शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

भोगगाव शिवारात पंचवीस एकरातील ऊस भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:21 IST

घनसावंगी तालुक्यातल्या भोगगाव येथील बारा शेतक-यांचा सुमारे २० एकरातील ऊस शुक्रवारी दुपारी भस्मसात झाला. उसाच्या शेतातून गेलेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण झाल्यामुळे ही आग लागल्याचे शेतक-यांनी सांगितले.

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातल्या भोगगाव येथील बारा शेतक-यांचा सुमारे २० एकरातील ऊस शुक्रवारी दुपारी भस्मसात झाला. उसाच्या शेतातून गेलेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण झाल्यामुळे ही आग लागल्याचे शेतक-यांनी सांगितले. तर गोरी-गंगाधरीतही अशाच पद्धतीने चार शेतक-यांचा पाच एकर ऊस खाक झाला. विद्युत विभागाच्या दुर्लक्षामुळे या पूर्वीही उसाच्या शेतात आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतक-यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.या वर्षी भरपूर पाणी उपलब्ध असल्याने गोदावरी परिसरात उसाचे क्षेत्र वाढले आहे. अनेक शेतक-यांनी कर्ज काढून ऊस लागवड केलेली आहे. सध्या अनेक भागात ऊस साखर कारखान्यात नेण्याच्या स्थितीत आहे. मात्र, नोंदणी सुरू न झाल्याने शेतक-यांनी ऊसतोडीला सुरुवात केलेली नाही. शुक्रवारी दुपारी भोगगाव येथील दौलत तुळशीराम गाभूड यांच्या शेतात लोंबकळलेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण झाले. हवेमुळे आगीच्या ठिणग्या शेतात पडल्याने उसाने पेट घेतला. यात गाभूड यांच्या एक हेक्टर २० आर उसाला आग लागली. हवा व उसाच्या वाळलेल्या पाचटामुळे आग आणखी भडली. त्यामुळे या परिसरातील परसराम जिरे, गुलाब जिरे, बालासाहेब जिरे, माणिक गाभूड, गणेश गाभूड, भागवत गाभूड, रवींद्र गाभूड, कैलास वरगे, रामा गाभूड आदींच्या शेतातील सुमारे २० ते २५ एकर उसाचे नुकसान झाले. परिसरातील शेतक-यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग वाढल्याने शेतक-यांचा नाईलाज झाला. सध्या उसाला एकरी ७० टनांचा उतारा येत आहे. जळीत उसाला कारखान्याकडून कमी दर मिळतो. त्यामुळे या शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सागर कारखान्याचे ऊस पुरवठा अधिकारी राधाकृष्ण काळे यांच्याशी वारंवार संपर्क करूनही त्यांनी शेतक-यांना काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतक-यांनी संताप व्यक्त केला.-------विद्युत विभगाच्या दुर्लक्षामुळे घटनावीज वितरण कंपनीला परिसरातील शेतक-यांनी वारंवार तक्रारी करून, निवेदने देऊन लोंबकळलेल्या विद्युत तारा दुरुस्त करण्याची मागणी केली. मात्र, या विभागाने दुर्लक्ष केले. तसेच कारखान्यांनी वेळेवर ऊस नेला असता, तर नुकसान टळले असते, असे शेतकरी काळूजी गाभूड यांनी सांगितले.------------वाढलेल्या उसाचा तारांना स्पर्शतीर्थपुरी येथील विद्युत विभागाचे शाखा अभियंता व्यंकटेश परसे म्हणाले की, या भागातून गेलेल्या एलटीच्या विद्युत तारा १९७२ पासून आहेत. उसाची वाढ झाल्याने हवेमुळे उसाचा विद्युत तारांना स्पर्श होऊन शॉर्टसर्किट होते. यापूर्वीही रामसगाव, मुरमा, भोगगाव येथे असा प्रकार घडला होता.------------जळालेला ऊस शंभर रुपये टनसागर सहकारी साखर कारखान्याचे कृषी पर्यवेक्षक आर.ए. चव्हाण यांनी सांगितले की, जळालेल्या उसाची शनिवारपासून तोडणी करण्यात येईल. या उसाला प्रतिटन १०० रुपये दर दिला जाईल. जळीत ऊस लगेच काढून कारखान्यात आणल्यास वजनात घट येणार नाही.-------------गोरी-गंधारीतही उसाला आगशहागड : गोरी-गंधारी शिवारात शॉर्टसर्किटने ऊस जळाला असल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. यामध्ये शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर गोरी-गंधारी शिवारातील कित्येक दिवसांपासून महावितरणकडून देखभाल दुरुस्ती करण्यात आली नसल्याने सर्वत्र तारा लोंबकळलेल्या आहेत.गोरी-गंधारी शिवारातील गट क्रमांक १८ मधील बाबू पटेल व भाऊसाहेब जोगदंड यांच्या शेतातून विद्युत तार गेलेली आहे. देखभाल दुरुस्ती झाली नसल्याने तारा लोंबकळलेल्या आहेत. शुक्रवारी अचानक वारा आल्याने तारांची स्पार्किंग होऊन शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे बाबू पटेल व भाऊसाहेब जोगदंड यांचा प्रत्येकी एक एकर ऊस जळाला, तर बाजूच्या शेतातील शहादेव खरात, अप्पासाहेब खरात, अशोक खरात या तीन शेतक-यांचा तीन एकर ऊस जळून खाक झाला. शेतकºयांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र उपयोग झाला नाही. अग्निशमन बंब उशिरा पोहोचला. एका बंबमधील पाणी संपल्यानंतर तो परत न आल्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले.