शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

पशुसंवर्धन विभागातील १३१ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:28 IST

पशुधन वाऱ्यावर : रिक्त पदांकडे लोकप्रतिनिधींचे होतेय दुर्लक्ष विजय मुंडे जालना : जिल्ह्यात नऊ लाखांवर पशुधन असताना, पशुसंवर्धन विभागाला ...

पशुधन वाऱ्यावर : रिक्त पदांकडे लोकप्रतिनिधींचे होतेय दुर्लक्ष

विजय मुंडे

जालना : जिल्ह्यात नऊ लाखांवर पशुधन असताना, पशुसंवर्धन विभागाला मात्र रिक्तपदांचे ग्रहण लागले आहे. जिल्हा परिषदेंतर्गत व राज्याच्या पशुसंवर्धन विभागातील जिल्ह्यातील एक दोन, नव्हे तब्बल १३१ पदे रिक्त आहेत. विशेषत: जिल्हा पशुचिकित्सालयाचे कामकाज दोघांच्या खांद्यावर पडले आहे.

मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे; तर जालना जिल्ह्यातील तीन गावांमध्ये कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी ‘लम्पी स्कीन’ या आजाराने पशुपालक, शेतकऱ्यांची झोप उडाली होती. जिल्ह्यातील पशुधनावर औषधोपचार करण्यासाठी जिल्ह्यात १०४ पशुवैद्यकीय रुग्णालये आहेत. यात जिल्हा परिषदेंतर्गत ५९, तर राज्याच्या पशुसंवर्धन विभागाची ४५ रुग्णालये आहेत. मात्र, यातील बहुतांश रुग्णालयाचे कामकाज प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू असून, अधिकाऱ्यांसोबतच कर्मचाऱ्यांचाही वानवा आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागांतर्गत पशुधन विकास अधिकाऱ्यांची ४२ पदे मंजूर असून, त्यातील २० पदे भरलेली आहेत; तर तब्बल २२ पदे रिक्त आहेत. सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांची १० पदे मंजूर असून, त्यातील तीन पदे रिक्त आहेत. पशुधन पर्यवेक्षकांच्या ४७ पदांपैकी आठ पदे रिक्त आहेत, तर वर्णेापचारकांच्या २७ पदांपैकी आठ पदे रिक्त आहेत.

राज्य पशुसंवर्धन विभागांतर्गत असलेल्या कार्यालयांसह पशुवैद्यकीय रुग्णालयांसाठी एकूण १३९ पदे मंजूर असून, त्यातील केवळ ४९ पदे भरण्यात आली आहेत, तर तब्बल ९० पदे रिक्त आहेत. विशेषत: जालना शहरातील जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात केवळ सहायक आयुक्त व इतर एक अशी दोनच पदे भरण्यात आली आहेत. उर्वरित १३ पदे रिक्त आहेत. तर एकूण पदांमध्ये सहायक आयुक्तांची ४, पशुधन विकास अधिकाऱ्यांची ५, सहायक पशुधन विकास अधिकाऱ्याचे १, पशुधन पर्यवेक्षकांची २५, लघुलेखक १, वरिष्ठ सहायक १, वरिष्ठ लिपिक ५, कनिष्ठ लिपिक १, चालक- २, वर्णेापचारक ४, शिपायाचे एक, परिचराचे ३८, रात्रपहारेकऱ्याचे १, स्वच्छकाचे १ अशी ९० पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे शहरी विशेषत: ग्रामीण भागातील पशुपालक शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. जनावरे आजारी पडली किंवा एखादी साथ आली, तर वेळप्रसंगी खासगी डॉक्टरांकडे जावे लागत आहे. यात त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत आहे.

लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज

अस्मानी-सुल्तानी संकटांच्या काळात दुधाळ जनावरांमुळे शेतकरी, पशुपालकांच्या कुटुंबाला मोठा आधार मिळतो. शेतकऱ्यांनी पशुधनाचा जोड व्यवसाय करावा, यासाठी शासन विविध योजनाही राबवित आहे. मात्र, रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या पशुधन विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी जिल्ह्यातील सत्ताधारी, विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी शासनस्तरावर विशेष पाठपुरावा करण्याची गरज आहे.

वरिष्ठांकडे अहवाल

जिल्हा परिषदेंतर्गत पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांचा अहवाल वरिष्ठांना देण्यात आला आहे. जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना पशुवैद्यकीय रुग्णालयातून उपचार दिले जात असून, साथ नियंत्रणासह लसीकरणाची मोहीमही राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठीही प्रयत्न केले जातात.

डॉ. डी.एस. कांबळे

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी