शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
3
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
4
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
5
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
6
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
7
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
8
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
9
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
10
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
11
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
12
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
13
IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग पाहून BCCI चा मोठा निर्णय
14
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
15
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
16
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
17
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा
18
पाकिस्तानी शेअर बाजारात भूकंप, पण भारतीय मार्केटवर झाला नाही परिणाम, 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
Swapna Shastra: प्रिय व्यक्तीचा स्वप्नात मृत्यू पाहणे शुभ की अशुभ? त्यातही स्वप्नं पहाटेचं असेल तर?
20
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले

संचारबंदीच्या काळात 25 हजार पॉझिटिव्ह; 15 दिवसांनंतरही रुग्ण कमी होईनात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:49 IST

जिल्ह्यात फेब्रवारी महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आणखी वेगाने पसरली. ज्यावेळी ग्रामीणमध्ये कमी रुग्ण होते, त्यावेळी जालना शहर हे कोरोनाचे ...

जिल्ह्यात फेब्रवारी महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आणखी वेगाने पसरली. ज्यावेळी ग्रामीणमध्ये कमी रुग्ण होते, त्यावेळी जालना शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते; परंतु आता जालन्यासह ग्रामीण भागातही कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरले आहेत. शहरातून गावाकडे येणाऱ्यांची संख्या वाढताच कोरोनाचा आलेख वाढला आहे. मध्यंतरी कोरोनाच्या चाचण्या वाढल्या असून, त्याचाही परिणाम रुग्ण वाढीवर झाला, परंतु चाचण्या वाढल्याने बरेच छुपे रुग्ण समोर आल्याने कोरोनाचा पाहिजे तेवढा फैलाव रोखण्यास मदत झाली आहे. आज हे रुग्ण निदान उपचार करत असून, यामुळे स्प्रेड होण्याचे प्रमाण काही अंशी का होईना कमी झाले आहे. एकीकडे संचारबंदी असताना दुसरीकडे शेती, बँक तसेच अन्य वित्तीय संस्था सुरूच आहेत. कुठलेही कारण पुढे करून नागरिक घराबाहेर पडत असल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. हे निर्बंध आणखी कडक झाल्यास परिणाम होऊ शकतो.

या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या वाढली

गर्दी न करणे तसेच सुरक्षित अंतर न पाळल्याने जालन्यात कोरोनाची वाढ कायम आहे. वारंवार सांगूही नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे वास्तव समोर येत आहे.

प्रवासावर असलेली बंदी ही कुचकामी ठरत आहे. अनेक जण मुंबई, पुणे अशा महानगरांमधून ग्रामीण भागात येत आहेत. त्यांची चाचणी होत नसल्याने फैलाव वाढला आहे.

शहरी भागात लसीकरण करण्यासाठी नागरिक स्वत:हून पुढे येत आहेत. असे असतानाच ग्रामीण भागात मात्र, लसीकरणासाठी ग्रामस्थांना विनवण्या करण्याची वेळ आली आहे. गैरसमजातून ग्रामीणमध्ये लसीकरणाचा वेग पाहिजे तेवढा नसल्याने स्थिती बिघडत आहे.

ग्रामीण भागांत रुग्ण वाढले, कारण?

ग्रामीण भागात रुग्ण वाढीचे कारण म्हणजेच मास्क न वापरणे, सॅनिटायझरला नाकारण्यासह कोरोना हा आजारच नाही, असा गैरसमज करून घेण्याचे प्रमाण जास्त आहे.

अनेक जण ताप, थंडी, सर्दी असल्यानंतरही त्यासाठी दवाखान्यात न जाता तो आजार अंगावरच काढला जात आहे. तसेच चाचणीसाठी स्वॅब घेताना जो प्लास्टिकचा चमचा नाक आणि घशात घालून स्वॅब घेतला जातो त्यांचीही भीती आहे.