शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 15:31 IST

पाकिस्तानातील प्राध्यापक इश्तियाक अहमद यांनी त्यांच्याच देशाता पर्दाफाश केला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेण्याची मागणी सुरू झाली आहे. भारताने सिंधू पाणी करार थांबवला आहे. पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसावर निर्बंध आहेत, तर दूतावासातील अधिकाऱ्यांनाही परत जाण्यास सांगितले आहे. अटारी सीमेवरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचे म्हणणे आहे की या घटनेशी त्यांचा काहीही संबंध नाही. पण पाकिस्तानचे प्राध्यापक इश्तियाक अहमद यांनी पाकिस्तानलाच सुनावले आहे.

 इश्तियाक अहमद म्हणाले की, हा कसला योगायोग आहे की काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारत आणि हिंदूंविरुद्ध द्वेष व्यक्त केला आणि त्यानंतर असा हल्ला झाला, यामध्ये निष्पाप लोक मारले गेले.

आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई

इश्तियाक अहमद म्हणाले की, पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना आपण हिंदूंपेक्षा वेगळे आहोत असे म्हणण्याची काय गरज होती. पाकिस्तानमध्येच अशांतता असताना त्यांनी द्विराष्ट्र सिद्धांतावर भर दिला. ते स्वतःला भारत आणि हिंदूंपेक्षा वेगळे म्हणतात, पण त्यांचा चीनशी काय संबंध आहे?, असा सवालही त्यांनी केला.

'चीन आपला काका वाटतो का?' ते नास्तिक आहे. तिथे इस्लामचा नाश होत आहे. तुम्ही तिथे गप्प आहात, पण तुम्ही पाकिस्तानला पुन्हा अडचणीत आणले आहे. आमच्यासारख्या लोकांना वाटते की व्यापारी मार्ग उघडले पाहिजेत आणि भारतापासून मध्य पूर्वेकडे व्यवसाय सुरू झाला पाहिजे, असंही प्राध्यापक म्हणाले. 

पाकिस्तान चुकीच्या गोष्टी करतंय

प्रोफेसर इश्तियाक अहमद म्हणाले की, भारतासोबत चार युद्धे झाली आहेत आणि आपण काश्मीर घेऊ शकलो नाही. उलट, आपण आपल्याच देशाचे विभाजन केले. जगभरात पुन्हा एकदा बदनामी होईल. असे म्हटले जाईल की हा देश दहशतवादाला पाठिंबा देतो. पाकिस्तानमध्ये संपूर्ण सत्ता लष्करप्रमुखांकडे असते आणि ते द्विराष्ट्र सिद्धांतासारख्या गोष्टींबद्दल बोलतात. पाकिस्तान चुकीच्या गोष्टी करत आहे. आता भारतीय लोक याला प्रतिसाद देतील की सहन करतील, मला माहित नाही, असंही ते म्हणाले. 

शरीफ हे लष्कराच्या मदतीने सत्तेवर आले 

प्रोफेसर इश्तियाक अहमद म्हणाले की, पाकिस्तानमध्ये सरकार स्थापनेतही एक खेळ होता. शाहबाज शरीफ हे लष्कराच्या मदतीने सत्तेवर आले आहेत आणि म्हणूनच ते लष्करासमोर झुकत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. 

"लष्करप्रमुखांनी विधान केले आणि तिथे निष्पाप पर्यटकांना मारण्यात आले. देवाचे भयही असले पाहिजे. जगात पाकिस्तानची विश्वासार्हता आधीच शून्य आहे. आता आलेख शून्याच्या खाली जाईल, असा घरचा आहेर प्रोफेसर यांनी पाकिस्तानला दिला.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान