शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

१३ गावांचा वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: November 8, 2016 00:24 IST

धावडा : धावडा येथील विद्युत उपकेंद्रावर अधिक भार वाढल्याने उपकेंद्रातील मोठा ट्रान्सफार्मर जळाल्याने यावरील जवळपास १३ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

धावडा : धावडा येथील विद्युत उपकेंद्रावर अधिक भार वाढल्याने उपकेंद्रातील मोठा ट्रान्सफार्मर जळाल्याने यावरील जवळपास १३ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. दोन वर्षांची दुष्काळाची कसर यावर्षी पाऊस मुबलक असल्याने निघण्याची आशा शेतकऱ्यांना असताना सध्या परिसरातील शेतकरी गहू, हरभरा, मका, भाजीपाला, शाळू ज्वारी इ. रबी पिकांना पाणी देण्यात व्यस्त असून, प्रत्येकाने रबीचा पेरा केल्याने सर्वच विद्युतपंपाने पाणी उपसण्यात मग्न आहे. त्यामुळे या उपकेंद्रावर पोखरी, मेहगाव, सुंदरवाडी, प्रतापनगर, वडोदतांगडा, भोरखेडा, वडाळी, टाका, जाईदेव, वाढोणा, वालसावंगी, विझोरा व धावडा ही १३ गावे येतात. परंतु ट्रान्सफार्मर जळाल्यापासून ही गावे ३ नोव्हेंबरपासून अंधारात आहेत. या गावातील शेतकऱ्यांचे रबी पिकाचे पाणी असून विद्युत पुरवठा नसल्याने धोक्यात आली आहेत. मोठा ट्रान्सफार्मरसह येथील बॅटऱ्याही जळाल्या आहेत. ४ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथून नवीन बॅटऱ्या आणून बसविण्यात आल्या. जालना येथून तज्ज्ञ बोलावण्यात येऊन त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु ट्रान्सफार्मर निकामी झाल्याचे कळले. दुसऱ्या दिवशी ट्रान्सफार्मरची दुरूस्ती करून या उपकेंद्रावरील १३ गावांसाठी ५ फिडरद्वारे चार चार तास वीजपुरवठा सुरू करण्यात आला. परंतु भार जास्तीचा असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत न होता वारंवार खंडित होत आहे. गेल्या चार दिवसांपासून ही गावे अंधारात असून, विजेवरील सर्व उपकरणे, व्यवहार सर्वांवरच याचा परिणाम होऊन व्यवहार ठप्प झाले आहेत. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन नवीन जास्त क्षमतेचा ट्रान्सफार्मर देऊन वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर)