शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
4
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
5
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
6
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
7
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
9
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
10
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
11
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
12
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
13
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
14
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
15
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
16
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
17
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
18
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
19
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
20
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार

भारतीय सैन्य मालदीव सोडणार? मुइज्जू चीनहून परतताच बैठका, सूर बदलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 13:11 IST

गेल्या काही काळापासून मालदीव आणि भारतात तणावाचे वातावरण आहे. मालदीवच्या जनतेने भारतधार्जिने सरकार पाडून चीनधार्जिने सरकार निवडून दिले आहे. यामुळे मालदीवमध्ये असलेल्या भारतीय सैन्याला या नव्या सरकारने विरोध केला आहे.

वेळोवळी शेजारधर्म म्हणून संकटकाळात धावून जाणाऱ्या भारताविरोधात मालदीवचे नवे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी कठोर भुमिका घेतली आहे. भारतविरोधी असलेल्या मुइज्जू यांनी चीनच्या पाच दिवसांच्या दौऱ्याहून येताच भारतीय सैन्याने १५ मार्चपर्यंत आपला देश सोडावा, असे वक्तव्य केले आहे. 

गेल्या काही काळापासून मालदीव आणि भारतात तणावाचे वातावरण आहे. मालदीवच्या जनतेने भारतधार्जिने सरकार पाडून चीनधार्जिने सरकार निवडून दिले आहे. यामुळे मालदीवमध्ये असलेल्या भारतीय सैन्याला या नव्या सरकारने विरोध केला आहे. आता मुइज्जू पाच दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेले होते, त्यांनी परतताच भारत विरोधी वक्तव्ये करण्यास सुरुवात केली आहे. 

पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावरून मालदीवने भारतीयांना ट्रोल केले होते. यावरून भारतीयांनी मालदीवला जाण्याचे बेत रद्द करत मालदीवला मोठा धक्का दिला होता. यावरून देखील मुइज्जू यांनी भारताचे नाव न घेता इशारा दिला आहे. आमचा देश छोटा जरी असला तरी कोणाला धमकी देण्याचे लायसन मिळणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. याचबरोबर भारतीय सैन्याने आपले सैनिक १५ मार्चपर्यंत माघारी घ्यावेत असेही वक्तव्य त्यांनी केले आहे. 

मुइज्जू चीनवरून परतताच दोन्ही देशांच्या उच्चाधिकाऱ्यांमध्ये बैठकीची पहिली फेरी झाली आहे. या बैठकीत भारतीय सैन्य माघारी घेण्यावरून परस्पर सहमती बनल्याचा दावा मालदीवने केला आहे. 

तर भारत-मालदीव उच्चस्तरीय कोअर ग्रुपची पहिली बैठक रविवारी पार पडली. या भेटीत दोन्ही बाजूंनी अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली आणि परस्पर संबंध अधिक दृढ करणे आणि भारताच्या सहकार्याने प्रकल्पांची अंमलबजावणी यावर चर्चा झाली, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :MaldivesमालदीवIndian Armyभारतीय जवान