शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

३६ गावांना महापुराची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:37 IST

अंबड, परतूर व घनसावंगी तालुक्यांमधील नदीकाठच्या ३६ गावांमधील नागरिकांना महापुराची धास्ती बसली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून पाण्याचा विर्सग करण्यात आल्याने जायकवाडी धरणाच्या जलसाठ्याची १०० टक्क्यांकडे वाटचाल सुरू आहे. यामुळे अंबड, परतूर व घनसावंगी तालुक्यांमधील नदीकाठच्या ३६ गावांमधील नागरिकांना महापुराची धास्ती बसली आहे.नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून येत्या एक दोन दिवसांमध्ये पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. मात्र, जायकवाडी धरणाचा जलसाठा ८१ टक्क्यांहून अधिक झाला आहे. यामुळे यापुढे नाशिक व अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाऊस पडताच धरण पूर्णक्षमतेने भरून गोदावरीला पूर येऊ शकतो, जालना जिल्ह्यात गोदावरी नदीचा ६० किलोमिटरचा किनारा लाभलेला असून सन २००६ मध्ये गोदावरी नदीला पूर आला होता.यावेळी जालना जिल्ह्यातील ३६ गावांना पूराचा तडाखा बसला होता. यामध्ये घनसावंगीत तालुक्यातील १८ गावे अंबड तालुक्यातील १३ गावे व परतूर तालुक्यातील पाच गावांचा समावेश होता. यावेळी अनेकांचे संसार उद्धवस्त झाले होते. शेकडो एक्कर जमीन पाण्याखाली गेली होती. हीच परिस्थिती पुन्हा उद्भवत तर नाही ना असा प्रश्न आता ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.२००६ मध्ये गोदावरीला आलेल्या पुराची पुनरावृत्ती पुन्हा होवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने त्यावेळी काही गावांचे पूर्ण तर काही गावांचा अंशत: पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव तयार केला होता.विशेष म्हणजे घनसावंगी तालुक्यातील काही गावांचा आराखडा तयार करण्यात आला होता. यात ३६३० कुटूंबांचा समावेश होता. या कुटूंबांना ४९६ हेक्टर ३७ गुंठे जमीन संपादित करण्यासाठी व नागरि सुविधांसाठी २००६ नुसार ७६४ कोटी साठ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.यामध्ये अंबड तालुक्यातील गोंदी, कुरण, गंगा चिंचोली, साष्ट पिंपळगाव, बळेगाव, आपेगाव, शहागड, पाथरवाला, हसनापूर, कोठाळा, इंदलगाव, साडेगाव आदी गावे आहेत. घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी, रामसगाव, सौंदल गाव, लिंगेवाडी, गुंज बुद्रुक, रामसगाव, मुद्रेगाव, कोटी, शेवता, अंतरवाली टेंभी, बानेगाव, उक्कडगाव, शिवणगाव, बादली, राजाटाकळी, मंगरूळ, श्रीपत धामणगाव तर परतूर तालुक्यातील गोळेगाव, संकल्प पुरी, गंगा किनारा, चांगतपूरी, सावरगाव बुद्रुक आदी गावांचा समावेश आहे.

टॅग्स :floodपूरDamधरणWaterपाणीMigrationस्थलांतरण