शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Sri Lanka Economic Crisis : अर्थव्यवस्थाच नाही, तर आर्थिक सुधारणा काय करणार?, का म्हणाले श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष असं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 22:02 IST

सध्या श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे.

भारताचा शेजारी देश श्रीलंका १९४८ मध्ये ब्रिटीश राजवटीपासून स्वतंत्र झाला. तेव्हापासून पर्यटनाच्या क्षेत्रात अनेक यश संपादन करणारा हा देश सध्या सर्वात भीषण आर्थिक संकटातून (Sri Lanka Economic Crisis) जात आहे. अशा स्थितीत देशाचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांचे 'आमच्याकडे अर्थव्यवस्था नाही, मग आर्थिक सुधारणा काय करणार?’ हे विधान लोकांना सतावत आहे. पाहूया अखेर विक्रमसिंघे यांनी कोणत्या कारणासाठी हे विधान केले.

देशात आर्थिक सुधारणांना (सध्या) काही अर्थ नाही. रोखीच्या संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेची अर्थव्यवस्थाच नाहीये, तर आर्थिक सुधारणा काय करणार, असे विक्रमसिंघे म्हणाले. (No point in economic reforms when we don’t have an economy) परकीय चलनाच्या साठ्यातील प्रचंड तुटवड्यामुळे श्रीलंका आजवरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात आहे. या वर्षी एप्रिलच्या मध्यात श्रीलंकेने परकीय चलनाच्या संकटामुळे स्वतःला दिवाळखोर घोषित केले होते.

का म्हणाले राष्ट्राध्यक्ष असं?डेली लंका मिररच्या बातमीचा हवाला देत एजन्सीने सांगितले की, रानिल विक्रमसिंघे सोमवारी श्रीलंका इकॉनॉमिक समिट 2022 ला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले की, संकटात सापडलेली देशाची अर्थव्यवस्था कालबाह्य आर्थिक धोरणे आणि यंत्रणांनी दुरुस्त केली जाऊ शकत नाही. यावेळी त्यांनी देशात नवे आर्थिक मॉडेल (New Economic Model) तयार करण्याबाबतही वक्तव्य केलं.

अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आमची कोणतीही योजना नाही. आपल्याकडे अर्थव्यवस्थाच नसताना आपण अर्थव्यवस्था कशी सुधारणार? आम्हाला नवी अर्थव्यवस्था उभारायची आहे, असे त्यांनी नमूद केले. आपले व्यापार संतुलन आपल्या बाजूने नाही. तर आपण पुन्हा तीच रचना उभी करणार आहोत आणि मग त्याच वेगाने खाली येण्याचा विचार करणार आहोत का? असेही ते म्हणाले.

श्रीलंकेने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून 2.9 अब्ज डॉलर्सच्या मदतीच्या पॅकेजची मागणी केली आहे. सप्टेंबरमध्ये याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र यासाठी श्रीलंकेला आपल्या कर्जाची पुनर्रचना करावी लागेल. आम्ही आमच्या द्विपक्षीय कर्जदारांशी चर्चा करत आहोत. भारतासोबतची आमची चर्चाही यशस्वी झाली आहे. त्याचबरोबर चीनशीही आमची चर्चा सुरू आहे. भारताच्या अदानी समूहासोबत (Adani Group in Sri Lanka) कोलंबो हार्बरचे पश्चिम टर्मिनल विकसित करणे हा यातील महत्त्वाचा दुवा असल्याचेही विक्रमसिंघे म्हणाले.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाEconomyअर्थव्यवस्था