शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

..तर २०० कंपन्या  चीन सोडून भारतात येतील !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 14:56 IST

.त्या कंपन्या भारतात येण्याच्या तयारीत!

ठळक मुद्देआताच भारताच्या बाजूनं लॉबिंग सुरु झालेलंही असू शकतं

कोरोनात्तोर काळात चिनमधून अनेक  कंपन्या विशेषत: मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आपल्या गाशा गुंडाळतील अशी शक्यता आता जगभर बोलून दाखवली जाते आहे.जपान सरकारने तर अलिकडेच घसघशीत रकमेची तरतूद करत आपल्या कंपन्यांना आर्थिक हात दिला आणि सांगितलं चिनमधून बाहेर पडा, जपानमध्ये परत या नाही तर अन्य आशिया-पॅसिफिक देशांत गुंतवणूक करता येतेय का पहा.आता अमेरिकन कंपन्याही आपले मॅन्युफॅक्चरिंगचे काम चीनमधून हलवतील आणि तशाच तुलनेनं स्वस्त मनुष्यबळ आणि कच्च मालासह अन्य सेवांसाठी भारतात येतील अशी शक्यता आहे.तीच एक शक्यता यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक आणि पार्टनरशिप फोरम चे अध्यक्ष मुकेश अगी यांनी व्यक्त केली आहे. साधारण 200 कंपन्या भारतात आपले तळ उभारण्याच्या तयारीत आहे असं ते सांगतात. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची निवडणूक पार पडल्यावर ते होऊ शकेल असा त्यांचा अंदाज आहे.्रअर्थात ही संधी आहे आणि त्यासाठी भारत सरकारने पुढाकार घ्यायला हवा असंही ते सांगतात. ते म्हणतात, भारतात अधिक पारदर्शक कारभार, नवी दिल्लीने आर्थिक सुधारणांना वेग दिला, बदल स्वीकारला तर या कंपन्या भारतात येतील आणि त्याचा भारताला फायदा होऊ शकेल.अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूकीत लॉबिंग ही नवी गोष्ट नाही, ती तिथं कायदेशीरही आहे. त्यामुळे आताच भारताच्या बाजूनं लॉबिंग सुरु झालेलंही असू शकतं, आता ही संधी खरंच भारत साधेल का, त्या कंपन्या भारतता येतील का, हे पहायचं.