शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
3
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
4
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
5
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
6
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
7
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
8
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
10
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
11
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
12
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
13
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
14
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
15
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
16
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
17
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
18
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
19
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
20
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा

३६ गावांना महापुराची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:37 IST

अंबड, परतूर व घनसावंगी तालुक्यांमधील नदीकाठच्या ३६ गावांमधील नागरिकांना महापुराची धास्ती बसली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून पाण्याचा विर्सग करण्यात आल्याने जायकवाडी धरणाच्या जलसाठ्याची १०० टक्क्यांकडे वाटचाल सुरू आहे. यामुळे अंबड, परतूर व घनसावंगी तालुक्यांमधील नदीकाठच्या ३६ गावांमधील नागरिकांना महापुराची धास्ती बसली आहे.नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून येत्या एक दोन दिवसांमध्ये पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. मात्र, जायकवाडी धरणाचा जलसाठा ८१ टक्क्यांहून अधिक झाला आहे. यामुळे यापुढे नाशिक व अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाऊस पडताच धरण पूर्णक्षमतेने भरून गोदावरीला पूर येऊ शकतो, जालना जिल्ह्यात गोदावरी नदीचा ६० किलोमिटरचा किनारा लाभलेला असून सन २००६ मध्ये गोदावरी नदीला पूर आला होता.यावेळी जालना जिल्ह्यातील ३६ गावांना पूराचा तडाखा बसला होता. यामध्ये घनसावंगीत तालुक्यातील १८ गावे अंबड तालुक्यातील १३ गावे व परतूर तालुक्यातील पाच गावांचा समावेश होता. यावेळी अनेकांचे संसार उद्धवस्त झाले होते. शेकडो एक्कर जमीन पाण्याखाली गेली होती. हीच परिस्थिती पुन्हा उद्भवत तर नाही ना असा प्रश्न आता ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.२००६ मध्ये गोदावरीला आलेल्या पुराची पुनरावृत्ती पुन्हा होवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने त्यावेळी काही गावांचे पूर्ण तर काही गावांचा अंशत: पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव तयार केला होता.विशेष म्हणजे घनसावंगी तालुक्यातील काही गावांचा आराखडा तयार करण्यात आला होता. यात ३६३० कुटूंबांचा समावेश होता. या कुटूंबांना ४९६ हेक्टर ३७ गुंठे जमीन संपादित करण्यासाठी व नागरि सुविधांसाठी २००६ नुसार ७६४ कोटी साठ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.यामध्ये अंबड तालुक्यातील गोंदी, कुरण, गंगा चिंचोली, साष्ट पिंपळगाव, बळेगाव, आपेगाव, शहागड, पाथरवाला, हसनापूर, कोठाळा, इंदलगाव, साडेगाव आदी गावे आहेत. घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी, रामसगाव, सौंदल गाव, लिंगेवाडी, गुंज बुद्रुक, रामसगाव, मुद्रेगाव, कोटी, शेवता, अंतरवाली टेंभी, बानेगाव, उक्कडगाव, शिवणगाव, बादली, राजाटाकळी, मंगरूळ, श्रीपत धामणगाव तर परतूर तालुक्यातील गोळेगाव, संकल्प पुरी, गंगा किनारा, चांगतपूरी, सावरगाव बुद्रुक आदी गावांचा समावेश आहे.

टॅग्स :floodपूरDamधरणWaterपाणीMigrationस्थलांतरण