शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

कलम ३७० संपुष्टात आणल्यास अशांतता

By admin | Updated: November 17, 2014 02:40 IST

नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला यांच्या मते, ३७० कलम संपुष्टात आणल्यास मोठ्या पातळीवर अशांतता निर्माण होण्याचा धोका आहे.

लंडन : जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा समाप्त करण्याच्या भाजपाच्या ‘खतरनाक’ इराद्याबाबत चिंता व्यक्त करत राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले व नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला यांच्या मते, ३७० कलम संपुष्टात आणल्यास मोठ्या पातळीवर अशांतता निर्माण होण्याचा धोका आहे. प्रकृतीच्या कारणास्तव अब्दुल्ला हे सध्या लंडनमध्ये आहेत.गेल्या चार दशकांत प्रथमच सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला (७७ वर्षे) हे राज्य विधानसभा निवडणुकीच्या काळात आपल्या पक्षाचे नेतृत्व करणार नाहीत. गेल्या तीन महिन्यांपासून किडनीवरील उपचारार्थ ते लंडनमध्ये आहेत.वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘मी एक फलंदाज असून सध्या प्रकृती कारणास्तव येथे आहे. मात्र, मैदानात परतण्याची मोठी उत्सुकता आहे.’ येत्या फेब्रुवारीपर्यंत मायदेशी परतणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.अब्दुल्ला यांनी मुलाखतीत विविध मुद्यांना उत्तरे दिली. ते पुढे म्हणाले, ‘राज्यघटनेतील कलम ३७० समाप्त करण्याच्या भाजपाच्या इराद्याबद्दल मला मोठी चिंता वाटते. या कलमाने राज्याला विशेष दर्जा मिळाला आहे. या कलमासाठी महात्मा गांधी व भारत सरकारद्वारेही हमी देण्यात आली होती.’ भाजपा आपले लक्ष्य मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्येही त्यांच्याकडून देशातील अन्य भागांप्रमाणेच धु्रवीकरण केले जाईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. कलम ३७० रद्द केल्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीकडे लक्ष वेधताना ते म्हणाले, राज्यातील तरुणांच्या मनात मोठी उलथापालथ होईल आणि आम्ही कधीच शांततेचे ध्येय गाठू शकणार नाही.