शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ; जगासमोर मोठं संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 10:30 IST

मोदी सरकारनं गेल्याच आठवड्यात घेतलेल्या निर्णयाचे परिणाम आता जगभरात दिसू लागले आहेत

नवी दिल्ली: गव्हाची निर्यात रोखण्याचा निर्णय मोदी सरकारनं गेल्याच आठवड्यात घेतला. देशात गव्हाचे दर वाढल्यानं केंद्र सरकारनं गहू निर्यात रोखली. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीनं सुरू करण्यात आली. त्यानंतर आता जगासमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचा तुटवडा निर्माण झाला आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये गव्हाचे दर वाढले आहेत. १ बुशल (२७.२१६ किलो) गव्हासाठी शिकागोमध्ये १२.४७ डॉलर मोजावे लागत आहेत. मोदी सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर गव्हाचे दर ५.९ टक्क्यांनी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गव्हाच्या दरात जवळपास ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

रशिया आणि युक्रेन जागतिक बाजारपेठेतील सर्वात मोठे गहू निर्यातदार देश आहेत. जगाच्या एकूण गहू निर्यातीत या दोन देशांचा वाटा एक तृतीयांश इतका आहे. मात्र दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू असल्यानं त्याचा परिणाम गव्हाच्या पुरवठ्यावर झाला आहे. रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर गव्हाच्या दरांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

गहू उत्पादक देशांच्या यादीत भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागतो. गेल्या हंगामात युक्रेनमध्ये गहू उत्पादनाला खराब हवामानाचा फटका बसला. गव्हाचं उत्पादन कमी झाल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारातील पुरवठ्यावर परिणाम झाला. मात्र भारतात गहू उत्पादन चांगलं झालं. त्यामुळे युक्रेनमुळे निर्माण झालेली गव्हाची कमतरता भारतानं भरून काढली. मात्र आता भारतातील महागाई ८ वर्षांतील सर्वोच्च प्रमाणावर आहे. गव्हाचे दर वाढले आहेत. त्यामुळे सरकारनं गव्हाची निर्यात बंद केली आहे.