शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 14:37 IST

पाकिस्तानमधील हवाई हल्ल्यात ३० मुले आणि महिलांचा मृत्यू झाला, यामुळे तेथील सरकारविरोधात संतापाची लाट उसळळी आहे.

पाकिस्तानी लष्कराने आपल्याच देशात हवाई हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. या हल्ल्यात ३० नागरिकांचा मृत्यू झाला. लष्कराने पश्तून नागरिकांवर हवाई हल्ले केले.  पहाटे 2 वाजताच्या सुमारास, पाकिस्तानी हवाई दलाने खैबर पख्तूनख्वा प्रांतातील तिराह खोऱ्यातील मात्रे दारा गावात JF-17 लढाऊ विमानांमधून किमान आठ LS-6 बॉम्ब टाकले. या घटनेनंतर आता पाकिस्तानमध्ये संतापाची लाट पसरली आहे. 

Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा

महिला आणि मुलांच्या मृत्यूंविरोधात आफ्रिदी पश्तून नेते आणि व्यक्तींनी निदर्शने करण्याची तयारी सुरू केली आहे. अधिकृत आकडा ३० असला तरी, मृतांचा आकडा जास्त असल्याचे मानले जाते. या घटनेवरुन आता लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्या प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

एका गावावर आठ चिनी बॉम्ब टाकले

रविवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास पाकिस्तानी हवाई दलाने तिरह खोऱ्यातील मात्रे दरे गावावर हवाई हल्ला केला. JF-17 लढाऊ विमानांनी आठ चिनी लेसर-मार्गदर्शित बॉम्ब टाकले. यामुळे मोठा विनाश झाला. या स्फोटांमुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली. आत झोपलेले लोक मृत्युमुखी पडले, तर काही जण जीव वाचवण्यासाठी पळून गेले. सकाळी रहिवाशांना लोकांचे मृतदेह आढळले.

दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा, गावकऱ्यांचा राग आणि सरकार आणि सैन्यविरोधी वक्तव्ये पाहून, एक लेटर प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये बॉम्ब गावावर टाकण्यात आले नाहीत, तर तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) च्या लपण्याच्या ठिकाणांवर टाकण्यात आले आहेत, असे सांगण्यात आले आहे. एका माहिती देणाऱ्याकडून माहिती मिळाली की टीटीपीचे दोन कमांडर, अमन गुल आणि मसूद खान, गावात लपून बसले आहेत आणि ते बॉम्ब बनवत आहेत. यामुळे हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. 

माहिती न देताच हल्ला

पाकिस्तानी जनतेने लष्करावर माहिती न देता हल्ला केल्याचा आरोप केला आहे. दहशतवादी अज्ञात असले तरी, पाकिस्तानचे स्वतःचे नागरिक मारले जात आहेत, यामुळे लष्कर आणि सरकार दोघांनाही किंमत मोजावी लागू शकते. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने एक निवेदन जारी करून हवाई हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे, सरकारचे काम आपल्या लोकांचे रक्षण करणे आहे. पण, आपल्याच लोकांवर हल्ला करून, पाकिस्तानी सरकार स्वतःची परिस्थिती जगासमोर उघड करत आहे. ते जगासमोर पाकिस्तानची कमकुवतपणा दाखवत आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान