शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
4
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
5
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
7
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
8
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
9
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
10
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
11
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
12
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
13
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
14
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
15
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
16
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
17
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
18
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
19
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
20
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
Daily Top 2Weekly Top 5

३६५ दिवसांत ४२४ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 00:40 IST

: गत वर्षातील ३६५ दिवसांत जिल्ह्यात ४२४ रस्ता अपघात झाले आहेत

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गत वर्षातील ३६५ दिवसांत जिल्ह्यात ४२४ रस्ता अपघात झाले आहेत. यात १८८ जणांचा बळी गेला असून, ३२९ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर ८७ जण किरकोळ जखमी झाले आहेत. वाढलेले अपघाताचे प्रमाण पाहता वाहतूक नियम जागृती आणि नियम मोडणाऱ्यांवर करण्यात येणारी दंडाची कारवाई केवळ जुजबी ठरते का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.रस्ता अपघात रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक शाखा, पोलीस ठाण्यातील पथके कार्यरत आहेत. रस्ता सुरक्षा सप्ताहासह इतर कार्यक्रमांमधून वाहतूक नियमांची जागृतीही प्रशासनाकडून केली जाते. मात्र, वाहतूक नियमांना धाब्यावर बसवून चालक वाहने चालवित असल्याने रस्ता अपघाताचे प्रमाण आजही कायम आहे. सन २०१८ मध्ये वर्षभरात ४०० अपघाताची नोंद जालना पोलिसांच्या दप्तरी झाली होती.यात २०५ जणांचा बळी गेला होता. तर २७९ जण गंभीर जखमी झाले होते. तर ४३ जण किरकोळ जखमी झाले होते. मात्र, गत वर्षभरात २०१९ मध्ये ४२४ रस्ता अपघाताची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे. यात १८८ जणांचा बळी गेला आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये मयतांची संख्या घटली असली तरी गंभीर जखमींची संख्या वाढून ३२९ वर गेली आहे. तर ८७ चालक, प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.रस्ता अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून केवळ वाहतूक नियम जागृती आणि दंड आकारण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. मात्र, रस्त्यांची दुरूस्ती, धोकादायक वळणे, धोकादायक पूल दुरूस्तीसह इतर उपाययोजनांकडे मात्र, गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे रस्ता अपघातात वाढ होत असून, चालकांनीही स्वयंशिस्तीने वाहतूक नियमांचे पालन केले तरच अपघात रोखण्यास मदत होणार आहे.गतवर्षी २०१९ मध्ये झालेल्या ४२४ अपघातापैकी १७६ अपघातांत १८८ जणांचा बळी गेला आहे. शिवाय ४० अपघातात कोणीही जखमी झाली नसल्याची नोंद आहे.२०१८ या वर्षभरात एकूण १९१ प्राणांतिक अपघात झाले होते. यात २०५ जणांचा बळी गेला होता. तर ३५ अपघातात कोणीही जखमी झाली नसल्याची नोंद आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा