शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

२० हजार लाभार्थी मोफत धान्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:26 IST

भोकरदन : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची मुदत संपल्यामुळे भोकरदन तालुक्यातील २ लाख ३० हजार लाभार्थींपैकी २० हजार गरीब लाभार्थी ...

भोकरदन : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची मुदत संपल्यामुळे भोकरदन तालुक्यातील २ लाख ३० हजार लाभार्थींपैकी २० हजार गरीब लाभार्थी मोफत धान्यापासून वंचित राहिले आहेत. धान्य वाटप न झाल्याने दुकानदार आणि लाभार्थींमध्ये शाब्दिक चकमकी होत आहेत.

केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींना दोन किलो गहू, तीन किलो तांदूळ व एक किलो डाळ वाटप करण्यात येत होती. या योजनेची मुदत नोव्हेंबर २०२० होती. मात्र, तालुक्यातील २०८ स्वस्त धान्य दुकानदारांपैकी १४१ दुकानदारांना या योजनेंतर्गत मोफत योजनेचा उपलब्ध झालेला १० ते १२ हजार क्विंटल माल मिळाला. संबंधित दुकानदारांनी लाभार्थींना मालाचे वितरण केले. मात्र, ६७ दुकानदारांचा माल मुदतीच्या आत आला नाही. त्यामुळे त्यांनी लाभार्थींना वाटप केला गेला नाही. तालुक्यातील आलापूर, वालसा वडाळा, नळणी बु., तडेगाववाडी, तडेगाव, तळेगाव, बोरगाव तारू, वजीरखेड, मुठाड, वाडी बु., भोरखेड, कठोरा बाजार, सुरंगळी, टाकळी हिवरडी, सिरजगाव मंडप, चिंचोली, वाकडी, कोठा जहागीर, माळेगाव, भोकरदन, चोऱ्हाळा, लेहा, बरंजळा लोखंडे, देऊळगाव ताड, हसनाबाद, तळणी, आन्वा, मासनपूर, जळगाव सपकाळ, हिसोडा खु., हिसोडा बु., कोठा कोळी, पिंपळगाव रेणुकाई, सावंगी अवघडराव, रेलगाव, मोहळाई, वडशेद, पारध खु., पद्मावती, मानापूर, पाळसखेड पिपळे, केदारखेडा, चांदई एक्को, लोणगाव, निमगाव, दहीगाव, पोखरी, बोरगाव तारू, मेहेगाव, वाढोना, जयदेववाडी, गोकुळ या गावांतील तब्बल २० हजार लाभार्थींना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा गहू, तांदूळ व डाळ मिळाली नाही. मात्र, शेजारच्या गावांतील दुकानदाराने मोफत धान्य वाटप केले. मग आपल्या गावात का वाटप केले नाही ? अशी तक्रार लाभार्थी करीत आहेत. शिवाय काही ठिकाणी मोफत धान्य मिळत नसल्याने वादही निर्माण झाले आहेत.

माल आल्यानंतर वितरण

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात अर्धवट माल मिळाला होता. जेवढा माल मिळाला होता तो स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आला. त्यांनी ही तो लाभार्थींना वाटप केला. मात्र, त्यानंतर या योजनेची मुदत संपल्यामुळे जिल्ह्यात माल आलाच नाही. त्यामुळे ६७ दुकानदारांना मोफत योजनेचा माल देण्यात आला नाही. मात्र, मुदतवाढ मिळाल्यानंतर माल येईल व त्यानंतर या दुकानदारांना योजनेचा माल देण्यात येईल.

संतोष गोरड,

तहसीलदार, भोकरदन

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा माल जिल्ह्यातील अर्ध्या दुकानदारांना मिळाला. त्यांनी तो लाभार्थींना वाटप केला आहे. मात्र, ज्या दुकानदाराला मालच मिळाला नाही तरीसुद्धा त्याच्याकडे लाभार्थी मालाची मागणी करीत अहेत. शिवाय त्याला दोषी धरत आहेत. त्यांना लाभार्थींच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत आहेत. या योजनेचा माल मिळण्यासाठी शासनाने मुदतवाढ देऊन गरजू नगरिकांना लाभ द्यावा.

जगन्नाथ थोटे

अध्यक्ष, जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटना