शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan Politics : पाकिस्तानात पुन्हा सत्तापालट होणार? माजी पंतप्रधान म्हणाले, “आम्ही संविधान ट्विस्ट केलं…”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 10:54 IST

पाकिस्तानची बिघडलेली आर्थिक स्थिती आणि राजकीय उलथापालथ यांच्या दरम्यान पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी मोठं विधान केलं आहे.

पाकिस्तानची बिघडलेली आर्थिक स्थिती आणि राजकीय उलथापालथ यांच्या दरम्यान पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनी मोठं विधान केलं आहे. सध्या देशातील परिस्थिती अशी आहे की लष्करी सत्तापालट होण्याची शक्यता आहे. देशात संवैधानिक संकट आहे, त्यामुळे लोक समस्यांना सामोरे जात आहेत, असं अब्बासी म्हणाले.

त्यांनी सर्व संबंधितांना आपापसात चर्चा करण्याचंही आवाहन केलं. “पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान, पीएमएल-एन सुप्रीमो नवाझ शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर या तीन महत्त्वाच्या व्यक्तींनी पुन्हा चर्चा सुरू करावी,”  असं त्यांनी नमूद केलं. अब्बासी यांनी अराजकतेचा इशारा देत म्हटले की, “जर समाज आणि संस्थांमधील संघर्ष आणखी वाढला, तर अशा परिस्थितीत लष्कराच्या हाती सत्ता हाती येऊ शकते.”

मार्शल लॉ वरही वक्तव्यसत्ताधारी पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (PML-N) पक्षाचे वरिष्ठ नेते, अब्बासी यांनी ऑगस्ट २०१७ ते मे २०१८ पर्यंत पाकिस्तानचे २१ वे पंतप्रधान म्हणून काम केलं. जर व्यवस्था बिघडली किंवा सरकार आणि घटनात्मक संस्थांमधील संघर्ष वाढला तर नेहमीच मार्शल लॉ लागण्याची शक्यता असते. पाकिस्तानमध्ये अनेक वेळा अशाच परिस्थितीत मार्शल लॉ लागू करण्यात आल्याचंही त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान नमूद केलं.

दरम्यान, लष्कर मार्शल लॉ लागू करण्याच्या पर्यायावर विचार करत नाही, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “मला वाटत नाही की ते यावर विचार करत आहेत, परंतु जेव्हा त्यांच्याकडे कोणताही पर्याय उरला नाही, अशा परिस्थितीत देशाचx सैन्य हस्तक्षेप करू शकते. लष्करानं सत्ता हातात घेतली तर काही चांगलं करण्याऐवजी परिस्थिती आणखी बिघडेल,” असंही ते म्हणाले.

सद्यसंकटावर भाष्य“राजकीय व्यवस्थाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आज १२ महिन्यांपासून सरकार चालवतोय. पण त्यांनी काही केलं नाही. हे मोठं संकट आहे. पाकिस्ताननं यापूर्वी इतकं गंभीर आर्थिक संकट आणि राजकीय परिस्थिती पाहिली नाही. तुम्ही मोठ्या पदावर असाल आणि तुमचे विचार छोटे असतील तर काही करू शकत नाही. ज्या प्रकारचे न्यायाधीशांची नियुक्ती होतेय, त्यांचे रेकॉर्ड पाहा. सर्वकाही पारदर्शकपणे झालं पाहिजे,” असं मत अब्बासी यांनी व्यक्त केलं.

न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्हनेता असो वा जनरल, सध्याच्या परिस्थितीला प्रत्येकजण जबाबदार आहे. देशाची राज्यघटना बनवण्यात आली होती आणि तिचा आत्मा खूप चांगला होता, पण आम्ही त्याची अंमलबजावणी केली नाही, त्याला आणखी ट्विस्ट करण्यात आलं. देशात न्यायाधीश कसे बनवले जातात या प्रकारातील हे एक उत्कृष्ट प्रकरण आहे. यासाठी गेल्या १५-२० वर्षातील केसेस पाहता येतील. न्यायाधीशांनी राजकारण्यांना रबर स्टॅम्प बनवलंय. जगात असा एकही देश नाही जिथे न्यायाधीश स्वत:ची नियुक्ती करतात, असं त्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPoliticsराजकारण