शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

'युद्ध पर्याय असू शकत नाही, आम्हाला भारतासोबत शांतता हवी आहे': PM शहबाज शरीफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 14:33 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारत-पाक संबंधांवर महत्वाचे वक्तव्य केले आहे.

इस्लामाबाद:पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारत-पाक संबंधांवर महत्वाचे वक्तव्य केले आहे. "काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध पर्याय नाही. आम्हाला भारतासोबत चर्चेद्वारे शांतता कायम ठेवायची आहे,'' असे वक्तव्य शाहबाज शरीफ यांनी केली आहे. पीएम शरीफ शुक्रवारी हार्वर्ड विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या एका गटाला संबोधित करत होते.

पंतप्रधान शरीफ म्हणाले की, "पाकिस्तान सीमा भागात शांतता राखण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्हाला भारतासोबत असलेला सीमा वाद चर्चेद्वारे सोडवायचा आहे. आम्हाला शाश्वत शांतता हवी आहे. युद्ध हा कोणत्याही समस्येसाठी योग्य पर्याय नाही. पाकिस्तान आणि भारताने व्यापार, अर्थव्यवस्था आणि नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी स्पर्धा केली पाहिजे.'' 

5 ऑगस्ट 2019 रोजी भारताने घटनेच्या कलम 370 मधील बहुतेक तरतुदी रद्द केल्या, त्यामुळे जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द झाला आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन झाले. या निर्णयामुळे भारत-पाक संबंध आणखी बिघडले. काश्मीर प्रश्न आणि सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे दोन्ही देशातील संबंध गेल्या काही वर्षांपासून ताणले गेले आहेत. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि कायम राहील, असे भारताने वारंवार सांगितले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदी