शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

भोगगाव शिवारात पंचवीस एकरातील ऊस भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:21 IST

घनसावंगी तालुक्यातल्या भोगगाव येथील बारा शेतक-यांचा सुमारे २० एकरातील ऊस शुक्रवारी दुपारी भस्मसात झाला. उसाच्या शेतातून गेलेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण झाल्यामुळे ही आग लागल्याचे शेतक-यांनी सांगितले.

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातल्या भोगगाव येथील बारा शेतक-यांचा सुमारे २० एकरातील ऊस शुक्रवारी दुपारी भस्मसात झाला. उसाच्या शेतातून गेलेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण झाल्यामुळे ही आग लागल्याचे शेतक-यांनी सांगितले. तर गोरी-गंगाधरीतही अशाच पद्धतीने चार शेतक-यांचा पाच एकर ऊस खाक झाला. विद्युत विभागाच्या दुर्लक्षामुळे या पूर्वीही उसाच्या शेतात आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतक-यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.या वर्षी भरपूर पाणी उपलब्ध असल्याने गोदावरी परिसरात उसाचे क्षेत्र वाढले आहे. अनेक शेतक-यांनी कर्ज काढून ऊस लागवड केलेली आहे. सध्या अनेक भागात ऊस साखर कारखान्यात नेण्याच्या स्थितीत आहे. मात्र, नोंदणी सुरू न झाल्याने शेतक-यांनी ऊसतोडीला सुरुवात केलेली नाही. शुक्रवारी दुपारी भोगगाव येथील दौलत तुळशीराम गाभूड यांच्या शेतात लोंबकळलेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण झाले. हवेमुळे आगीच्या ठिणग्या शेतात पडल्याने उसाने पेट घेतला. यात गाभूड यांच्या एक हेक्टर २० आर उसाला आग लागली. हवा व उसाच्या वाळलेल्या पाचटामुळे आग आणखी भडली. त्यामुळे या परिसरातील परसराम जिरे, गुलाब जिरे, बालासाहेब जिरे, माणिक गाभूड, गणेश गाभूड, भागवत गाभूड, रवींद्र गाभूड, कैलास वरगे, रामा गाभूड आदींच्या शेतातील सुमारे २० ते २५ एकर उसाचे नुकसान झाले. परिसरातील शेतक-यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग वाढल्याने शेतक-यांचा नाईलाज झाला. सध्या उसाला एकरी ७० टनांचा उतारा येत आहे. जळीत उसाला कारखान्याकडून कमी दर मिळतो. त्यामुळे या शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सागर कारखान्याचे ऊस पुरवठा अधिकारी राधाकृष्ण काळे यांच्याशी वारंवार संपर्क करूनही त्यांनी शेतक-यांना काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतक-यांनी संताप व्यक्त केला.-------विद्युत विभगाच्या दुर्लक्षामुळे घटनावीज वितरण कंपनीला परिसरातील शेतक-यांनी वारंवार तक्रारी करून, निवेदने देऊन लोंबकळलेल्या विद्युत तारा दुरुस्त करण्याची मागणी केली. मात्र, या विभागाने दुर्लक्ष केले. तसेच कारखान्यांनी वेळेवर ऊस नेला असता, तर नुकसान टळले असते, असे शेतकरी काळूजी गाभूड यांनी सांगितले.------------वाढलेल्या उसाचा तारांना स्पर्शतीर्थपुरी येथील विद्युत विभागाचे शाखा अभियंता व्यंकटेश परसे म्हणाले की, या भागातून गेलेल्या एलटीच्या विद्युत तारा १९७२ पासून आहेत. उसाची वाढ झाल्याने हवेमुळे उसाचा विद्युत तारांना स्पर्श होऊन शॉर्टसर्किट होते. यापूर्वीही रामसगाव, मुरमा, भोगगाव येथे असा प्रकार घडला होता.------------जळालेला ऊस शंभर रुपये टनसागर सहकारी साखर कारखान्याचे कृषी पर्यवेक्षक आर.ए. चव्हाण यांनी सांगितले की, जळालेल्या उसाची शनिवारपासून तोडणी करण्यात येईल. या उसाला प्रतिटन १०० रुपये दर दिला जाईल. जळीत ऊस लगेच काढून कारखान्यात आणल्यास वजनात घट येणार नाही.-------------गोरी-गंधारीतही उसाला आगशहागड : गोरी-गंधारी शिवारात शॉर्टसर्किटने ऊस जळाला असल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. यामध्ये शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर गोरी-गंधारी शिवारातील कित्येक दिवसांपासून महावितरणकडून देखभाल दुरुस्ती करण्यात आली नसल्याने सर्वत्र तारा लोंबकळलेल्या आहेत.गोरी-गंधारी शिवारातील गट क्रमांक १८ मधील बाबू पटेल व भाऊसाहेब जोगदंड यांच्या शेतातून विद्युत तार गेलेली आहे. देखभाल दुरुस्ती झाली नसल्याने तारा लोंबकळलेल्या आहेत. शुक्रवारी अचानक वारा आल्याने तारांची स्पार्किंग होऊन शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे बाबू पटेल व भाऊसाहेब जोगदंड यांचा प्रत्येकी एक एकर ऊस जळाला, तर बाजूच्या शेतातील शहादेव खरात, अप्पासाहेब खरात, अशोक खरात या तीन शेतक-यांचा तीन एकर ऊस जळून खाक झाला. शेतकºयांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र उपयोग झाला नाही. अग्निशमन बंब उशिरा पोहोचला. एका बंबमधील पाणी संपल्यानंतर तो परत न आल्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले.