शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बर्ड फ्लूसाठी जिल्ह्यात १६ शीघ्र प्रतिसाद पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:26 IST

विजय मुंडे जालना : जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला नाही. परंतु, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत आढळलेले बर्ड फ्लूचे पक्षी पाहता ...

विजय मुंडे

जालना : जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला नाही. परंतु, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत आढळलेले बर्ड फ्लूचे पक्षी पाहता जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पोल्ट्रीचालकांना दक्षतेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एका तालुक्यात दोन प्रमाणे १६ शीघ्र प्रतिसाद पथके तयार करण्यात आली असून, जिल्ह्यातील पक्ष्यांच्या मृत्यूवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे पोल्ट्रीचालकांसह कोंबड्यांचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोल्ट्री चालक, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता योग्य ती दक्षता घ्यावी, यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यात जवळपास तीन लाख कोंबड्या असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात दोन प्रमाणे १६ शीघ्र प्रतिसाद पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून नियमित सकाळी व सायंकाळी तालुक्यातील घडामोडींचा आढावा घेतला जात आहे. जालना येथील पशुचिकित्सालयात नियंत्रण कक्षही सुरू करण्यात आला असून, येथे येणाऱ्या पोल्ट्रीचालकांसह नागरिकांच्या प्रश्नांचे निरसन केले जात आहे.

११३ पोल्ट्री फार्म

जिल्ह्यात जवळपास ११३ पोल्ट्री फार्म आहेत. यात दहा हजारांवर पक्षी असलेल्या पोल्ट्री फार्मची संख्या पाच आहे, तर इतर १०८ पोल्ट्री फार्ममध्ये एक हजारापेक्षा कमी पक्षी आहेत. तर शेतकऱ्यांसह घरगुती कोंबडी पालन करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

शेजाऱ्यांमुळे चिंता

जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या परभणी जिल्ह्यात कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू आढळून आला आहे. तरी बीड परिसरात काही पक्ष्यांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे जालना जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. सद्य:स्थितीत जालन्यात बर्ड फ्लूची लागण झालेली नाही. असे असले तरी दक्षता घेणे आणि सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

तर एक किलोमीटर अंतरावरील पक्ष्यांची कत्तल

एखाद्या ठिकाणी बर्ड फ्लूचे पक्षी आढळले तर त्या घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावरील पक्ष्यांची कत्तल केली जाणार आहे. जेसीबीने मोठा खड्डा खोदून शास्त्रीय पद्धतीने या पक्षांची विल्हेवाट लावली जाणार आहे, तर दहा किलोमीटर अंतरामध्ये संबंधित पक्ष्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत.

जिल्ह्यातील यंत्रणा सतर्क

जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला नाही. असे असले तरी वरिष्ठांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. चिकन, अंडी खाणाऱ्यांनी ती उकडून खाल्ली तर त्यांना कोणताही धोका उद्भवत नाही. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. कोठे पक्षी मृत आढळले तर पशुसंवर्धन विभागाला माहिती द्यावी.

अमितकुमार दुबे

सहायक आयुक्त, पशुसंवर्धन