शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

१३ गावांचा वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: November 8, 2016 00:24 IST

धावडा : धावडा येथील विद्युत उपकेंद्रावर अधिक भार वाढल्याने उपकेंद्रातील मोठा ट्रान्सफार्मर जळाल्याने यावरील जवळपास १३ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

धावडा : धावडा येथील विद्युत उपकेंद्रावर अधिक भार वाढल्याने उपकेंद्रातील मोठा ट्रान्सफार्मर जळाल्याने यावरील जवळपास १३ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. दोन वर्षांची दुष्काळाची कसर यावर्षी पाऊस मुबलक असल्याने निघण्याची आशा शेतकऱ्यांना असताना सध्या परिसरातील शेतकरी गहू, हरभरा, मका, भाजीपाला, शाळू ज्वारी इ. रबी पिकांना पाणी देण्यात व्यस्त असून, प्रत्येकाने रबीचा पेरा केल्याने सर्वच विद्युतपंपाने पाणी उपसण्यात मग्न आहे. त्यामुळे या उपकेंद्रावर पोखरी, मेहगाव, सुंदरवाडी, प्रतापनगर, वडोदतांगडा, भोरखेडा, वडाळी, टाका, जाईदेव, वाढोणा, वालसावंगी, विझोरा व धावडा ही १३ गावे येतात. परंतु ट्रान्सफार्मर जळाल्यापासून ही गावे ३ नोव्हेंबरपासून अंधारात आहेत. या गावातील शेतकऱ्यांचे रबी पिकाचे पाणी असून विद्युत पुरवठा नसल्याने धोक्यात आली आहेत. मोठा ट्रान्सफार्मरसह येथील बॅटऱ्याही जळाल्या आहेत. ४ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथून नवीन बॅटऱ्या आणून बसविण्यात आल्या. जालना येथून तज्ज्ञ बोलावण्यात येऊन त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु ट्रान्सफार्मर निकामी झाल्याचे कळले. दुसऱ्या दिवशी ट्रान्सफार्मरची दुरूस्ती करून या उपकेंद्रावरील १३ गावांसाठी ५ फिडरद्वारे चार चार तास वीजपुरवठा सुरू करण्यात आला. परंतु भार जास्तीचा असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत न होता वारंवार खंडित होत आहे. गेल्या चार दिवसांपासून ही गावे अंधारात असून, विजेवरील सर्व उपकरणे, व्यवहार सर्वांवरच याचा परिणाम होऊन व्यवहार ठप्प झाले आहेत. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन नवीन जास्त क्षमतेचा ट्रान्सफार्मर देऊन वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर)