शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

Sri Lanka Economic Crisis : अर्थव्यवस्थाच नाही, तर आर्थिक सुधारणा काय करणार?, का म्हणाले श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष असं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 22:02 IST

सध्या श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे.

भारताचा शेजारी देश श्रीलंका १९४८ मध्ये ब्रिटीश राजवटीपासून स्वतंत्र झाला. तेव्हापासून पर्यटनाच्या क्षेत्रात अनेक यश संपादन करणारा हा देश सध्या सर्वात भीषण आर्थिक संकटातून (Sri Lanka Economic Crisis) जात आहे. अशा स्थितीत देशाचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांचे 'आमच्याकडे अर्थव्यवस्था नाही, मग आर्थिक सुधारणा काय करणार?’ हे विधान लोकांना सतावत आहे. पाहूया अखेर विक्रमसिंघे यांनी कोणत्या कारणासाठी हे विधान केले.

देशात आर्थिक सुधारणांना (सध्या) काही अर्थ नाही. रोखीच्या संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेची अर्थव्यवस्थाच नाहीये, तर आर्थिक सुधारणा काय करणार, असे विक्रमसिंघे म्हणाले. (No point in economic reforms when we don’t have an economy) परकीय चलनाच्या साठ्यातील प्रचंड तुटवड्यामुळे श्रीलंका आजवरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात आहे. या वर्षी एप्रिलच्या मध्यात श्रीलंकेने परकीय चलनाच्या संकटामुळे स्वतःला दिवाळखोर घोषित केले होते.

का म्हणाले राष्ट्राध्यक्ष असं?डेली लंका मिररच्या बातमीचा हवाला देत एजन्सीने सांगितले की, रानिल विक्रमसिंघे सोमवारी श्रीलंका इकॉनॉमिक समिट 2022 ला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले की, संकटात सापडलेली देशाची अर्थव्यवस्था कालबाह्य आर्थिक धोरणे आणि यंत्रणांनी दुरुस्त केली जाऊ शकत नाही. यावेळी त्यांनी देशात नवे आर्थिक मॉडेल (New Economic Model) तयार करण्याबाबतही वक्तव्य केलं.

अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आमची कोणतीही योजना नाही. आपल्याकडे अर्थव्यवस्थाच नसताना आपण अर्थव्यवस्था कशी सुधारणार? आम्हाला नवी अर्थव्यवस्था उभारायची आहे, असे त्यांनी नमूद केले. आपले व्यापार संतुलन आपल्या बाजूने नाही. तर आपण पुन्हा तीच रचना उभी करणार आहोत आणि मग त्याच वेगाने खाली येण्याचा विचार करणार आहोत का? असेही ते म्हणाले.

श्रीलंकेने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून 2.9 अब्ज डॉलर्सच्या मदतीच्या पॅकेजची मागणी केली आहे. सप्टेंबरमध्ये याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र यासाठी श्रीलंकेला आपल्या कर्जाची पुनर्रचना करावी लागेल. आम्ही आमच्या द्विपक्षीय कर्जदारांशी चर्चा करत आहोत. भारतासोबतची आमची चर्चाही यशस्वी झाली आहे. त्याचबरोबर चीनशीही आमची चर्चा सुरू आहे. भारताच्या अदानी समूहासोबत (Adani Group in Sri Lanka) कोलंबो हार्बरचे पश्चिम टर्मिनल विकसित करणे हा यातील महत्त्वाचा दुवा असल्याचेही विक्रमसिंघे म्हणाले.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाEconomyअर्थव्यवस्था