शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

३६ गावांना महापुराची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:37 IST

अंबड, परतूर व घनसावंगी तालुक्यांमधील नदीकाठच्या ३६ गावांमधील नागरिकांना महापुराची धास्ती बसली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून पाण्याचा विर्सग करण्यात आल्याने जायकवाडी धरणाच्या जलसाठ्याची १०० टक्क्यांकडे वाटचाल सुरू आहे. यामुळे अंबड, परतूर व घनसावंगी तालुक्यांमधील नदीकाठच्या ३६ गावांमधील नागरिकांना महापुराची धास्ती बसली आहे.नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून येत्या एक दोन दिवसांमध्ये पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. मात्र, जायकवाडी धरणाचा जलसाठा ८१ टक्क्यांहून अधिक झाला आहे. यामुळे यापुढे नाशिक व अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाऊस पडताच धरण पूर्णक्षमतेने भरून गोदावरीला पूर येऊ शकतो, जालना जिल्ह्यात गोदावरी नदीचा ६० किलोमिटरचा किनारा लाभलेला असून सन २००६ मध्ये गोदावरी नदीला पूर आला होता.यावेळी जालना जिल्ह्यातील ३६ गावांना पूराचा तडाखा बसला होता. यामध्ये घनसावंगीत तालुक्यातील १८ गावे अंबड तालुक्यातील १३ गावे व परतूर तालुक्यातील पाच गावांचा समावेश होता. यावेळी अनेकांचे संसार उद्धवस्त झाले होते. शेकडो एक्कर जमीन पाण्याखाली गेली होती. हीच परिस्थिती पुन्हा उद्भवत तर नाही ना असा प्रश्न आता ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.२००६ मध्ये गोदावरीला आलेल्या पुराची पुनरावृत्ती पुन्हा होवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने त्यावेळी काही गावांचे पूर्ण तर काही गावांचा अंशत: पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव तयार केला होता.विशेष म्हणजे घनसावंगी तालुक्यातील काही गावांचा आराखडा तयार करण्यात आला होता. यात ३६३० कुटूंबांचा समावेश होता. या कुटूंबांना ४९६ हेक्टर ३७ गुंठे जमीन संपादित करण्यासाठी व नागरि सुविधांसाठी २००६ नुसार ७६४ कोटी साठ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.यामध्ये अंबड तालुक्यातील गोंदी, कुरण, गंगा चिंचोली, साष्ट पिंपळगाव, बळेगाव, आपेगाव, शहागड, पाथरवाला, हसनापूर, कोठाळा, इंदलगाव, साडेगाव आदी गावे आहेत. घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी, रामसगाव, सौंदल गाव, लिंगेवाडी, गुंज बुद्रुक, रामसगाव, मुद्रेगाव, कोटी, शेवता, अंतरवाली टेंभी, बानेगाव, उक्कडगाव, शिवणगाव, बादली, राजाटाकळी, मंगरूळ, श्रीपत धामणगाव तर परतूर तालुक्यातील गोळेगाव, संकल्प पुरी, गंगा किनारा, चांगतपूरी, सावरगाव बुद्रुक आदी गावांचा समावेश आहे.

टॅग्स :floodपूरDamधरणWaterपाणीMigrationस्थलांतरण