शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शेख हसीना आता कुठे जाणार? मुलाने केला मोठा खुलासा, फक्त एका निर्णयाची प्रतिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 15:20 IST

Bangladesh Crisis : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतरही तेथे जाळपोळ सुरू आहेत. दरम्यान, शेख हसीना बांगलादेश सोडून भारतात आल्या होत्या. आता त्यांच्याबाबत मुलाने मोठा खुलासा केला.

Bangladesh crisis : बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसापासून गोंधळ सुरू आहे. तेथील हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतरही तेथे हिंदूंना लक्ष्य करून जाळपोळ सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.  शेख हसीना बांगलादेश सोडून भारतात आल्यानंतर त्या युरोपीय देशात जातील असं बोललं जात होतं. दरम्यान, आता त्यांच्या मुलाने मोठा खुलासा केला आहे. 

बांगलादेशचे नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार कार्यभार स्वीकारतील. लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांनी ही माहिती दिली आहे. सरकारमधील लोक गुरुवारी रात्री ८ वाजता शपथ घेतील.

विद्यार्थ्यांनी अशक्य ते शक्य केले; बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे वक्तव्य

शेख हसीना यांचा मुलगा साजिब वाजिद जॉय यांनी पीटीआयला याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, लोकशाही पुनर्संचयित झाल्यावर शेख हसीना बांगलादेशात परततील. पाकिस्तानची आयएसआय बांगलादेशात अशांतता भडकावत आहे.

"बांगलादेशमध्ये तात्काळ लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण केला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. 

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे वक्तव्य

बांगलादेशातील शूर मुलांच्या प्रयत्नांमुळे आपला देश मुक्त झाला आहे, असे उद्गार माजी पंतप्रधान व बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या प्रमुख खालिदा झिया यांनी बुधवारी काढले. त्यांची कारावासातून मंगळवारी सुटका करण्यात आली होती. अशक्य ते शक्य करून दाखविल्याबद्दल बांगलादेशच्या जनतेचे मी अभिनंदन करते. संताप, सूडाद्वारे नव्हे, तर शांतता, प्रेम यांच्या माध्यमातूनच बांगलादेशची पुनर्उभारणी करता येईल, असेही त्यांनी सांगितले. 

२०१८ नंतर त्यांनी पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केले आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बुधवारी केलेल्या भाषणात खालिदा झिया यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, कारावासातून माझी सुटका व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांचे मी आभार मानते. बांगलादेश भ्रष्टाचार, गलिच्छ राजकारण या गोष्टींनी वेढला गेला आहे. त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न करूया.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश