शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
6
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
7
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
8
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
9
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
10
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
11
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
12
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
13
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
14
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
15
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
18
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
19
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
20
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

मतदार हेल्पलाईनवर १६३० कॉल्स्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:41 IST

मतदार हेल्पलाईनवर ४५ दिवसात १६३० कॉल्स्ची नोंद झाली असून कॉल करणाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा निवडणूक चोखपणे पार पडावी तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. मतदारांच्या मनातील शंका- कुशंका यांचे निरसन व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार हेल्पलाईनची सुविधा तयार करण्यात आली आहे. या मतदार हेल्पलाईनवर ४५ दिवसात १६३० कॉल्स्ची नोंद झाली असून कॉल करणाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली आहेत.अनेकदा मतदार निवडणूक केंद्रावर गेल्यावर मतदान यादीत नाव नसणे, चुकीचे नाव असणे, पत्यात बदल असणे या सारख्या असंख्य प्रश्नांना सामोरे जावे लागते. मतदारांच्या समस्या सोडता याव्यात, यासाठी ०२८२१९५० या हेल्पलाईनची सुविधा १७ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आली आहे. १ फेब्रुवारीपर्यंत या हेल्पलाईन क्रमांकावर ७४ कॉलची नोंद झाली होती. १ फेबु्रवारी ते १ एप्रिलपर्यंत १५२७ तर मंगळवारी एक दिवसात जवळपास ३० कॉल या हेल्पलाईनवर आले आहेत. असे १७ जानेवारी ते २ एप्रिल या ४५ दिवसांच्या कालावधीत १६३० कॉलची नोंद झालेली आहेत.या हेल्पलाईन कक्षाची स्थापना जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदशनाखाली करण्यात आली. जालना जिल्ह्यात लोकसभेची निवडणूक २३ एप्रिल रोजी होत आहे.मतदार याद्या बिनचूक तयार व्हाव्यात, यासाठी या हेल्पलाईनची सुविधा तयार करण्यात आली आहे. यात नवमतदार आमचे यादीत नाव आहे का याची व ओळखपत्रासंबंधी विचारपूस करत आहेत.यावेळी त्यांना त्यांच्या अडचणींबाबत मार्गदर्शन केले जात आहे. तसेच नावात बदल करण्यासाठी काय करावे, पत्त्यात बदल, चुकलेला फोटो असल्यास तो बदलणे, मतदान केंद्र आदींबाबत या क्रमांकावर मतदार प्रश्न विचारत आहेत. त्यांना प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली जातात. दरम्यान, मतदारांसाठी सुरु करण्यात आलेल्या नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, अनेकांना येणाऱ्या अडचणी यामुळे सुटण्यास मदत होत आहे. त्यातच अनेकांनी आपले नाव मतदार यादीत आले नसल्याच्या तक्रारी या हेल्पलाईनवर मोठ्या आल्या असल्याची माहिती निवडून विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिली आहे. काही तक्रारी असल्यास तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.वातावरण तापतेयलोकसभेची निवडणूक २० दिवसांवर आली आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. यात मतदारराजाही सज्ज आहे. मतदानाला गेल्यानंतर ऐनवेळी विविध अडचणी येतात. मतदारांची असुविधा होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने सदर हेल्पलाईन सुरु केली आहे. या हेल्पलाईनवर आतापर्यंत १६३० मतदारांनी आपल्या विविध अडचणीसंदर्भात नोंदणी केल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :jalna-pcजालनाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग