शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

हरवलेल्या मोबाईलचा गैरवापर, फोनपेद्वारे १ लाख रुपये काढले

By दिपक ढोले  | Updated: August 29, 2023 17:43 IST

सायबर पोलिसांमुळे २५ हजार परत मिळाले, उरलेली रक्कम गोठविण्यात आली आहे

जालना : हरवलेल्या मोबाइलचा गैरवापर करून फोनपेद्वारे १ लाख रुपये काढून घेतले. याची माहिती सायबर पोलिसांना देताच, पोलिसांनी तत्काळ २५ हजार रुपये रिफंड केले तर ७४ हजार रुपये गोठविले आहेत. ही कारवाई सायबर पोलिसांनी मंगळवारी केली आहे.

२४ ऑगस्ट रोजी फिर्यादी हा शहरातील अंबड चौफुली येथून रिक्षाने रेल्वेस्थानकाकडे जात होता. त्याचवेळी त्यांचा मोबाइल हरवला. तो मोबाइल त्यांच्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या खात्याशी लिंक होता. मोबाइलमध्ये फोन पे सुरू होते. त्यांच्या खात्यात जवळपास १ लाख १५ हजार रुपये होते. फोनपेच्या खात्याचा गैरवापर होऊ नये, यासाठी फिर्यादीने याची तक्रार सायबर पोलिसांकडे केली. पोलिसांनी बॅंकेशी संवाद साधला असता, फिर्यादीच्या खात्यातून १ लाख रुपये विथड्रॉल झाल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी तत्काळ तक्रार दाखल करून तांत्रिक विश्लेषण केले. त्यानंतर २५ हजार रुपये रिफंड केले. तर उर्वरित ७४ हजार रुपये गोठविण्यात आले आहेत.

चार मोबाइलचा घेतला शोधसायबर पोलिसांनी संचार साथी पोर्टलच्या मदतीने चोरीस गेलेल्या चार मोबाइलचा शोध घेतला आहे. या मोबाइलची किंमत जवळपास १ लाख २ हजार रुपये आहे. ते फिर्यादींना परत देण्यात आले आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे, पोलिस निरीक्षक शालिनी नाईक, सपोनि. सुरेश कासुळे, सपोनि. वडते, सफौ. पाटोळे, राठोड, मांटे, पोशि. भंवर, पालवे, नागरे, दुनगहू यांनी केली आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमJalanaजालना