शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

आष्टीजवळ अरुंद रस्त्यामुळे कालव्यात पडून बैलजोडी दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:32 IST

अरुंद रस्त्यामुळे एका शेतक-याची बैलगाडी अचानक डाव्या कालव्यात गेली. या दुर्घटनेत दोन्ही बैलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, मात्र सुदैवाने शेतक-याचे प्राण वाचले.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : शेतातील काम आटोपून बैलगाडी घेऊन घरी जात असताना, अरुंद रस्त्यामुळे एका शेतक-याची बैलगाडी अचानक डाव्या कालव्यात गेली. या दुर्घटनेत दोन्ही बैलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, मात्र सुदैवाने शेतक-याचे प्राण वाचले. परतूर तालुक्यातील लोणी पुलाजवळून वाहणा-या डाव्या कालव्यात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली.लोणी येथील शेतकरी शेख मुस्तफा शेख बिबन हे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेतातून बैलगाडी घेऊन घराकडे निघाले होते. नाथसागराच्या डाव्या कालव्याच्या कडेने शेतातून ये-जा करण्यासाठी बैलगाडी रस्ता आहे.अरुंद रस्त्याला कालव्याच्या बाजूने तीव्र उतार असल्याने लोणी पुलाजवळ शेख मुस्तफा यांची बैलगाडी थेट कालव्याच्या पाण्यात गेली. नाथसागरातून पाण्याचे आवर्तन सोडलेले असल्याने कालवा भरून वाहत आहे. त्यामुळे शेख मुस्तफा बैलगाडीसह पाण्यात बुडाले. बैल गाडीला जुंपलेले असल्यामुळे, तसेच कालव्याच्या दोन्ही बाजूंनी उतार असल्यामुळे त्यांना वर चढताच आले नाही. त्यामुळे दोन्ही बैलांचा बुडून मृत्यू झाला.घाबरलेले शेख मुस्तफा कसेबसे पोहत पाण्यातून बाहेर आल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. या घटनेनंतर परिसरात काम करणारे शेतकरी विलास यादव, बाळू जाधव, राजेश चव्हाण, नयूब शेख, श्रीरंग यादव, कैलास भिंगारे, नारायण वैराल्ले आदी कालव्याकडे धावले. या शेतक-यांनी दोरीच्या साहाय्याने डाव्या कालव्यात उतरून मृत बैल व बैलगाडी ओढून बाहेर काढली. ९० हजारांची बैलजोडी दगावल्याने शेख मुस्तफा यांना धक्का बसला आहे.