शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

सव्वालाख शेतकरी नवीन कर्जास पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 01:05 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी मिळालेले जिल्ह्यातील एक लाख २३ हजार हजार ८५१ शेतकरी नव्याने कृषी कर्जास पात्र ठरले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी मिळालेले जिल्ह्यातील एक लाख २३ हजार हजार ८५१ शेतकरी नव्याने कृषी कर्जास पात्र ठरले आहेत. त्यामुळे येत्या खरिप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते-औषधी खरेदीसाठी बँकांकडून अर्थसाहाय्य मिळणार आहे.राज्यशासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यातील दोन लाख १४ हजार ७५० कुटुंबांनी आॅनलाइन अर्ज केले होते. जिल्ह्यातील २० बँकांच्या १६२ शाखांमध्ये एक लाख २३ हजार ८५१ शेतक-यांचे ५९३ कोटी ६९ लाख हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. यामध्ये दीड लाखांच्या आत कर्ज असलेल्या ९४ हजार ६१० शेतक-यांचा समावेश आहे. तसेच नियमित कर्जफेड करणा-या २८ हजार ८२५ शेतक-यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून ४० कोटी ४७ लाखांची रक्कम शेतक-यांचा खात्यावर जमा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १७ हजार ९५८ शेतक-यांना एकरकमी परतफेड योजने अंतर्गत दीड लाखांपर्यंतचा लाभ देण्यात येणार आहे. कर्जमाफीमुळे थकबाकीदार शेतकरी नव्याने कर्ज घेण्यास पात्र झाले आहेत.