शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

३६५ दिवसांत ४२४ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 00:40 IST

: गत वर्षातील ३६५ दिवसांत जिल्ह्यात ४२४ रस्ता अपघात झाले आहेत

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गत वर्षातील ३६५ दिवसांत जिल्ह्यात ४२४ रस्ता अपघात झाले आहेत. यात १८८ जणांचा बळी गेला असून, ३२९ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर ८७ जण किरकोळ जखमी झाले आहेत. वाढलेले अपघाताचे प्रमाण पाहता वाहतूक नियम जागृती आणि नियम मोडणाऱ्यांवर करण्यात येणारी दंडाची कारवाई केवळ जुजबी ठरते का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.रस्ता अपघात रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक शाखा, पोलीस ठाण्यातील पथके कार्यरत आहेत. रस्ता सुरक्षा सप्ताहासह इतर कार्यक्रमांमधून वाहतूक नियमांची जागृतीही प्रशासनाकडून केली जाते. मात्र, वाहतूक नियमांना धाब्यावर बसवून चालक वाहने चालवित असल्याने रस्ता अपघाताचे प्रमाण आजही कायम आहे. सन २०१८ मध्ये वर्षभरात ४०० अपघाताची नोंद जालना पोलिसांच्या दप्तरी झाली होती.यात २०५ जणांचा बळी गेला होता. तर २७९ जण गंभीर जखमी झाले होते. तर ४३ जण किरकोळ जखमी झाले होते. मात्र, गत वर्षभरात २०१९ मध्ये ४२४ रस्ता अपघाताची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे. यात १८८ जणांचा बळी गेला आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये मयतांची संख्या घटली असली तरी गंभीर जखमींची संख्या वाढून ३२९ वर गेली आहे. तर ८७ चालक, प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.रस्ता अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून केवळ वाहतूक नियम जागृती आणि दंड आकारण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. मात्र, रस्त्यांची दुरूस्ती, धोकादायक वळणे, धोकादायक पूल दुरूस्तीसह इतर उपाययोजनांकडे मात्र, गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे रस्ता अपघातात वाढ होत असून, चालकांनीही स्वयंशिस्तीने वाहतूक नियमांचे पालन केले तरच अपघात रोखण्यास मदत होणार आहे.गतवर्षी २०१९ मध्ये झालेल्या ४२४ अपघातापैकी १७६ अपघातांत १८८ जणांचा बळी गेला आहे. शिवाय ४० अपघातात कोणीही जखमी झाली नसल्याची नोंद आहे.२०१८ या वर्षभरात एकूण १९१ प्राणांतिक अपघात झाले होते. यात २०५ जणांचा बळी गेला होता. तर ३५ अपघातात कोणीही जखमी झाली नसल्याची नोंद आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा