शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Sri Lanka Economic Crisis : अर्थव्यवस्थाच नाही, तर आर्थिक सुधारणा काय करणार?, का म्हणाले श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष असं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 22:02 IST

सध्या श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे.

भारताचा शेजारी देश श्रीलंका १९४८ मध्ये ब्रिटीश राजवटीपासून स्वतंत्र झाला. तेव्हापासून पर्यटनाच्या क्षेत्रात अनेक यश संपादन करणारा हा देश सध्या सर्वात भीषण आर्थिक संकटातून (Sri Lanka Economic Crisis) जात आहे. अशा स्थितीत देशाचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांचे 'आमच्याकडे अर्थव्यवस्था नाही, मग आर्थिक सुधारणा काय करणार?’ हे विधान लोकांना सतावत आहे. पाहूया अखेर विक्रमसिंघे यांनी कोणत्या कारणासाठी हे विधान केले.

देशात आर्थिक सुधारणांना (सध्या) काही अर्थ नाही. रोखीच्या संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेची अर्थव्यवस्थाच नाहीये, तर आर्थिक सुधारणा काय करणार, असे विक्रमसिंघे म्हणाले. (No point in economic reforms when we don’t have an economy) परकीय चलनाच्या साठ्यातील प्रचंड तुटवड्यामुळे श्रीलंका आजवरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात आहे. या वर्षी एप्रिलच्या मध्यात श्रीलंकेने परकीय चलनाच्या संकटामुळे स्वतःला दिवाळखोर घोषित केले होते.

का म्हणाले राष्ट्राध्यक्ष असं?डेली लंका मिररच्या बातमीचा हवाला देत एजन्सीने सांगितले की, रानिल विक्रमसिंघे सोमवारी श्रीलंका इकॉनॉमिक समिट 2022 ला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले की, संकटात सापडलेली देशाची अर्थव्यवस्था कालबाह्य आर्थिक धोरणे आणि यंत्रणांनी दुरुस्त केली जाऊ शकत नाही. यावेळी त्यांनी देशात नवे आर्थिक मॉडेल (New Economic Model) तयार करण्याबाबतही वक्तव्य केलं.

अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आमची कोणतीही योजना नाही. आपल्याकडे अर्थव्यवस्थाच नसताना आपण अर्थव्यवस्था कशी सुधारणार? आम्हाला नवी अर्थव्यवस्था उभारायची आहे, असे त्यांनी नमूद केले. आपले व्यापार संतुलन आपल्या बाजूने नाही. तर आपण पुन्हा तीच रचना उभी करणार आहोत आणि मग त्याच वेगाने खाली येण्याचा विचार करणार आहोत का? असेही ते म्हणाले.

श्रीलंकेने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून 2.9 अब्ज डॉलर्सच्या मदतीच्या पॅकेजची मागणी केली आहे. सप्टेंबरमध्ये याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र यासाठी श्रीलंकेला आपल्या कर्जाची पुनर्रचना करावी लागेल. आम्ही आमच्या द्विपक्षीय कर्जदारांशी चर्चा करत आहोत. भारतासोबतची आमची चर्चाही यशस्वी झाली आहे. त्याचबरोबर चीनशीही आमची चर्चा सुरू आहे. भारताच्या अदानी समूहासोबत (Adani Group in Sri Lanka) कोलंबो हार्बरचे पश्चिम टर्मिनल विकसित करणे हा यातील महत्त्वाचा दुवा असल्याचेही विक्रमसिंघे म्हणाले.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाEconomyअर्थव्यवस्था