शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

'युद्ध पर्याय असू शकत नाही, आम्हाला भारतासोबत शांतता हवी आहे': PM शहबाज शरीफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 14:33 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारत-पाक संबंधांवर महत्वाचे वक्तव्य केले आहे.

इस्लामाबाद:पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारत-पाक संबंधांवर महत्वाचे वक्तव्य केले आहे. "काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध पर्याय नाही. आम्हाला भारतासोबत चर्चेद्वारे शांतता कायम ठेवायची आहे,'' असे वक्तव्य शाहबाज शरीफ यांनी केली आहे. पीएम शरीफ शुक्रवारी हार्वर्ड विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या एका गटाला संबोधित करत होते.

पंतप्रधान शरीफ म्हणाले की, "पाकिस्तान सीमा भागात शांतता राखण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्हाला भारतासोबत असलेला सीमा वाद चर्चेद्वारे सोडवायचा आहे. आम्हाला शाश्वत शांतता हवी आहे. युद्ध हा कोणत्याही समस्येसाठी योग्य पर्याय नाही. पाकिस्तान आणि भारताने व्यापार, अर्थव्यवस्था आणि नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी स्पर्धा केली पाहिजे.'' 

5 ऑगस्ट 2019 रोजी भारताने घटनेच्या कलम 370 मधील बहुतेक तरतुदी रद्द केल्या, त्यामुळे जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द झाला आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन झाले. या निर्णयामुळे भारत-पाक संबंध आणखी बिघडले. काश्मीर प्रश्न आणि सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे दोन्ही देशातील संबंध गेल्या काही वर्षांपासून ताणले गेले आहेत. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि कायम राहील, असे भारताने वारंवार सांगितले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदी