शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
4
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
5
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
6
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
7
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
8
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
9
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
11
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
12
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
13
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
14
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
15
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
16
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
17
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
18
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
19
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
20
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?

संचारबंदीच्या काळात 25 हजार पॉझिटिव्ह; 15 दिवसांनंतरही रुग्ण कमी होईनात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:49 IST

जिल्ह्यात फेब्रवारी महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आणखी वेगाने पसरली. ज्यावेळी ग्रामीणमध्ये कमी रुग्ण होते, त्यावेळी जालना शहर हे कोरोनाचे ...

जिल्ह्यात फेब्रवारी महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आणखी वेगाने पसरली. ज्यावेळी ग्रामीणमध्ये कमी रुग्ण होते, त्यावेळी जालना शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते; परंतु आता जालन्यासह ग्रामीण भागातही कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरले आहेत. शहरातून गावाकडे येणाऱ्यांची संख्या वाढताच कोरोनाचा आलेख वाढला आहे. मध्यंतरी कोरोनाच्या चाचण्या वाढल्या असून, त्याचाही परिणाम रुग्ण वाढीवर झाला, परंतु चाचण्या वाढल्याने बरेच छुपे रुग्ण समोर आल्याने कोरोनाचा पाहिजे तेवढा फैलाव रोखण्यास मदत झाली आहे. आज हे रुग्ण निदान उपचार करत असून, यामुळे स्प्रेड होण्याचे प्रमाण काही अंशी का होईना कमी झाले आहे. एकीकडे संचारबंदी असताना दुसरीकडे शेती, बँक तसेच अन्य वित्तीय संस्था सुरूच आहेत. कुठलेही कारण पुढे करून नागरिक घराबाहेर पडत असल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. हे निर्बंध आणखी कडक झाल्यास परिणाम होऊ शकतो.

या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या वाढली

गर्दी न करणे तसेच सुरक्षित अंतर न पाळल्याने जालन्यात कोरोनाची वाढ कायम आहे. वारंवार सांगूही नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे वास्तव समोर येत आहे.

प्रवासावर असलेली बंदी ही कुचकामी ठरत आहे. अनेक जण मुंबई, पुणे अशा महानगरांमधून ग्रामीण भागात येत आहेत. त्यांची चाचणी होत नसल्याने फैलाव वाढला आहे.

शहरी भागात लसीकरण करण्यासाठी नागरिक स्वत:हून पुढे येत आहेत. असे असतानाच ग्रामीण भागात मात्र, लसीकरणासाठी ग्रामस्थांना विनवण्या करण्याची वेळ आली आहे. गैरसमजातून ग्रामीणमध्ये लसीकरणाचा वेग पाहिजे तेवढा नसल्याने स्थिती बिघडत आहे.

ग्रामीण भागांत रुग्ण वाढले, कारण?

ग्रामीण भागात रुग्ण वाढीचे कारण म्हणजेच मास्क न वापरणे, सॅनिटायझरला नाकारण्यासह कोरोना हा आजारच नाही, असा गैरसमज करून घेण्याचे प्रमाण जास्त आहे.

अनेक जण ताप, थंडी, सर्दी असल्यानंतरही त्यासाठी दवाखान्यात न जाता तो आजार अंगावरच काढला जात आहे. तसेच चाचणीसाठी स्वॅब घेताना जो प्लास्टिकचा चमचा नाक आणि घशात घालून स्वॅब घेतला जातो त्यांचीही भीती आहे.