शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आष्टीजवळ अरुंद रस्त्यामुळे कालव्यात पडून बैलजोडी दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:32 IST

अरुंद रस्त्यामुळे एका शेतक-याची बैलगाडी अचानक डाव्या कालव्यात गेली. या दुर्घटनेत दोन्ही बैलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, मात्र सुदैवाने शेतक-याचे प्राण वाचले.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : शेतातील काम आटोपून बैलगाडी घेऊन घरी जात असताना, अरुंद रस्त्यामुळे एका शेतक-याची बैलगाडी अचानक डाव्या कालव्यात गेली. या दुर्घटनेत दोन्ही बैलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, मात्र सुदैवाने शेतक-याचे प्राण वाचले. परतूर तालुक्यातील लोणी पुलाजवळून वाहणा-या डाव्या कालव्यात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली.लोणी येथील शेतकरी शेख मुस्तफा शेख बिबन हे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेतातून बैलगाडी घेऊन घराकडे निघाले होते. नाथसागराच्या डाव्या कालव्याच्या कडेने शेतातून ये-जा करण्यासाठी बैलगाडी रस्ता आहे.अरुंद रस्त्याला कालव्याच्या बाजूने तीव्र उतार असल्याने लोणी पुलाजवळ शेख मुस्तफा यांची बैलगाडी थेट कालव्याच्या पाण्यात गेली. नाथसागरातून पाण्याचे आवर्तन सोडलेले असल्याने कालवा भरून वाहत आहे. त्यामुळे शेख मुस्तफा बैलगाडीसह पाण्यात बुडाले. बैल गाडीला जुंपलेले असल्यामुळे, तसेच कालव्याच्या दोन्ही बाजूंनी उतार असल्यामुळे त्यांना वर चढताच आले नाही. त्यामुळे दोन्ही बैलांचा बुडून मृत्यू झाला.घाबरलेले शेख मुस्तफा कसेबसे पोहत पाण्यातून बाहेर आल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. या घटनेनंतर परिसरात काम करणारे शेतकरी विलास यादव, बाळू जाधव, राजेश चव्हाण, नयूब शेख, श्रीरंग यादव, कैलास भिंगारे, नारायण वैराल्ले आदी कालव्याकडे धावले. या शेतक-यांनी दोरीच्या साहाय्याने डाव्या कालव्यात उतरून मृत बैल व बैलगाडी ओढून बाहेर काढली. ९० हजारांची बैलजोडी दगावल्याने शेख मुस्तफा यांना धक्का बसला आहे.