शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

२३५ कोटींचा निधी मिळूनही विकासकामे खोळंबणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST

जिल्ह्यातील विविध विकासकामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे मोठे योगदान आणि महत्त्व आहे. कोरोनामुळे नुकत्याच संपलेल्या २०२० सालात नियोजन विभागाची ...

जिल्ह्यातील विविध विकासकामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे मोठे योगदान आणि महत्त्व आहे. कोरोनामुळे नुकत्याच संपलेल्या २०२० सालात नियोजन विभागाची एकही बैठक झाली नाही. गेल्यावर्षीच्या प्रारंभी झालेल्या बैठकीत जालना जिल्ह्याचा वार्षिक आराखडा हा जवळपास २३५ कोटी रुपयांचा मंजूर केला होता. परंतु, नंतर या आराखड्याचा पाठपुरावा करण्यासाठी कोरोनामुळे प्रशासन आणि राजकीय नेत्यांना वेळ मिळाला नाही. त्यातच कोरोनामुळे राज्याची तिजोरीही रिकामी झाली होती. आता राज्याच्या तिजोरीत वेगवेगळ्या मार्गाने मोठ्या प्रमाणात महसूल येत असल्याने हळूहळू वेगवेगळ्या विभागांना लागणारा निधी वितरीत केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून जालना जिल्हा नियोजन विभागालाही २३५ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. परंतु, आता हा निधी मिळूनही त्याचा फारसा उपयोग होणार नाही. त्यामुळे विविध विभागांचे प्रस्ताव मागविणे आणि त्यानंतर त्या कामांच्या निविदा काढून ही कामे सुरू करण्यास वेळ खूप कमी आहे. या निधीचा विनयोग हा ३१ मार्चपर्यंत करणे अपेक्षित असते. परंतु, या दोन महिन्यांत हा निधी कसा खर्च होणार, असा प्रश्न यंत्रणांसमोर निर्माण झाला आहे. हा निधी उशिरा मिळाला असला तरी काही कामे तातडीने पूर्ण करून जास्तीत-जास्त निधी विकासकामांवर खर्च करता येईल, याबाबतचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाले आहेत. एकूणच कोरोनामुळे ज्या पध्दतीने उद्योग व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे आता जिल्ह्यातील रस्ते, दुरुस्ती आणि वेगवेगळ्या योजनांवर परिणाम होणार आहे.

शासनाकडून भेदभाव नाही

कोरोनाकाळात निधीला कात्री लागेल अशी अपेक्षा होती. परंतु, राज्य सरकारने यामध्ये कुठलाच भेदभाव न करता जिल्हा नियोजन समितीने संमत केलेल्या आराखड्यानुसार निधी मिळाला आहे. त्यामुळे तो आता खर्च होणे गरजेचे आहे.

राज्य सरकार निधी देताना तो त्याच कामांवर खर्च व्हावा, या अपेक्षेने देते. कोरोनाकाळातही सरकारने नियोजन समितीला ठरलेला निधी वितरीत केल्याने सरकारचे एक प्रकारचे आभारच मानले पाहिजेत. या मताचे आपण आहोत.

- कैलास गोरंट्याल, सत्ताधारी आमदार

राज्य सरकारने निधी वितरीत करताना तो केवळ कागदोपत्री केल्याचे दिसून येते. उशिरा निधी मिळाल्याने यातून आता दरवर्षीप्रमाणे विकासकामे होणार नाहीत. त्यामुळे हा एक केवळ दिखाऊपणाच म्हणावा लागेल.

- संतोष दानवे, विराेधी आमदार