शहरं
Join us  
Trending Stories
1
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
2
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
3
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
4
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
5
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
6
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
7
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
8
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
9
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
10
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
11
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
12
SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल
13
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
14
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
15
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
16
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
17
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
18
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
19
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
20
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार लाभार्थी मोफत धान्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:26 IST

भोकरदन : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची मुदत संपल्यामुळे भोकरदन तालुक्यातील २ लाख ३० हजार लाभार्थींपैकी २० हजार गरीब लाभार्थी ...

भोकरदन : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची मुदत संपल्यामुळे भोकरदन तालुक्यातील २ लाख ३० हजार लाभार्थींपैकी २० हजार गरीब लाभार्थी मोफत धान्यापासून वंचित राहिले आहेत. धान्य वाटप न झाल्याने दुकानदार आणि लाभार्थींमध्ये शाब्दिक चकमकी होत आहेत.

केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींना दोन किलो गहू, तीन किलो तांदूळ व एक किलो डाळ वाटप करण्यात येत होती. या योजनेची मुदत नोव्हेंबर २०२० होती. मात्र, तालुक्यातील २०८ स्वस्त धान्य दुकानदारांपैकी १४१ दुकानदारांना या योजनेंतर्गत मोफत योजनेचा उपलब्ध झालेला १० ते १२ हजार क्विंटल माल मिळाला. संबंधित दुकानदारांनी लाभार्थींना मालाचे वितरण केले. मात्र, ६७ दुकानदारांचा माल मुदतीच्या आत आला नाही. त्यामुळे त्यांनी लाभार्थींना वाटप केला गेला नाही. तालुक्यातील आलापूर, वालसा वडाळा, नळणी बु., तडेगाववाडी, तडेगाव, तळेगाव, बोरगाव तारू, वजीरखेड, मुठाड, वाडी बु., भोरखेड, कठोरा बाजार, सुरंगळी, टाकळी हिवरडी, सिरजगाव मंडप, चिंचोली, वाकडी, कोठा जहागीर, माळेगाव, भोकरदन, चोऱ्हाळा, लेहा, बरंजळा लोखंडे, देऊळगाव ताड, हसनाबाद, तळणी, आन्वा, मासनपूर, जळगाव सपकाळ, हिसोडा खु., हिसोडा बु., कोठा कोळी, पिंपळगाव रेणुकाई, सावंगी अवघडराव, रेलगाव, मोहळाई, वडशेद, पारध खु., पद्मावती, मानापूर, पाळसखेड पिपळे, केदारखेडा, चांदई एक्को, लोणगाव, निमगाव, दहीगाव, पोखरी, बोरगाव तारू, मेहेगाव, वाढोना, जयदेववाडी, गोकुळ या गावांतील तब्बल २० हजार लाभार्थींना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा गहू, तांदूळ व डाळ मिळाली नाही. मात्र, शेजारच्या गावांतील दुकानदाराने मोफत धान्य वाटप केले. मग आपल्या गावात का वाटप केले नाही ? अशी तक्रार लाभार्थी करीत आहेत. शिवाय काही ठिकाणी मोफत धान्य मिळत नसल्याने वादही निर्माण झाले आहेत.

माल आल्यानंतर वितरण

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात अर्धवट माल मिळाला होता. जेवढा माल मिळाला होता तो स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आला. त्यांनी ही तो लाभार्थींना वाटप केला. मात्र, त्यानंतर या योजनेची मुदत संपल्यामुळे जिल्ह्यात माल आलाच नाही. त्यामुळे ६७ दुकानदारांना मोफत योजनेचा माल देण्यात आला नाही. मात्र, मुदतवाढ मिळाल्यानंतर माल येईल व त्यानंतर या दुकानदारांना योजनेचा माल देण्यात येईल.

संतोष गोरड,

तहसीलदार, भोकरदन

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा माल जिल्ह्यातील अर्ध्या दुकानदारांना मिळाला. त्यांनी तो लाभार्थींना वाटप केला आहे. मात्र, ज्या दुकानदाराला मालच मिळाला नाही तरीसुद्धा त्याच्याकडे लाभार्थी मालाची मागणी करीत अहेत. शिवाय त्याला दोषी धरत आहेत. त्यांना लाभार्थींच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत आहेत. या योजनेचा माल मिळण्यासाठी शासनाने मुदतवाढ देऊन गरजू नगरिकांना लाभ द्यावा.

जगन्नाथ थोटे

अध्यक्ष, जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटना