शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मतदार हेल्पलाईनवर १६३० कॉल्स्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:41 IST

मतदार हेल्पलाईनवर ४५ दिवसात १६३० कॉल्स्ची नोंद झाली असून कॉल करणाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा निवडणूक चोखपणे पार पडावी तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. मतदारांच्या मनातील शंका- कुशंका यांचे निरसन व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार हेल्पलाईनची सुविधा तयार करण्यात आली आहे. या मतदार हेल्पलाईनवर ४५ दिवसात १६३० कॉल्स्ची नोंद झाली असून कॉल करणाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली आहेत.अनेकदा मतदार निवडणूक केंद्रावर गेल्यावर मतदान यादीत नाव नसणे, चुकीचे नाव असणे, पत्यात बदल असणे या सारख्या असंख्य प्रश्नांना सामोरे जावे लागते. मतदारांच्या समस्या सोडता याव्यात, यासाठी ०२८२१९५० या हेल्पलाईनची सुविधा १७ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आली आहे. १ फेब्रुवारीपर्यंत या हेल्पलाईन क्रमांकावर ७४ कॉलची नोंद झाली होती. १ फेबु्रवारी ते १ एप्रिलपर्यंत १५२७ तर मंगळवारी एक दिवसात जवळपास ३० कॉल या हेल्पलाईनवर आले आहेत. असे १७ जानेवारी ते २ एप्रिल या ४५ दिवसांच्या कालावधीत १६३० कॉलची नोंद झालेली आहेत.या हेल्पलाईन कक्षाची स्थापना जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदशनाखाली करण्यात आली. जालना जिल्ह्यात लोकसभेची निवडणूक २३ एप्रिल रोजी होत आहे.मतदार याद्या बिनचूक तयार व्हाव्यात, यासाठी या हेल्पलाईनची सुविधा तयार करण्यात आली आहे. यात नवमतदार आमचे यादीत नाव आहे का याची व ओळखपत्रासंबंधी विचारपूस करत आहेत.यावेळी त्यांना त्यांच्या अडचणींबाबत मार्गदर्शन केले जात आहे. तसेच नावात बदल करण्यासाठी काय करावे, पत्त्यात बदल, चुकलेला फोटो असल्यास तो बदलणे, मतदान केंद्र आदींबाबत या क्रमांकावर मतदार प्रश्न विचारत आहेत. त्यांना प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली जातात. दरम्यान, मतदारांसाठी सुरु करण्यात आलेल्या नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, अनेकांना येणाऱ्या अडचणी यामुळे सुटण्यास मदत होत आहे. त्यातच अनेकांनी आपले नाव मतदार यादीत आले नसल्याच्या तक्रारी या हेल्पलाईनवर मोठ्या आल्या असल्याची माहिती निवडून विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिली आहे. काही तक्रारी असल्यास तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.वातावरण तापतेयलोकसभेची निवडणूक २० दिवसांवर आली आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. यात मतदारराजाही सज्ज आहे. मतदानाला गेल्यानंतर ऐनवेळी विविध अडचणी येतात. मतदारांची असुविधा होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने सदर हेल्पलाईन सुरु केली आहे. या हेल्पलाईनवर आतापर्यंत १६३० मतदारांनी आपल्या विविध अडचणीसंदर्भात नोंदणी केल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :jalna-pcजालनाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग