके, गोंदी, अंबड

गावाच्या विकासासाठी मी निवडणुकीत उभा राहिलो. विकासाच्या नावावरच ही निवडणूक लढवली आहे. आता विजयीही झालो असून, आता फक्त गावाचा विकास करायचा आहे.