शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

युद्धाची भाषा नको! चर्चेने प्रश्न सोडवा, अमेरिकेचा भारत-चीनला संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 13:43 IST

भारत आणि चीनमध्ये जे वादग्रस्त विषय आहेत, त्या सर्व मुद्यांवर दोन्ही देशांनी चर्चेतून तोडगा काढावा असे अमेरिकेने म्हटले आहे.

ठळक मुद्दे लडाखमधील प्रसिद्ध पँगाँग तलावाच्या काठावरुन भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला.सिक्कीम सेक्टरमधील डोकलाममध्ये भारत आणि चिनी सैन्य मागच्या अनेक दिवसांपासून परस्परांसमोर उभे ठाकले आहे.

वॉशिंग्टन, दि. 16 - भारत आणि चीनमध्ये जे वादग्रस्त विषय आहेत, त्या सर्व मुद्यांवर दोन्ही देशांनी चर्चेतून तोडगा काढावा असे अमेरिकेने म्हटले आहे.  मंगळवारी भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचा लडाखमधील प्रसिद्ध पँगाँग तलावाच्या काठावरुन भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. त्यानंतर अमेरिकेने ही प्रतिक्रिया दिली आहे. 

सिक्कीम सेक्टरमधील डोकलाममध्ये भारत आणि चिनी सैन्य मागच्या अनेक दिवसांपासून परस्परांसमोर उभे ठाकले आहे. त्यानंतर आता लडाखमध्ये संघर्षाची ठिणगी उडाली आहे. भारत आणि चीनने चर्चेतून सामंजस्याने तोडगा काढावा त्यासाठी आम्ही दोन्ही देशांना प्रोत्साहन देत आहोत असे स्टेट डिपार्टमेंटच्या प्रवक्त्या हीथर नॉरेट यांनी सांगितले. 

आणखी वाचा लडाखमध्ये चिनी सैनिकांची रोखली घुसखोरी 

चीनचा आर्थिकदृष्ट्या पराभव करा, उत्पादनांवर बहिष्कार टाका; रामदेव बाबांचं आवाहन 

डोकलाम प्रश्नावरुन चीनकडून सातत्याने भारताला युद्धाची धमकी दिली जात आहे. भारताने आपले सैन्य माघारी बोलवावे अन्यथा युद्ध अटळ आहे अशी भाषा केली जात आहे. दरम्यान डोकलाम आमचाच भूभाग असून, डोकलामवरुन आम्ही दावा सोडलेला नाही असे भूतान सरकारने स्पष्ट केले. चीनकडून देण्यात येणारी माहिती पूर्णपणे चुकीची असून, दिशाभूल करणारी असल्याचे भूतानने सांगितले. 

डोकलामप्रश्नी आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. 29 जून 2017 रोजी भूतानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर जी माहिती प्रसिद्ध केलीय ती आमची अधिकृत भूमिका आहे. डोकलाममध्ये थेट रस्ता बांधायला सुरुवात करणे हे कराराचे उल्लंघन आहे. दोन देशांमधील सीमांकन करण्याची प्रक्रिया यामुळे बाधित होईल असे भूतानने म्हटले आहे.  

डोकलाममध्ये भारत आणि चीनमध्ये रस्तेबांधणीवरुन निर्माण झालेला संघर्ष चिघळत चालला असून, चीनने डोकलाममध्ये सैनिकांची संख्या वाढवली आहे. डोकलामधील वादग्रस्त जागेपासून एक किलोमीटरच्या अंतरावर चीनने 800 सैनिकांची तैनाती केल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. चीनने या भागात 80 तंबू टाकले आहेत. चीनने अजून इथे आपली पूर्ण बटालियन तैनात केलेली नाही. संघर्ष सुरु आहे तिथे आधीपासूनच चीनने 300 सैनिक तैनात केले आहेत. 

सिक्कीम सेक्टरमध्ये डोकलाम जवळ भारताचे 350 जवान तैनात आहेत. भारतीय चीनच्या बाजूला कोणतीही हालचाल होत नसल्याचे लष्कराने म्हटले आहे. भारतीय लष्कराने आपल्या तुकडयांसाठी दोन आठडयांचा ऑपरेशन अलर्ट कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर-ऑक्टोंबरऐवजी ऑगस्टमध्ये हा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येईल. डोकलाममध्ये दोन्ही देशांचे सैन्य समोरा-समोर उभे ठाकल्याच्या घटनेला आता 50 पेक्षा जास्त दिवस झाले आहेत.