शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

ती लिहिणार दहा लाख पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 03:14 IST

एकमेकांशी संपर्क साधण्याची अनेक साधने असली तरी आणि त्यापैकी काही क्षणांत दुसºया व्यक्तीशी जोडणारी असली तरी लिहिण्यातून जो जिव्हाळा निर्माण होतो त्याला कशाचीही सर नाही

एकमेकांशी संपर्क साधण्याची अनेक साधने असली तरी आणि त्यापैकी काही क्षणांत दुसºया व्यक्तीशी जोडणारी असली तरी लिहिण्यातून जो जिव्हाळा निर्माण होतो त्याला कशाचीही सर नाही. मोबाइल फोनमधील मेसेजेस किंवा टिष्ट्वटरद्वारे तुमचे म्हणणे समोरच्या व्यक्तीपर्यंत तत्काळ पोहोचते हे खरे. त्या तुलनेत पत्र लिहिण्याला वेळ लागतो हेही खरे. तरीही एका महिलेने थोडेथोडके नव्हे तर दहा लाख पत्र लिहिण्याचा निर्धार केला आहे.जोडी अ‍ॅन बिकले (२८) या कवयत्री असून त्यांनी ज्या लोकांना कधी का असेना सल्ला किंवा मदतीची गरज आहे त्यांना ही पत्रे लिहिण्याचे ठरवले आहे. जीवन किती कठीण असते याची जाणीव जोडी यांना आहे. जोडी २३ वर्षांच्या असताना त्यांना गोचीडाने चावा घेतला होता. त्यातून त्यांना एन्सेफलॅटिस झाला. (एन्सेफलॅटिसची बाधा गोचीड चावलेल्या दोन लाख लोकांतून एकाला होत असते). त्या आजाराने त्यांना हृदयविकाराचा झटका आला व अर्धांगवायू झाला. त्यामुळे त्यांना आत्महत्या करावीशी वाटली. परंतु त्यातून त्या कशाबशा बाहेर पडल्या.आता त्यांनी आयुष्यात अशाच कठीण प्रसंगांना तोंड देत असलेल्यांना मदत करण्याचा ध्यासच घेतला आहे. त्यांचा हा प्रकल्प आहे ‘एक दशलक्ष प्रेमपत्रे’. जोडी यांना वयाच्या ११ वर्षांपासूनच अनोळखी व्यक्तींना पत्रे लिहिण्याची सवय आहे. तुम्ही त्यांच्या वनमिलियनलव्हलेटर्सअ‍ॅटदरेटजीमेलडॉटकॉमवर पत्र पाठवून मला पत्र पाठवा, असे म्हणू शकता. ईमेलवर त्यांना अशी किती तरी पत्रे येत असतात. त्यामुळे तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल.